शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उच्चशिक्षित तरुणाच्या आत्महत्येने समाजमन सुन्न

By admin | Updated: March 17, 2017 02:46 IST

बालपणी मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. मुलगा शिकून मोठा होईल, नोकरीला लागेल

शेलूची घटना : ज्ञानेश्वर झाला होता बी.टेक. प्रकाश लामणे  पुसद बालपणी मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. मुलगा शिकून मोठा होईल, नोकरीला लागेल आणि कुटुंबाला चांगले दिवस येतील, असा भक्कम आशावाद, पण नियतीच्या मनात काही वेगळेच. बीटेक झालेल्या उच्चशिक्षित तरुणाने काही कळायच्या आत आपली जीवनयात्रा संपविली. अपंग वडिलांचा आधार आणि आईची आशाच संपली. या आत्महत्येने समाजमन सुन्न झाले. ज्ञानेश्वर विठ्ठल मस्के (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. पुसद तालुक्यातील शेलू बु. या लहानशा गावात तो राहात होता. लहानपणापासूनच शिक्षणात हुशार. पोटाला चिमटा देवून आई-वडिलांनी त्याला शिकविले. ज्ञानेश्वरने इयत्ता दहावीत व बारावीत ७० टक्केपेक्षा अधिक गुण मिळविले. पुसदच्या दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयातून त्याने बीटेक केले. चार वर्षीय अभ्यासक्रम पूर्ण करून सध्या तो बारामतीत एका खासगी कंपनीत नोकरीला होता. ज्ञानेश्वरच्या घरची परिस्थिती जेमतेम. वडील विठ्ठलरावच्या नावावर कोरडवाहू एक एकर जमीन. त्यातच ते अर्धांगवायूने पीडित. आईने मोलमजुरी करून या चाणाक्ष्य बुद्धीच्या ज्ञानेश्वरला कमी पडू दिले नाही. मुलानेही नाव कमावले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. ज्ञानेश्वर महिन्या-दोन महिन्याने गावी आई-वडिलांच्या काळजीने येत होता. यावेळीही तो ९ मार्चला शेलूला आला. होळी आणि रंगपंचमी झाल्यानंतर बारामतीला जाणार होता. आई-वडील ज्ञानेश्वरच्या येण्याने सुखावले होते. कारण तोच त्यांच्या म्हातारपणाचा आधार होता. मात्र १५ मार्च रोजी दुपारी २ वाजता काळाने डाव साधला. आई रुक्मिणीबाई शेतात कामाला गेली होती. वडील विठ्ठल अपंग असल्याने ते घराच्या ओसरीत बसून होते, तर ज्ञानेश्वर एकटाच घरात टीव्ही पाहात होता. काही कळायच्या आत ज्ञानेश्वरने कंबरपट्ट्याच्या मदतीने गळफास लावून घेतला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. हुशार व चाणाक्ष्य बुद्धीच्या ज्ञानेश्वरने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, हे अनुत्तरितच आहे. पोलीस या कारणांचा शोध घेत आहेत. शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रूंचा पूर दाटला होता. जगण्याचा आधार गेला एकुलता एक ज्ञानेश्वर आम्हाला सोडून गेला. आता आम्ही कोणासाठी जगावं, असा टाहो त्याची आई रुक्मिणीबाई फोडते तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहात नाही. रुक्मिणीबाई केवळ ज्ञानेश्वर...ज्ञानेश्वर... म्हणून हंबरडा फोडत आहे. आमच्या जगण्याचा आधारच गेला, असे म्हणत ती अश्रूंना वाट मोकळी करते.