शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महागाव तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:56 IST

महागाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदारांमार्फत कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन पाठविले. केंद्र शासन व महाआघाडी ...

महागाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात तहसीलदारांमार्फत कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन

पाठविले.

केंद्र शासन व महाआघाडी शासन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संदर्भाने अनेक ज्वलंत समस्यांवर गंभीर नाही. शेतकरी प्रचंड नैराश्येच्या गर्तेत आहेत. त्यांचे जगणे अवघड झाले आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडून आपले अपयश लपविण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनातून केला आहे.

काेविड - १९ व नैसर्गिक आपत्तीमुळे हंगाम २०२० - २१ पूर्ण वाईट गेला. सर्व उद्योग थांबलेले असताना कृषी क्षेत्र कष्टाच्या बळावर शेतकऱ्यांनी जीव धोक्यात टाकून न थांबता काम सुरू ठेवले. चालू खरीप हंगामात सोयाबीन, कापूस पीक ओल्या दुष्काळात वाया गेले. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यांना शासनाने आर्थिक मदत घोषित केली नाही. महाबीजच्यावतीने व खासगी बियाणे कंपनीच्यावतीने बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाला १२ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. अधिकृत पंचनामे झाले. परंतु दुर्दैवाने अद्याप निकृष्ट बियाणे प्रकरणी कारवाई झाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले आहे. अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आठ दिवसात न्याय न मिळाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा मनीष जाधव यांनी निवेदनातून दिला आहे.