शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

स्वाभिमानीच्या दाव्यामुळे महायुतीची झाली कोंडी

By admin | Updated: June 24, 2014 00:06 IST

महायुतीत सहभागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वणी विधानसभेवर दावा सांगितल्याने महायुतीची ‘गोची’ झाली आहे. तूर्तास वणीची जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला असून स्वाभिमानीच्या दाव्यामुळे

रवींद्र चांदेकर - वणीमहायुतीत सहभागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वणी विधानसभेवर दावा सांगितल्याने महायुतीची ‘गोची’ झाली आहे. तूर्तास वणीची जागा महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला असून स्वाभिमानीच्या दाव्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. भाजप मात्र वरकरणी शांत दिसत आहे.आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता सर्वच पक्ष कामाला लागले आहे. निवडणूक जेमतेम चार महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय झाले आहे. राजकीय खलबते रंगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने भाजपाचे हंसराज अहीर यांना तारल्याने विधानसभेत महायुती बाजी मारेल, अशी हवा तयार करण्यात येत आहे. महायुतीत वणी विधानसभेची जागा सध्या शिवसेनेच्या वाट्याला आहे. मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विश्वास नांदेकर पराभूत झाले, असे सांगत प्रथम युतीतील भाजपाने वणीवर आपला दावा ठोकला. त्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडे अधिकृत मागणीही करण्यात आली.भाजपाच्या दाव्यानंतर आता महायुतीत सहभागी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही वणीवर आपला दावा ठोकला आहे. स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते गजानन अहमदाबादकर यांनी वणीत हा दावा जाहीरही केला. स्वाभिमानीच्या या अचानकच्या दाव्यामुळे आता शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. महायुतीचे जागा वाटप अद्याप झाले नाही. मात्र जागा वाटपाच्या वेळी वणीचा मुद्दा आता नक्कीच उपस्थित होणार आहे. महायुतीत वाटेकरी वाढल्याने युतीची गोची झाली आहे. वणीवर खरा हक्क आमचाच असे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. मात्र आता स्वाभिमानीने सेनेच्या मार्गात अडसर निर्माण केला. कदाचित त्याला भाजपाची छुपी साथ असावी, असा कयास लावला जात आहे. भाजपाच्या गोटात मात्र कमालीची शांतता पाहायला मिळत आहे. केवळ पक्ष स्तरावर वणीची जागा मागून त्यांनी आपले ‘पिल्लू’ सोडून दिले आहे. त्यानंतर भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते शांत बसले आहेत. त्यांच्या मनात नेमकश काय सुरू आहे, याचा कुणालाच थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे महायुतीत सर्व काही ठिकठाक आहे, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.