शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नेर पंचायत समितीच्या कारभाराने गाठला कळस

By admin | Updated: December 11, 2014 23:15 IST

पंचायत समितीच्या ढेपाळलेल्या कारभारामुळे तालुक्यातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. कुठलेही काम वेळेत होत नसल्याने त्यांना वारंवार या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.

नेर : पंचायत समितीच्या ढेपाळलेल्या कारभारामुळे तालुक्यातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. कुठलेही काम वेळेत होत नसल्याने त्यांना वारंवार या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. असाच काहीसा अनुभव वटफळी येथील नागरिकांना आला. त्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला. यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. कुठलेही काम तत्काळ निकाली काढण्याची या पंचायत समितीला जणू अ‍ॅलर्जी झाली आहे. घरकुलासोबतच विविध प्रकारच्या लोकोपयोगी योजना राबविण्यात या पंचायत समितीकडून विलंब केला जातो. वटफळी येथील रमाई आवास योजनेच्या कायम प्रतीक्षा यादीला ग्रामपंचायतीने मंजुरात दिली. मात्र पंचायत समितीने हा अहवाल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सादर केला नाही. परिणामी लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागले. सन २०१२ च्या दारिद्र्यरेषे खालील कार्डानुसार १५८ लोकांच्या नावाचा समावेश घरकूल यादीत करण्यात आला होता. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही पंचायत समितीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला यादी पाठविली नाही. ग्रामपंचायतीनेही यात हयगय केल्याचा आरोप आहे. पंचायत समितीने आता आपली जबाबदारी झटकली आहे. दरम्यान पंचायत समितीने संबंधित ग्रामसेवकांना ही यादी मागविली. परंतु देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे सांगितले जाते. आता घरकुलाच्या यादीत नवे असलेल्या लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. घरकूल याद्यांवर आठ दिवसात निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा विश्वंभर जांभुळकर, शेखर गजभिये, रवींद्र राऊत, सुरेश तिरपुडे यांनी दिला आहे. यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)