शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

नेर तालुक्यामध्ये पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:31 IST

दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च केले जाते. या योजना तकलादू असल्याने पाणी समस्या कायम आहे. तालुक्याच्या १७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हा प्रश्न तीव्र झाला आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांमधील कामे बोगस होत असल्याने समस्या गंभीर होत चालली आहे.

ठळक मुद्देबोगस कामे वाढली : १७ ग्रामपंचायतीत समस्या तीव्र

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च केले जाते. या योजना तकलादू असल्याने पाणी समस्या कायम आहे. तालुक्याच्या १७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हा प्रश्न तीव्र झाला आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांमधील कामे बोगस होत असल्याने समस्या गंभीर होत चालली आहे.तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने होरपळून निघत आहे. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून अनेक कामे करण्यात आली. या अंतर्गत झालेल्या कामांचा दर्जा निकृष्ट राहिला आहे. विहिरींना भरपूर पाणी असतानाही केवळ बोगस पाईपलाईनमुळे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही. काही ठिकाणी टाक्या निकृष्ट, तर मोटारपंपाचा दर्जा सुमार आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शेततळ्यांसाठी तीन गावांची निवड करण्यात आली. शेततळ्यासाठी ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून द्यावी, असे संकेत आहे. दोन ग्रामपंचायतींनी जागा दिली मात्र इंद्रठाणा ग्रामपंचायतीने अजूनही यादृष्टीने पाऊले उचलली नाहीत. पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहे. शेततळे पूर्ण होऊन त्यात पाणी केव्हा जमा होणार हा प्रश्न आहे. आजंती, चिकणी, मांगलादेवी, वटफळी, शहापूर आदी गावांमध्ये पाण्यासाठी लोकांची अक्षरश: जागल सुरू आहे.ग्रामस्वच्छता अभियान रखडलेतेराव्या वित्त आयोगातून ग्रामस्वच्छता अभियान, रस्त्याचे डांबरीकरण, पाण्याची मुबलक सोय अशा कामांना प्राधान्य दिले जाते. लाखो रुपयांचा निधी यासाठी उपलब्धही करून देण्यात आला. मात्र सद्यस्थितीत ग्रामस्वच्छता अभियान थांबले आहे. हागणदारीमुक्त गाव अभियानाचे तीनतेरा वाजले आहे. रस्त्याच्या कामात गैरप्रकार वाढले आहे. यावर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे दिसून येते.