शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
5
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
6
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
8
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
9
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
10
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
11
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
12
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
13
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
14
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
15
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
16
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
17
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
18
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
19
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
20
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

दारूबंदी समर्थक व विरोधक आक्रमक

By admin | Updated: May 26, 2016 00:09 IST

जिल्हा दारूबंदीकरिता एकीकडे आंदोलन सुरू असताना आता काही महिलांनीच या दारूबंदी आंदोलनाला विरोध दर्शविला आहे.

आक्रोश मोर्चा : आमदारांच्या घराला घालणार घेराव, दुसरीकडे अनेक महिलांचाच दारूबंदीला विरोधवणी : जिल्हा दारूबंदीकरिता एकीकडे आंदोलन सुरू असताना आता काही महिलांनीच या दारूबंदी आंदोलनाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे दारूबंदी समर्थक आणि विरोधक आक्रमकपणे एकमेकांविरूद्ध दंड थोपटून मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी, या मागणीसाठी गेले वर्षभर विविध संघटना आंदोलन करीत आहे. कधी मोर्चा, कधी घेराव, तर कधी अनोखे आंदोलन करून ते दारूबंदीची मागणी लावून धरत आहे. त्याच अनुषंगाने येत्या २६ मे रोजी दुपारी १२ वाजता श्रीगुरूदेव सेनेतर्फे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या घरावर महिलांचा आक्रोश मोर्चा धडकणार आहे. जिल्हा दारूमुक्त करण्याची घोषणा करावी, या मागणीला घेऊन गेले वर्षभर जिल्हाभर आंदोलन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनावरही महिलांनी मोर्चा काढून जिल्हा दारूबंदीची मागणी केली. त्यावेळी जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी मोर्चाला भेट देऊन जिल्हा दारूमुक्त करण्याचे आश्वासन दिले. त्या आश्वासनाचे काय झाले व दारूबंदीकरिता शासन स्तरावर काय कार्यवाही चालू आहे, या संदर्भात आमदार बोदकुरवार यांच्या घराला घेराव घालण्यात येणार आहे.जिल्हा दारूबंदीची शासनाने घोषणा करावी, अशी प्रमुख मागणी आहे. सोबतच चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्याच्या सीमेवरील काही दारू दुकाने व बीअरबारचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, महिलांनी मतदान करून देशी दारूचे दुकान बंद केल्यास ते पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला स्थगिती द्यावी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू दुकानदारांकडून बेकायदेशीररीत्या स्वामिनींच्या नावे निधी गोळा केला असून त्याची सीबीआय चौकशी करावी, दोषींवर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून निष्कासित करावे, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.या आक्रोश मोर्चाला खुद्द काही महिलांनीच विरोध दर्शवून मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यात त्यांनी दारूबंदीचा निषेध व्यक्त केला. वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू होऊन त्याचे परिणाम विपरीत झाल्याचा दावा त्यांनी केला. तेथील प्रत्येक हॉटेल, पानठेला व प्रत्येक मोहल्ल्यात घरोघरी दारू विक्री सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. या दोनही जिल्ह्यात अवैध आणि बनावटी दारूचा महापूर वाहात आहे. त्याची जाणीव सर्व राजकीय व्यक्ती व सरकारलाही आहे. या दोन्ही जिल्ह्यात ३०० ते ४०० किलोमीटर अंतरावरून दारू आणली जाते, याचीही जाणीव सरकारला आहे, असा टोलाही या महिलांनी लगावला आहे.शासनाने चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात अधिकृत दारू परवाने बंद केले. मात्र सध्या त्यापेक्षाही १०० पटीने अधिक दारू विक्री त्या जिल्ह्यात होत असल्याचा आरोप महिलांनी केला. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी लागू केल्यास शौकिनांना दारू मिळणार नाही, याची हमी शासन किंवा कुणीही देऊ शकत नसल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्ह्यात दारूबंदी झाल्यास लगतच्या वाशिम, अमरावती, नागपूर जिल्ह्यातून तसेच शेजारच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून दारू येण्याची शक्यताही या महिलांनी वर्तविली आहे. जिल्हा दारूबंदीऐवजी केंद्र व राज्य शासनाने प्रथम दारू उत्पादन करणारे कारखाने बंद करावे. जिल्हाच नव्हे, तर देश व राज्यातच दारूबंदी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)