शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महागाव तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:56 IST

महागाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदारांमार्फत कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन पाठविले. केंद्र शासन व महाआघाडी ...

महागाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदारांमार्फत कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन

पाठविले.

केंद्र शासन व महाआघाडी शासन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संदर्भाने अनेक ज्वलंत समस्यांवर गंभीर नाही. शेतकरी प्रचंड नैराश्येच्या गर्तेत आहेत. त्यांचे जगणे अवघड झाले आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडून आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनातून केला आहे.

काेविड - १९ व नैसर्गिक आपत्तीमुळे हंगाम २०२० - २१ पूर्ण वाईट गेला. सर्व उद्योग थांबलेले असताना कृषी क्षेत्र कष्टाच्या बळावर शेतकऱ्यांनी जीव धोक्यात टाकून न थांबता काम सुरू ठेवले. चालू खरीप हंगामात सोयाबीन, कापूस पीक ओल्या दुष्काळात वाया गेले. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यांना शासनाने आर्थिक मदत घोषित केली नाही. महाबीजच्यावतीने व खासगी बियाणे कंपनीच्यावतीने बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला १२ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अधिकृत पंचनामे झाले. परंतु दुर्दैवाने अद्याप निकृष्ट बियाणे प्रकरणी कारवाई झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आठ दिवसात न्याय न मिळाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा मनीष जाधव यांनी निवेदनातून दिला आहे.