शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

दारूबंदी समर्थक व विरोधक आक्रमक

By admin | Updated: May 26, 2016 00:09 IST

जिल्हा दारूबंदीकरिता एकीकडे आंदोलन सुरू असताना आता काही महिलांनीच या दारूबंदी आंदोलनाला विरोध दर्शविला आहे.

आक्रोश मोर्चा : आमदारांच्या घराला घालणार घेराव, दुसरीकडे अनेक महिलांचाच दारूबंदीला विरोधवणी : जिल्हा दारूबंदीकरिता एकीकडे आंदोलन सुरू असताना आता काही महिलांनीच या दारूबंदी आंदोलनाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे दारूबंदी समर्थक आणि विरोधक आक्रमकपणे एकमेकांविरूद्ध दंड थोपटून मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करावी, या मागणीसाठी गेले वर्षभर विविध संघटना आंदोलन करीत आहे. कधी मोर्चा, कधी घेराव, तर कधी अनोखे आंदोलन करून ते दारूबंदीची मागणी लावून धरत आहे. त्याच अनुषंगाने येत्या २६ मे रोजी दुपारी १२ वाजता श्रीगुरूदेव सेनेतर्फे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या घरावर महिलांचा आक्रोश मोर्चा धडकणार आहे. जिल्हा दारूमुक्त करण्याची घोषणा करावी, या मागणीला घेऊन गेले वर्षभर जिल्हाभर आंदोलन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनावरही महिलांनी मोर्चा काढून जिल्हा दारूबंदीची मागणी केली. त्यावेळी जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी मोर्चाला भेट देऊन जिल्हा दारूमुक्त करण्याचे आश्वासन दिले. त्या आश्वासनाचे काय झाले व दारूबंदीकरिता शासन स्तरावर काय कार्यवाही चालू आहे, या संदर्भात आमदार बोदकुरवार यांच्या घराला घेराव घालण्यात येणार आहे.जिल्हा दारूबंदीची शासनाने घोषणा करावी, अशी प्रमुख मागणी आहे. सोबतच चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्याच्या सीमेवरील काही दारू दुकाने व बीअरबारचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, महिलांनी मतदान करून देशी दारूचे दुकान बंद केल्यास ते पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला स्थगिती द्यावी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू दुकानदारांकडून बेकायदेशीररीत्या स्वामिनींच्या नावे निधी गोळा केला असून त्याची सीबीआय चौकशी करावी, दोषींवर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी सेवेतून निष्कासित करावे, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.या आक्रोश मोर्चाला खुद्द काही महिलांनीच विरोध दर्शवून मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यात त्यांनी दारूबंदीचा निषेध व्यक्त केला. वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू होऊन त्याचे परिणाम विपरीत झाल्याचा दावा त्यांनी केला. तेथील प्रत्येक हॉटेल, पानठेला व प्रत्येक मोहल्ल्यात घरोघरी दारू विक्री सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. या दोनही जिल्ह्यात अवैध आणि बनावटी दारूचा महापूर वाहात आहे. त्याची जाणीव सर्व राजकीय व्यक्ती व सरकारलाही आहे. या दोन्ही जिल्ह्यात ३०० ते ४०० किलोमीटर अंतरावरून दारू आणली जाते, याचीही जाणीव सरकारला आहे, असा टोलाही या महिलांनी लगावला आहे.शासनाने चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात अधिकृत दारू परवाने बंद केले. मात्र सध्या त्यापेक्षाही १०० पटीने अधिक दारू विक्री त्या जिल्ह्यात होत असल्याचा आरोप महिलांनी केला. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी लागू केल्यास शौकिनांना दारू मिळणार नाही, याची हमी शासन किंवा कुणीही देऊ शकत नसल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्ह्यात दारूबंदी झाल्यास लगतच्या वाशिम, अमरावती, नागपूर जिल्ह्यातून तसेच शेजारच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून दारू येण्याची शक्यताही या महिलांनी वर्तविली आहे. जिल्हा दारूबंदीऐवजी केंद्र व राज्य शासनाने प्रथम दारू उत्पादन करणारे कारखाने बंद करावे. जिल्हाच नव्हे, तर देश व राज्यातच दारूबंदी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)