शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

स्वाईन फ्ल्यूची वणी तालुक्यात दस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:41 IST

दमट वातावरणामुळे सशक्तपणे सक्रीय झालेल्या स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूने वणी तालुक्यात दस्तक दिली आहे. तालुक्यातील मेंढोली येथील एका इसमाचा या आजाराने मृत्यू झाल्याने नागरिकांत भय पसरले आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभाग सतर्क : भद्रावती, घुग्गुसमार्गे तालुक्यात विषाणूंचा शिरकाव, औैषध साठा मुबलक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दमट वातावरणामुळे सशक्तपणे सक्रीय झालेल्या स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूने वणी तालुक्यात दस्तक दिली आहे. तालुक्यातील मेंढोली येथील एका इसमाचा या आजाराने मृत्यू झाल्याने नागरिकांत भय पसरले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य उपचार व काळजी घ्यावी, त्यातून आजारावर मात करणे सोपे जाईल, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, या विषयात शासनाच्या आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली असून या आजारावर उपचार करण्यासाठी मुबलक औैषध साठा उपलब्ध करण्यात येत आहे.गेल्या महिन्याभरात स्वाईन फ्ल्यूच्या आजाराची लक्षणे असणारे किमान १० ते १२ रुग्ण वणी तालुक्यात आढळून आलेत. त्यांपैकी मेंढोलीत एकाचा मृत्यू झाला. या आजाराच्या विषाणूने भद्रावती, घुग्घूस मार्गे वणी तालुक्यात प्रवेश केल्याचे सांगण्यात येते. सर्वप्रथम शिंदोला परिसरात हा विषाणू सक्रीय झाला. त्या पट्टयातील काही गावांमध्ये स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असलेले रुग्ण आढळून आलेत. मात्र योग्य उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.वणी शहरातही एका महिलेला स्वाईन फ्ल्यू झाल्याच्या शंकेवरून नागपूरला उपचारासाठी हलविण्यात आले. तिच्याही प्रकृतीत आता सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या आजाराचे निदान करणाºया प्रयोगशाळा राज्यात केवळ चार ठिकाणी आहेत. नागपूर, पुणे येथे प्रत्येकी एक व मुंबईत दोन प्रयोगशाळा आहेत. आजाराच्या निदानाचा अहवाल प्राप्त होण्यासाठी किमान १० ते १२ दिवस लागतात. निदान हाती लागल्यानंतर रुग्णावर उपचार केले जायचे. त्यामुळे उपचाराला विलंब होऊन रुग्णाची प्रकृती खालावत असे. मात्र आता ज्या रुग्णात स्वाईन फ्ल्यूची लक्षणे दिसतात, त्यांच्यावर तातडीने त्याच आजारासंदर्भात लागणारा औषधोपचार केला जात आहे.सध्या या भागातील वातावरण अतिशय दमट आहे. त्यामुळे विविध आजारांच्या विषाणूंचा फैैलाव वेगाने होत आहे. प्रत्येकच घरात सर्दी, ताप, खोकला, अशा सामान्य आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत.अशी घ्यावी काळजी१) गर्दीच्या ठिकाणे शक्यतोवर जाणे टाळावे.२) हस्तांदोलन करु नये.३) वारंवार हात धुवून स्वच्छ करावे.४) शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल ठेवावा.५) सर्दी, तापाच्या रुग्णांनी ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा.अशी आहेत लक्षणे१) सर्दी, खोकला होणे.२) तीव्र स्वरूपाचा ताप येणे.३) गळ्यात दुखणे.४) श्वास घेण्यासाठी त्रास होणे.स्वाईन फ्ल्यू या आजारावर चांगल्या पद्धतीची औषधी उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य काळजी आणि उपचार घेतल्याने हा आजार निश्चितपणे बरा होतो. कुणाला स्वत:मध्ये अशी लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. त्यातून या आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे जाते.-डॉ.गणेश लिमजे, वणी