शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

बोथबोडनमध्ये मुख्यमंत्र्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By admin | Updated: July 2, 2017 01:26 IST

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटींमुळे १५ टक्केच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

कर्जमाफी : शेतकरी विधवांचे अभिनव आंदोलन, नेरमध्ये नोंदविला निषेध लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटींमुळे १५ टक्केच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शासनाच्या या आदेशाचा निषेध म्हणून बोथबोडण येथील शेतकरी विधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून संताप व्यक्त केला. शासनाने सरसकट कर्जमाफी दिली नाही, यापेक्षाही उग्र आंदोलनाचा निर्धार त्यांनी केला. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव म्हणून देशपातळीवर बोथबोडणची ओळख आहे. अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, समाजसेवी संस्थांनी या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. काहींनी गावात विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न केले आहे. मात्र या गावाची स्थिती अद्याप सुधारली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्ज माफ करतील, अशी अपेक्षा तेथील शेतकरी विधवांना होती. तथापि शासनाने कर्जमाफीत घातलेल्या जाचक अटींमुळे या शेतकरी विधवांना कोणताच लाभ झाला नाही. त्याचा संताप म्हणून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गावातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या आंदोलनात संपूर्ण गाव सहभागी झाले. शेतकरी विधवा नाझीबाई राठोड यांनी हाती आगटं धरलं, तर शांताबाई वरणकर, चंद्रकला शेळके, सुंदरबाई चव्हाण, लिलाबाई पुरी, देवकाबाई जाधव, अनुसया देवकर आदींनी प्रतिकात्मक प्रेतयात्रेत खांदा दिला. यावेळी शासनविरोधी निदर्शने करण्यात आली. अनुप चव्हाण, रोहित राठोड, जितेंद्र राठोड, श्याम राठोड, दत्ता राठोड, अनिल राठोड, सत्यम जाधव यांच्या पुढाकारात आंदोलन करण्यात आले. शेतकरी विधवा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी होते. संपूर्ण गावातून अंत्ययात्रा फिरल्यानंतर शेवटी स्मशानभूमीजवळ अंत्यविधी करण्यात आला. शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली नाही, तर पालकमंत्र्यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी विधवांनी दिला. कर्जमाफीच्या ‘जीआर’ची होळी नेर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहायचे. त्यांचे राज्य रयतेसाठी होते. मात्र महाराष्ट्र सरकार महाराजांचे नाव घेवून शेतकऱ्यांना फसवत आहे, असे सांगून कर्जमाफीसंदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची येथे होळी करण्यात आली. युवा शेतकरी संघर्ष समितीने दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून निषेध नोंदविला. कर्जमाफी अत्यंत फसवी आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा निर्णय घेण्यात आला. शासन बोगस, जीआर बोगस अशा घोषणा देत जीआरची होळी करण्यात आली. यावेळी गोपाल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य निखिल पाटील जैत, संतोष अरसोड, सतीश चवात, मुकुंद गावंडे, गौरव नाईकर, रवी गाडे, पुरुषोत्तम राठोड, सदानंद पेचे, स्वप्नील शेटे, मिथून अलाटे, मिथून भगत, विशाल चहाकार, राजू भोयर, सुदाम राठोड, गजानन दहेलकर, विजय राठोड, गणेश ठाकरे, गोपाल खडसे आदी उपस्थित होते.