शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’मधील शस्त्रक्रिया ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 22:12 IST

शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईचा फटका येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बसत आहे. शस्त्रक्रियेच्या उपकरणांचे निर्जंतुकीकरणासाठी पाणीच नसल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची नामुष्की मेडिकल प्रशासनावर आली आहे.

ठळक मुद्देयवतमाळातील पाणीटंचाईचा फटका : दररोज हवे २० हजार लिटर पाणी

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईचा फटका येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बसत आहे. शस्त्रक्रियेच्या उपकरणांचे निर्जंतुकीकरणासाठी पाणीच नसल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची नामुष्की मेडिकल प्रशासनावर आली आहे. शुक्रवारी होणाऱ्या १३ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रियेसाठीच पाणी राखून ठेवले आहे.यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. या ठिकाणी सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी अद्ययावत शस्त्रक्रियागृह आहे. तिथे दररोज २० हजार लिटर पाण्याची आवश्यकता भासते. अशुद्ध पाणी शुद्ध करून शस्त्रक्रियेची उपकरणे स्वच्छ केली जातात. तसेच शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारे कापड धुण्यासाठीही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. यासाठी चार लाख लिटर क्षमतेचा सम्प आहे. शिवाय दोन विहिरी व चार बोअरवेल्स आणि नळ योजनेच्या पाण्याची टाकी अशी व्यवस्था आहे. टंचाई निर्माण झाल्याने येथील जलस्रोत आटले आहे. परिणामी शस्त्रक्रियेसाठी पुरेसे पाणीच उपलब्ध होत नाही. रुग्णालय प्रशासनाने पाणी मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मार्चपासून जाणवत असलेल्या टंचाईचे नियोजन करून आतापर्यंत शस्त्रक्रिया सुरळीत पार पडल्या. मात्र आता पाणीच नसल्याने रुग्णालय प्रशासनच हतबल झाले आहे.शल्यचिकित्सा विभाग (सर्जरी) व अस्थीव्यंगोपचार (आर्थोपेडीक) या दोन विभागातच प्रामुख्याने मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. येथे पाण्याचा भरपूर वापर होतो. पाणी नसल्याने दोनही विभागातील १३ शस्त्रक्रिया शुक्रवारी सकाळी ऐनवेळेवर थांबवाव्या लागल्या. या संकट काळात नियोजन करताना प्रशासनाची कसरत होत आहे. स्त्रीरोग, प्रसूती विभागातील शस्त्रक्रिया थांबविणे शक्य होत नाही. नाक-कान-घसा (इएनटी), नेत्ररोग (आॅपथॅम्प) येथे पाण्याचा कमी वापर असल्याने या शस्त्रक्रिया सुरू आहेत.आता रुग्णालयाला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थानिक शाखेकडून दररोज ११ हजार लिटर पाणी टँकरद्वारे दिले जात आहे. तर शिवसेनेने एक टँकर पूर्णवेळ उपलब्ध करून दिला आहे. मात्र ही व्यवस्था अतिशय तुटपुंजी असून सर्व वार्डातील प्रसाधनगृहासाठी लागणारे पाणी, रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना दैनंदिन वापरासाठी लागणारे पाणी, डॉक्टर व कर्मचाºयांचे निवासस्थान, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थी वसतिगृहांना लागणारे पाणी याचा आकडा फार मोठा आहे.टँकरने चार लाख लिटर क्षमतेच्या सम्पमध्ये काही हजार लिटर पाणी टाकून उपयोग होत नाही. हे पाणी सम्पच्या तळालाच जाऊन बसते. त्यामुळे मोटरद्वारे उपसा करता येत नाही. अडचणी सोडविण्यासाठी रुग्णालय प्रशासनाची धडपड सुरू आहे. रुग्णालयातील विहिरीतील गाळ काढण्याचे काम नगरपरिषदेने अर्धवटच सोडून दिले. आता हा गाळ काढण्यासाठी पालिकेकडून पैशाची मागणी होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे टंचाईत वाढ झाली.सामाजिक जाणीवेतून दात्यांनी पुढे येण्याची गरजशासकीय रुग्णालयात उद्भवलेल्या पाणीटंचाईचा फटका थेट रुग्णांनाच बसत आहे. या संकटाच्या काळात सामाजिक जाणीवेतून विविध घटकांनी पुढे येण्याची गरज आहे. रुग्णालयाला शक्य होईल तितक्या टँकरद्वारे पाणी दिसल्यास येथील कारभार सुरळीत होऊन रुग्णांचे जीव वाचविता येऊ शकतात. यासाठी शहरातील सामाजिक संघटनांसह विविध दात्यांनी मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.जीव जात असताना बांधकामावर वारेमाप पाणीपाण्याअभावी शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया थांबल्या आहे. तर दुसरीकडे यवतमाळ शहरातील बांधकामावर पाण्याचा वारेमाप वापर केला जात आहे. गंभीरबाब म्हणजे भर टंचाईत नगरपरिषद व बांधकाम विभाग नवीन कामांना सुरुवात करीत आहे. एकीकडे पाण्याअभावी जीव जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असता केवळ कंत्राटदारांचे हित जोपासणाºया यंत्रणेचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. हा विरोधाभास केवळ राजकीय उदासीनतेतून निर्माण झाला आहे.एमआयडीसीत गोखी प्रकल्पाचे पाणी रुग्णालयासाठी मोफत उपलब्ध आहे. त्यांनी टँकरद्वारे तेथून पाणी आणावे, असे निर्देश पूर्वीच दिले आहे. त्याउपरही काही अडचणी असतील तर सोडविण्यात येईल.- चंद्रकांत जाजूप्रभारी जिल्हाधिकारीयवतमाळ.रुग्णालयातील पाणीसंकट भीषण असून याचे नियोजन करताना कसरत होत आहे. उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून आतापर्यंत पाण्याचे नियोजन केले. परंतु आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अशा संकटाच्या काळात समाजाकडून सहकार्याची अपेक्षा आहे.- डॉ. मनीष श्रीगिरीवारअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

टॅग्स :Yawatmal Medical Collegeयवतमाळ मेडिकल कॉलेज