शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पणन महासंघाच्या चुकीमुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ

By admin | Updated: February 25, 2015 02:25 IST

कापूस पणन महासंघाच्या गलथान कारभारामुळे ४७ क्विंटलचा चेक देण्याऐवजी केवळ चार क्विंटल ६० किलोचा चेक शेतकऱ्याला दिला. त्यामुळे सदर शेतकरी विष घेऊन महासंघाच्या कार्यालयात गेला.

उमरखेड : कापूस पणन महासंघाच्या गलथान कारभारामुळे ४७ क्विंटलचा चेक देण्याऐवजी केवळ चार क्विंटल ६० किलोचा चेक शेतकऱ्याला दिला. त्यामुळे सदर शेतकरी विष घेऊन महासंघाच्या कार्यालयात गेला.उमरखेड तालुक्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाच्या गलथान कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. तालुक्यातील चातारी येथील शेतकरी बाबुराव देवराव माने यांनी २७ जानेवारीला ट्रॅक्टरद्वारे ४७ क्विंटल कापूस महासंघात दिला. या बाबतची काटा पावतीही त्यांनी घेतली. परंतु यवतमाळ येथील पणन महासंघाच्या कार्यालयाच्या दुर्लक्षित कारभारामुळे ४७ क्विंटलऐवजी केवळ चार क्विंटल ६० किलो कापसाचा धनादेश त्यांना देण्यात आला. हा धनादेश पाहून माने यांना धक्काच बसला. त्यांनी तडक पणन महासंघाचे कार्यालय सकाळी १० वाजताच गाठले आणि हा धनादेश चुकीचा असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतरही तेथील कर्मचारी त्यांची समस्या ऐकून घेण्यास तयार नव्हते. अखेरीस बाबुराव माने यांनी विषाचा डबा घेवून कार्यालयात प्रवेश केला आणि या प्रकरणी मला त्वरित न्याय द्या, अन्यथा मी येथेच आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले.हे ऐकून कार्यालयात एकच तारांबळ उडाली. ग्रेडर एम.जी. पुरणकर हे तत्काळ कार्यालयात हजर झाले आणि सदर प्रकरणाची चौकशी केली असता माने यांना मिळालेला चेक चुकीचा असल्याचे निदर्शनास आले. ही चुकी यवतमाळ कार्यालयाची आहे. त्यांच्यासोबत संपर्क साधून माने यांना न्याय दिला जाणार असल्याचे ग्रेडर यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. (शहर प्रतिनिधी)