शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
5
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
6
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
8
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
9
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
10
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
11
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
12
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
13
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
14
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
15
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
16
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
17
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
18
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
19
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
20
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

चुकीचे प्रस्ताव दिल्यास निलंबन

By admin | Updated: September 23, 2015 06:03 IST

जिल्हा नियोजन समितीत कामे प्रस्तावित करताना जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होणारी कामेच प्राधान्याने

यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीत कामे प्रस्तावित करताना जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होणारी कामेच प्राधान्याने घ्यावी. कोणताही वैयक्तिक हेतू त्यातून दिसू नये. दबावात कामे प्रस्तावित करू नका. चुकीची किंवा दबावाने कमी महत्त्वाची कामे प्रस्तावित केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी त्यांच्या विभागास प्रस्ताव सादर केला जाईल, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले. महसूल भवन येथे जिल्हा वार्षिक योजनेच्या आदिवासी उपयोजनेचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा नियोजन अधिकारी डी. टी. राठोड, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी यू. के. सकवान, हिंदूराव चव्हाण, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, उपवनसंरक्षक गुरूप्रसाद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेसाठी प्रस्ताव सादर करताना कोणती आणि कुठली कामे केली जाणार आहे, त्यासाठी खर्च किती येईल, याची सविस्तर माहिती प्रस्तावासोबत असणे आवश्यक आहे. एकदा निधी मंजूर झाली की आवश्यक नसणारी कामेही यंत्रणेच्यावतीने केली जाते. त्याऐवजी अत्यावश्यक कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे कामे निश्चित होऊन प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी विभागांनी प्रस्तावासोबत कामांच्या याद्या सादर करणे अत्यावश्यक आहे. ज्या विभागांच्या याद्या प्रस्तावासोबत येणार नाही, अशा विभागांना निधीच मंजूर केला जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सन २०१६-१७ या वषार्साठी कामे प्रस्तावित करताना प्रत्येक विभागाने आपल्यास प्राप्त निधीतून अधिकाधिक लोककल्याणकारी कामे कशी करता येतील, याचा विचार करून कामे प्रस्तावित करणे आवश्यक आहे. ज्या विभागांना राज्यस्तरावरून निधी मिळतो त्यांनी शक्यतो जिल्हा वार्षिक योजनेतून निधी प्रस्तावित करू नये. असा शिल्लक निधी अन्य अत्यावश्यक सुविधांसाठी वापरता येईल. मात्र राज्यस्तरावरून निधी उपलब्ध न झाल्यास वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल. कामांच्या याद्या सादर होऊन मान्यता मिळेपर्यंत निधी दिला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)प्रस्तावासाठी प्रत्येक विभागास अर्धा तास२०१६-१७ या वर्षासाठी विभागांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर सदर प्रस्तावाची छाननी जिल्हाधिकारी स्वत: प्रत्येक विभागास अधार्तास वेळ देऊन करणार आहे. प्रस्तावातील बाबी आणि कामे योग्य आहे का? कामे प्रस्तावित करणे योग्य नसताना ते केले गेले आहे का ? याची शहानिशा आपण करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.