शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

चुकीचे प्रस्ताव दिल्यास निलंबन

By admin | Updated: September 23, 2015 06:03 IST

जिल्हा नियोजन समितीत कामे प्रस्तावित करताना जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होणारी कामेच प्राधान्याने

यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीत कामे प्रस्तावित करताना जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होणारी कामेच प्राधान्याने घ्यावी. कोणताही वैयक्तिक हेतू त्यातून दिसू नये. दबावात कामे प्रस्तावित करू नका. चुकीची किंवा दबावाने कमी महत्त्वाची कामे प्रस्तावित केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी त्यांच्या विभागास प्रस्ताव सादर केला जाईल, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले. महसूल भवन येथे जिल्हा वार्षिक योजनेच्या आदिवासी उपयोजनेचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा नियोजन अधिकारी डी. टी. राठोड, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी यू. के. सकवान, हिंदूराव चव्हाण, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, उपवनसंरक्षक गुरूप्रसाद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेसाठी प्रस्ताव सादर करताना कोणती आणि कुठली कामे केली जाणार आहे, त्यासाठी खर्च किती येईल, याची सविस्तर माहिती प्रस्तावासोबत असणे आवश्यक आहे. एकदा निधी मंजूर झाली की आवश्यक नसणारी कामेही यंत्रणेच्यावतीने केली जाते. त्याऐवजी अत्यावश्यक कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे कामे निश्चित होऊन प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी विभागांनी प्रस्तावासोबत कामांच्या याद्या सादर करणे अत्यावश्यक आहे. ज्या विभागांच्या याद्या प्रस्तावासोबत येणार नाही, अशा विभागांना निधीच मंजूर केला जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सन २०१६-१७ या वषार्साठी कामे प्रस्तावित करताना प्रत्येक विभागाने आपल्यास प्राप्त निधीतून अधिकाधिक लोककल्याणकारी कामे कशी करता येतील, याचा विचार करून कामे प्रस्तावित करणे आवश्यक आहे. ज्या विभागांना राज्यस्तरावरून निधी मिळतो त्यांनी शक्यतो जिल्हा वार्षिक योजनेतून निधी प्रस्तावित करू नये. असा शिल्लक निधी अन्य अत्यावश्यक सुविधांसाठी वापरता येईल. मात्र राज्यस्तरावरून निधी उपलब्ध न झाल्यास वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल. कामांच्या याद्या सादर होऊन मान्यता मिळेपर्यंत निधी दिला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)प्रस्तावासाठी प्रत्येक विभागास अर्धा तास२०१६-१७ या वर्षासाठी विभागांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर सदर प्रस्तावाची छाननी जिल्हाधिकारी स्वत: प्रत्येक विभागास अधार्तास वेळ देऊन करणार आहे. प्रस्तावातील बाबी आणि कामे योग्य आहे का? कामे प्रस्तावित करणे योग्य नसताना ते केले गेले आहे का ? याची शहानिशा आपण करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.