शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

चुकीचे प्रस्ताव दिल्यास निलंबन

By admin | Updated: September 23, 2015 06:03 IST

जिल्हा नियोजन समितीत कामे प्रस्तावित करताना जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होणारी कामेच प्राधान्याने

यवतमाळ : जिल्हा नियोजन समितीत कामे प्रस्तावित करताना जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होणारी कामेच प्राधान्याने घ्यावी. कोणताही वैयक्तिक हेतू त्यातून दिसू नये. दबावात कामे प्रस्तावित करू नका. चुकीची किंवा दबावाने कमी महत्त्वाची कामे प्रस्तावित केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी त्यांच्या विभागास प्रस्ताव सादर केला जाईल, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले. महसूल भवन येथे जिल्हा वार्षिक योजनेच्या आदिवासी उपयोजनेचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा नियोजन अधिकारी डी. टी. राठोड, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी यू. के. सकवान, हिंदूराव चव्हाण, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, उपवनसंरक्षक गुरूप्रसाद यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेसाठी प्रस्ताव सादर करताना कोणती आणि कुठली कामे केली जाणार आहे, त्यासाठी खर्च किती येईल, याची सविस्तर माहिती प्रस्तावासोबत असणे आवश्यक आहे. एकदा निधी मंजूर झाली की आवश्यक नसणारी कामेही यंत्रणेच्यावतीने केली जाते. त्याऐवजी अत्यावश्यक कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे कामे निश्चित होऊन प्राधान्यक्रम ठरविण्यासाठी विभागांनी प्रस्तावासोबत कामांच्या याद्या सादर करणे अत्यावश्यक आहे. ज्या विभागांच्या याद्या प्रस्तावासोबत येणार नाही, अशा विभागांना निधीच मंजूर केला जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सन २०१६-१७ या वषार्साठी कामे प्रस्तावित करताना प्रत्येक विभागाने आपल्यास प्राप्त निधीतून अधिकाधिक लोककल्याणकारी कामे कशी करता येतील, याचा विचार करून कामे प्रस्तावित करणे आवश्यक आहे. ज्या विभागांना राज्यस्तरावरून निधी मिळतो त्यांनी शक्यतो जिल्हा वार्षिक योजनेतून निधी प्रस्तावित करू नये. असा शिल्लक निधी अन्य अत्यावश्यक सुविधांसाठी वापरता येईल. मात्र राज्यस्तरावरून निधी उपलब्ध न झाल्यास वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल. कामांच्या याद्या सादर होऊन मान्यता मिळेपर्यंत निधी दिला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)प्रस्तावासाठी प्रत्येक विभागास अर्धा तास२०१६-१७ या वर्षासाठी विभागांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर सदर प्रस्तावाची छाननी जिल्हाधिकारी स्वत: प्रत्येक विभागास अधार्तास वेळ देऊन करणार आहे. प्रस्तावातील बाबी आणि कामे योग्य आहे का? कामे प्रस्तावित करणे योग्य नसताना ते केले गेले आहे का ? याची शहानिशा आपण करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.