शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

नेर तालुक्यामध्ये पाण्यासाठी टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 21:31 IST

दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च केले जाते. या योजना तकलादू असल्याने पाणी समस्या कायम आहे. तालुक्याच्या १७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हा प्रश्न तीव्र झाला आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांमधील कामे बोगस होत असल्याने समस्या गंभीर होत चालली आहे.

ठळक मुद्देबोगस कामे वाढली : १७ ग्रामपंचायतीत समस्या तीव्र

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : दरवर्षी पाणीटंचाई उपाययोजनांवर लाखो रुपये खर्च केले जाते. या योजना तकलादू असल्याने पाणी समस्या कायम आहे. तालुक्याच्या १७ ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हा प्रश्न तीव्र झाला आहे. हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांमधील कामे बोगस होत असल्याने समस्या गंभीर होत चालली आहे.तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने होरपळून निघत आहे. तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून अनेक कामे करण्यात आली. या अंतर्गत झालेल्या कामांचा दर्जा निकृष्ट राहिला आहे. विहिरींना भरपूर पाणी असतानाही केवळ बोगस पाईपलाईनमुळे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नाही. काही ठिकाणी टाक्या निकृष्ट, तर मोटारपंपाचा दर्जा सुमार आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते.तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर शेततळ्यांसाठी तीन गावांची निवड करण्यात आली. शेततळ्यासाठी ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून द्यावी, असे संकेत आहे. दोन ग्रामपंचायतींनी जागा दिली मात्र इंद्रठाणा ग्रामपंचायतीने अजूनही यादृष्टीने पाऊले उचलली नाहीत. पावसाळ्याचे दिवस जवळ आलेले आहे. शेततळे पूर्ण होऊन त्यात पाणी केव्हा जमा होणार हा प्रश्न आहे. आजंती, चिकणी, मांगलादेवी, वटफळी, शहापूर आदी गावांमध्ये पाण्यासाठी लोकांची अक्षरश: जागल सुरू आहे.ग्रामस्वच्छता अभियान रखडलेतेराव्या वित्त आयोगातून ग्रामस्वच्छता अभियान, रस्त्याचे डांबरीकरण, पाण्याची मुबलक सोय अशा कामांना प्राधान्य दिले जाते. लाखो रुपयांचा निधी यासाठी उपलब्धही करून देण्यात आला. मात्र सद्यस्थितीत ग्रामस्वच्छता अभियान थांबले आहे. हागणदारीमुक्त गाव अभियानाचे तीनतेरा वाजले आहे. रस्त्याच्या कामात गैरप्रकार वाढले आहे. यावर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याचे दिसून येते.