शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

साखरेचा गोडवा झाला कमी

By admin | Updated: August 14, 2015 02:40 IST

गेल्या सात दिवसांत साखरेच्या भावात ४०० ते ६०० रूपये प्रति क्विंटल वाढ झाल्याने साखरेचा गोडवा कमी झाला आहे.

भाव वधारले : तुरडाळीच्या भावात विक्रमी वाढ, सामान्यांचे मोडले कंबरडेनीलेश यमसनवार  पाटणबोरीगेल्या सात दिवसांत साखरेच्या भावात ४०० ते ६०० रूपये प्रति क्विंटल वाढ झाल्याने साखरेचा गोडवा कमी झाला आहे. साखर आता कडू झाली आहे. येत्या काही दिवसात साखर ३० रूपये प्रति किलोवर जाण्याचे संकेत प्राप्त होत आहे. सोबतच तुरडाळीच्या दरातही विक्री वाढ झाल्याने सामान्य जनतेच्या ताटातून वरणच गायब होण्याची शक्यता आहे.भारत सरकारने साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यानुसार इराण देशाला ४० लाख टन साखर निर्यात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परिणामी आता अचानक साखरेच्या दरात रेकॉर्ड ब्रेक भाववाढ होत आहे. गेल्या सात दिवसांपूर्वी घाऊक बाजारात दोन हजार १०० रूपये प्रती क्विंटल दर असलेली साखर आता दोन हजार ५५० रूपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. परिणामी किरकोळ दरात २५ रूपये प्रति किलोप्रमाणे मिळणारी साखर आता ३० रूपये दराने विकत घ्यावी लागत आहे. साखरेचे दर वाढल्याने चहाची गोडी कमी होत आहे. अचानक झालेल्या भाववाढीमुळे कारखानदार, दलाल, साठेबाज यांची मात्र चांदी झाली आहे. दुसरीकडे साखरेचा गोडवा कमी झाल्याने सामान्य जनतेला ती कडू लागत आहे.साखरेसोबतच गेल्या आठवडाभरात तुरडाळीचे भावही वधारले आहेत. एक हजार ५०० रूपये क्विंटलने तुरडाळीचे दर वाढले आहेत. आठवडाभरापूर्वी घाऊक बाजारात १०० रूपये प्रती किलोप्रमाणी मिळणारी तुरडाळ आता ११५ रूपये प्रती किलोवर पोहोचली आहे. किरकोळ बाजारात तर तुरडाळ १२० ते १३० रूपये प्रति किलोप्रमाणे विकली जात आहे. तुरडाळीच्या भाववाढीमुळे अन्य सर्वच डाळींचे भावही वधारले आहेत. येत्या काही दिवसात सर्वच डाळींच्या दरात पुन्हा वाढ होण्याचे संकेत मिळत आहे. यासोबतच शेंगदाणा १०० रूपये, फुटाणा ८०, पोहा ४०, खोबरा १८० रूपये प्रति किलोप्रमाणे विकला जात आहे. अन्नधान्य व डाळींच्या किंमती चांगल्याच वाढल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेटच कोलमडून पडले आहे. डाळींसोबतच भापिालाही महागला आहे. त्यामुळे दररोजच्या जेवणासाठी नेमकी कोणती भाजी करावी, असा प्रश्न महिलांना सतावत आहे. डाळी महागल्याने सामान्य जनतेच्या ताटातून आता वरणच गायब होण्याची शक्यता बळावली.