शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

हजारो हेक्टरातील ऊस अद्यापही उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:58 IST

जिल्ह्याचा शुगर बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाºया पुसद आणि उमरखेड उपविभागातील हजारो हेक्टरवरील ऊस आजही शेतात उभा आहे. सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने खासगी कारखानदारांची मनमानी सुरू असून उंबरठे झिजवूनही कारखाने ऊस नेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देगाळपाची प्रतीक्षा : ऊस वाळत असल्याने शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : जिल्ह्याचा शुगर बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाºया पुसद आणि उमरखेड उपविभागातील हजारो हेक्टरवरील ऊस आजही शेतात उभा आहे. सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने खासगी कारखानदारांची मनमानी सुरू असून उंबरठे झिजवूनही कारखाने ऊस नेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतातील ऊस पाण्याअभावी वाळत असल्याचे चित्र आहे.उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे वसंत सहकारी साखर कारखाना आणि महागाव तालुक्यातील गुंज येथे सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करण्यात आली. परिणामी या परिसरात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली. गुंज येथील साखर कारखाना अवसायनात जाऊन खासगी व्यवस्थापनाच्या घशात गेला. तर पोफाळी येथील साखर कारखाना अखेरच्या घटका मोजत असून यंदा तर अद्यापही गाळपाला प्रारंभ झाला नाही. परिणामी या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे. महागाव, पुसद, उमरखेड या तीन तालुक्यात शेतकऱ्यांचा ऊस आजही मोठ्या प्रमाणात शेतात उभा आहे. अनेक शेतकऱ्यांचाच तर नोंदणी केलेला ऊसही कारखाने तोडायला तयार नाही. शेतकरी कारखान्याचे उंबरठे झिजवित आहे. परंतु त्यांच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. शेतात उभा असलेला ऊस वाळत असल्याने शेतकºयांची चिंता वाढत आहे. गतवर्षीपर्यंत साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा दिसत होती. उसाची पळवापळवी सुरू होती. परंतु यंदा साखर कारखान्यात स्पर्धाच दिसत नाही. शेतकरी ऊस घेऊन जा असे सांगत असतानाही कारखाने टोळ्या पाठवायला तयार नाही. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस जाळण्याचा निर्णय घेतला आहे. डोळ्यात अश्रू आणून शेतकरी आपला ऊस जगविण्याचा प्रयत्न करीत आहे.साखर आयुक्तांकडून पुढाकाराची गरजमहागाव, पुसद, उमरखेड तालुक्यातील अधिक रिकव्हरी देणाऱ्या उसाला साखर कारखाने पसंती देत आहे. गुंज येथील नॅचरल शुगर रिकव्हरी देणारी ऊसच उचलत असल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. साखर आयुक्तांनी स्वत:हून पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकºयांना दिलासा देण्याची गरज आहे.