शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महागाव तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:56 IST

महागाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदारांमार्फत कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन पाठविले. केंद्र शासन व महाआघाडी ...

महागाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदारांमार्फत कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन

पाठविले.

केंद्र शासन व महाआघाडी शासन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संदर्भाने अनेक ज्वलंत समस्यांवर गंभीर नाही. शेतकरी प्रचंड नैराश्येच्या गर्तेत आहेत. त्यांचे जगणे अवघड झाले आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडून आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनातून केला आहे.

काेविड - १९ व नैसर्गिक आपत्तीमुळे हंगाम २०२० - २१ पूर्ण वाईट गेला. सर्व उद्योग थांबलेले असताना कृषी क्षेत्र कष्टाच्या बळावर शेतकऱ्यांनी जीव धोक्यात टाकून न थांबता काम सुरू ठेवले. चालू खरीप हंगामात सोयाबीन, कापूस पीक ओल्या दुष्काळात वाया गेले. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यांना शासनाने आर्थिक मदत घोषित केली नाही. महाबीजच्यावतीने व खासगी बियाणे कंपनीच्यावतीने बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला १२ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अधिकृत पंचनामे झाले. परंतु दुर्दैवाने अद्याप निकृष्ट बियाणे प्रकरणी कारवाई झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आठ दिवसात न्याय न मिळाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा मनीष जाधव यांनी निवेदनातून दिला आहे.