शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सर्वेक्षण खूप झाले, आता अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:21 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात सर्वेक्षणे खूप झाली, आता अंमलबजावणीची वेळ आली आहे. शासकीय यंत्रणेने योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे आदेश : जिल्ह्यातील समस्यांवर आमदारांची नागपुरात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात सर्वेक्षणे खूप झाली, आता अंमलबजावणीची वेळ आली आहे. शासकीय यंत्रणेने योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.विधान भवनात आयोजित यवतमाळ जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, विधान परिषद सदस्य हरीभाऊ राठोड, ख्वाजा बेग, तानाजी सावंत, विधानसभा सदस्य मनोहरराव नाईक, डॉ.अशोक उईके, राजेंद्र नजरधणे, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजू तोडसाम, मुख्य सचिव सुमित मल्लीक, अतिरिक्त्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार आदी उपस्थित होते. जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या विषयात सर्वेक्षण सुरू आहे. ते बहुतांश विषय शेतीशी संबंधित आहे. परंतु आता सर्वेक्षणे खूप झाली, त्यातील प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.बोंडअळीचा उल्लेखही नाहीनागपुरातील या बैठकीमध्ये देशभर गाजलेल्या कीटकनाशक फवारणी मृत्यू आणि कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याचा कोणताही विषय निघाला नाही. आमदारांपैकीही फारसे कुणी बोलले नसल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुकबैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे कौतुक केले. देशमुख यांच्या नेतृत्वात चांगले काम होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.