शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

स्वाईन फ्ल्यूची वणी तालुक्यात दस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:41 IST

दमट वातावरणामुळे सशक्तपणे सक्रीय झालेल्या स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूने वणी तालुक्यात दस्तक दिली आहे. तालुक्यातील मेंढोली येथील एका इसमाचा या आजाराने मृत्यू झाल्याने नागरिकांत भय पसरले आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभाग सतर्क : भद्रावती, घुग्गुसमार्गे तालुक्यात विषाणूंचा शिरकाव, औैषध साठा मुबलक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दमट वातावरणामुळे सशक्तपणे सक्रीय झालेल्या स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूने वणी तालुक्यात दस्तक दिली आहे. तालुक्यातील मेंढोली येथील एका इसमाचा या आजाराने मृत्यू झाल्याने नागरिकांत भय पसरले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य उपचार व काळजी घ्यावी, त्यातून आजारावर मात करणे सोपे जाईल, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, या विषयात शासनाच्या आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली असून या आजारावर उपचार करण्यासाठी मुबलक औैषध साठा उपलब्ध करण्यात येत आहे.गेल्या महिन्याभरात स्वाईन फ्ल्यूच्या आजाराची लक्षणे असणारे किमान १० ते १२ रुग्ण वणी तालुक्यात आढळून आलेत. त्यांपैकी मेंढोलीत एकाचा मृत्यू झाला. या आजाराच्या विषाणूने भद्रावती, घुग्घूस मार्गे वणी तालुक्यात प्रवेश केल्याचे सांगण्यात येते. सर्वप्रथम शिंदोला परिसरात हा विषाणू सक्रीय झाला. त्या पट्टयातील काही गावांमध्ये स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असलेले रुग्ण आढळून आलेत. मात्र योग्य उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.वणी शहरातही एका महिलेला स्वाईन फ्ल्यू झाल्याच्या शंकेवरून नागपूरला उपचारासाठी हलविण्यात आले. तिच्याही प्रकृतीत आता सुधारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या आजाराचे निदान करणाºया प्रयोगशाळा राज्यात केवळ चार ठिकाणी आहेत. नागपूर, पुणे येथे प्रत्येकी एक व मुंबईत दोन प्रयोगशाळा आहेत. आजाराच्या निदानाचा अहवाल प्राप्त होण्यासाठी किमान १० ते १२ दिवस लागतात. निदान हाती लागल्यानंतर रुग्णावर उपचार केले जायचे. त्यामुळे उपचाराला विलंब होऊन रुग्णाची प्रकृती खालावत असे. मात्र आता ज्या रुग्णात स्वाईन फ्ल्यूची लक्षणे दिसतात, त्यांच्यावर तातडीने त्याच आजारासंदर्भात लागणारा औषधोपचार केला जात आहे.सध्या या भागातील वातावरण अतिशय दमट आहे. त्यामुळे विविध आजारांच्या विषाणूंचा फैैलाव वेगाने होत आहे. प्रत्येकच घरात सर्दी, ताप, खोकला, अशा सामान्य आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत.अशी घ्यावी काळजी१) गर्दीच्या ठिकाणे शक्यतोवर जाणे टाळावे.२) हस्तांदोलन करु नये.३) वारंवार हात धुवून स्वच्छ करावे.४) शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल ठेवावा.५) सर्दी, तापाच्या रुग्णांनी ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा.अशी आहेत लक्षणे१) सर्दी, खोकला होणे.२) तीव्र स्वरूपाचा ताप येणे.३) गळ्यात दुखणे.४) श्वास घेण्यासाठी त्रास होणे.स्वाईन फ्ल्यू या आजारावर चांगल्या पद्धतीची औषधी उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य काळजी आणि उपचार घेतल्याने हा आजार निश्चितपणे बरा होतो. कुणाला स्वत:मध्ये अशी लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. त्यातून या आजारावर नियंत्रण मिळविणे सोपे जाते.-डॉ.गणेश लिमजे, वणी