शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

हजारो हेक्टरातील ऊस अद्यापही उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:58 IST

जिल्ह्याचा शुगर बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाºया पुसद आणि उमरखेड उपविभागातील हजारो हेक्टरवरील ऊस आजही शेतात उभा आहे. सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने खासगी कारखानदारांची मनमानी सुरू असून उंबरठे झिजवूनही कारखाने ऊस नेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देगाळपाची प्रतीक्षा : ऊस वाळत असल्याने शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : जिल्ह्याचा शुगर बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाºया पुसद आणि उमरखेड उपविभागातील हजारो हेक्टरवरील ऊस आजही शेतात उभा आहे. सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने खासगी कारखानदारांची मनमानी सुरू असून उंबरठे झिजवूनही कारखाने ऊस नेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतातील ऊस पाण्याअभावी वाळत असल्याचे चित्र आहे.उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे वसंत सहकारी साखर कारखाना आणि महागाव तालुक्यातील गुंज येथे सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करण्यात आली. परिणामी या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली. गुंज येथील साखर कारखाना अवसायनात जाऊन खासगी व्यवस्थापनाच्या घशात गेला. तर पोफाळी येथील साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून यंदा तर अद्यापही गाळपाला प्रारंभ झाला नाही. परिणामी या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. महागाव, पुसद, उमरखेड या तीन तालुक्यात शेतकऱ्यांचा ऊस आजही मोठ्या प्रमाणात शेतात उभा आहे. अनेक शेतकऱ्यांचाच तर नोंदणी केलेला ऊसही कारखाने तोडायला तयार नाही. शेतकरी कारखान्याचे उंबरठे झिजवित आहे. परंतु त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. शेतात उभा असलेला ऊस वाळत असल्याने शेतकºयांची चिंता वाढत आहे. गतवर्षीपर्यंत साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा दिसत होती. उसाची पळवापळवी सुरू होती. परंतु यंदा साखर कारखान्यात स्पर्धाच दिसत नाही. शेतकरी ऊस घेऊन जा असे सांगत असतानाही कारखाने टोळ्या पाठवायला तयार नाही. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस जाळण्याचा निर्णय घेतला आहे. डोळ्यात अश्रू आणून शेतकरी आपला ऊस जगविण्याचा प्रयत्न करीत आहे.साखर आयुक्तांकडून पुढाकाराची गरजमहागाव, पुसद, उमरखेड तालुक्यातील अधिक रिकव्हरी देणाऱ्या उसाला साखर कारखाने पसंती देत आहे. गुंज येथील नॅचरल शुगर रिकव्हरी देणारी ऊसच उचलत असल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. साखर आयुक्तांनी स्वत:हून पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्याची गरज आहे.