शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

साखरेचा गोडवा झाला कमी

By admin | Updated: August 14, 2015 02:40 IST

गेल्या सात दिवसांत साखरेच्या भावात ४०० ते ६०० रूपये प्रति क्विंटल वाढ झाल्याने साखरेचा गोडवा कमी झाला आहे.

भाव वधारले : तुरडाळीच्या भावात विक्रमी वाढ, सामान्यांचे मोडले कंबरडेनीलेश यमसनवार  पाटणबोरीगेल्या सात दिवसांत साखरेच्या भावात ४०० ते ६०० रूपये प्रति क्विंटल वाढ झाल्याने साखरेचा गोडवा कमी झाला आहे. साखर आता कडू झाली आहे. येत्या काही दिवसात साखर ३० रूपये प्रति किलोवर जाण्याचे संकेत प्राप्त होत आहे. सोबतच तुरडाळीच्या दरातही विक्री वाढ झाल्याने सामान्य जनतेच्या ताटातून वरणच गायब होण्याची शक्यता आहे.भारत सरकारने साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यानुसार इराण देशाला ४० लाख टन साखर निर्यात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परिणामी आता अचानक साखरेच्या दरात रेकॉर्ड ब्रेक भाववाढ होत आहे. गेल्या सात दिवसांपूर्वी घाऊक बाजारात दोन हजार १०० रूपये प्रती क्विंटल दर असलेली साखर आता दोन हजार ५५० रूपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. परिणामी किरकोळ दरात २५ रूपये प्रति किलोप्रमाणे मिळणारी साखर आता ३० रूपये दराने विकत घ्यावी लागत आहे. साखरेचे दर वाढल्याने चहाची गोडी कमी होत आहे. अचानक झालेल्या भाववाढीमुळे कारखानदार, दलाल, साठेबाज यांची मात्र चांदी झाली आहे. दुसरीकडे साखरेचा गोडवा कमी झाल्याने सामान्य जनतेला ती कडू लागत आहे.साखरेसोबतच गेल्या आठवडाभरात तुरडाळीचे भावही वधारले आहेत. एक हजार ५०० रूपये क्विंटलने तुरडाळीचे दर वाढले आहेत. आठवडाभरापूर्वी घाऊक बाजारात १०० रूपये प्रती किलोप्रमाणी मिळणारी तुरडाळ आता ११५ रूपये प्रती किलोवर पोहोचली आहे. किरकोळ बाजारात तर तुरडाळ १२० ते १३० रूपये प्रति किलोप्रमाणे विकली जात आहे. तुरडाळीच्या भाववाढीमुळे अन्य सर्वच डाळींचे भावही वधारले आहेत. येत्या काही दिवसात सर्वच डाळींच्या दरात पुन्हा वाढ होण्याचे संकेत मिळत आहे. यासोबतच शेंगदाणा १०० रूपये, फुटाणा ८०, पोहा ४०, खोबरा १८० रूपये प्रति किलोप्रमाणे विकला जात आहे. अन्नधान्य व डाळींच्या किंमती चांगल्याच वाढल्याने गृहिणींचे स्वयंपाकघरातील बजेटच कोलमडून पडले आहे. डाळींसोबतच भापिालाही महागला आहे. त्यामुळे दररोजच्या जेवणासाठी नेमकी कोणती भाजी करावी, असा प्रश्न महिलांना सतावत आहे. डाळी महागल्याने सामान्य जनतेच्या ताटातून आता वरणच गायब होण्याची शक्यता बळावली.