शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

सर्वेक्षण खूप झाले, आता अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:21 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात सर्वेक्षणे खूप झाली, आता अंमलबजावणीची वेळ आली आहे. शासकीय यंत्रणेने योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे आदेश : जिल्ह्यातील समस्यांवर आमदारांची नागपुरात बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात सर्वेक्षणे खूप झाली, आता अंमलबजावणीची वेळ आली आहे. शासकीय यंत्रणेने योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले.विधान भवनात आयोजित यवतमाळ जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, विधान परिषद सदस्य हरीभाऊ राठोड, ख्वाजा बेग, तानाजी सावंत, विधानसभा सदस्य मनोहरराव नाईक, डॉ.अशोक उईके, राजेंद्र नजरधणे, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजू तोडसाम, मुख्य सचिव सुमित मल्लीक, अतिरिक्त्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक एम. राज कुमार आदी उपस्थित होते. जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या विषयात सर्वेक्षण सुरू आहे. ते बहुतांश विषय शेतीशी संबंधित आहे. परंतु आता सर्वेक्षणे खूप झाली, त्यातील प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.बोंडअळीचा उल्लेखही नाहीनागपुरातील या बैठकीमध्ये देशभर गाजलेल्या कीटकनाशक फवारणी मृत्यू आणि कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याचा कोणताही विषय निघाला नाही. आमदारांपैकीही फारसे कुणी बोलले नसल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुकबैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे कौतुक केले. देशमुख यांच्या नेतृत्वात चांगले काम होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.