शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

बोथबोडनमध्ये मुख्यमंत्र्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

By admin | Updated: July 2, 2017 01:26 IST

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटींमुळे १५ टक्केच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

कर्जमाफी : शेतकरी विधवांचे अभिनव आंदोलन, नेरमध्ये नोंदविला निषेध लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटींमुळे १५ टक्केच शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शासनाच्या या आदेशाचा निषेध म्हणून बोथबोडण येथील शेतकरी विधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून संताप व्यक्त केला. शासनाने सरसकट कर्जमाफी दिली नाही, यापेक्षाही उग्र आंदोलनाचा निर्धार त्यांनी केला. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव म्हणून देशपातळीवर बोथबोडणची ओळख आहे. अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, समाजसेवी संस्थांनी या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. काहींनी गावात विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे प्रयत्न केले आहे. मात्र या गावाची स्थिती अद्याप सुधारली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्ज माफ करतील, अशी अपेक्षा तेथील शेतकरी विधवांना होती. तथापि शासनाने कर्जमाफीत घातलेल्या जाचक अटींमुळे या शेतकरी विधवांना कोणताच लाभ झाला नाही. त्याचा संताप म्हणून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गावातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या आंदोलनात संपूर्ण गाव सहभागी झाले. शेतकरी विधवा नाझीबाई राठोड यांनी हाती आगटं धरलं, तर शांताबाई वरणकर, चंद्रकला शेळके, सुंदरबाई चव्हाण, लिलाबाई पुरी, देवकाबाई जाधव, अनुसया देवकर आदींनी प्रतिकात्मक प्रेतयात्रेत खांदा दिला. यावेळी शासनविरोधी निदर्शने करण्यात आली. अनुप चव्हाण, रोहित राठोड, जितेंद्र राठोड, श्याम राठोड, दत्ता राठोड, अनिल राठोड, सत्यम जाधव यांच्या पुढाकारात आंदोलन करण्यात आले. शेतकरी विधवा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी होते. संपूर्ण गावातून अंत्ययात्रा फिरल्यानंतर शेवटी स्मशानभूमीजवळ अंत्यविधी करण्यात आला. शासनाने सरसकट कर्जमाफीची घोषणा केली नाही, तर पालकमंत्र्यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी विधवांनी दिला. कर्जमाफीच्या ‘जीआर’ची होळी नेर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहायचे. त्यांचे राज्य रयतेसाठी होते. मात्र महाराष्ट्र सरकार महाराजांचे नाव घेवून शेतकऱ्यांना फसवत आहे, असे सांगून कर्जमाफीसंदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णयाची येथे होळी करण्यात आली. युवा शेतकरी संघर्ष समितीने दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून निषेध नोंदविला. कर्जमाफी अत्यंत फसवी आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्या गेली. शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा निर्णय घेण्यात आला. शासन बोगस, जीआर बोगस अशा घोषणा देत जीआरची होळी करण्यात आली. यावेळी गोपाल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य निखिल पाटील जैत, संतोष अरसोड, सतीश चवात, मुकुंद गावंडे, गौरव नाईकर, रवी गाडे, पुरुषोत्तम राठोड, सदानंद पेचे, स्वप्नील शेटे, मिथून अलाटे, मिथून भगत, विशाल चहाकार, राजू भोयर, सुदाम राठोड, गजानन दहेलकर, विजय राठोड, गणेश ठाकरे, गोपाल खडसे आदी उपस्थित होते.