शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

वीज कंपनीच्या दुर्लक्षाने लाखोंचा ऊस खाक

By admin | Updated: November 30, 2015 02:22 IST

दारव्हा तालुक्यातील वरूड येथील निरंजन कुटे यांच्या शेतात विजेच्या तारांत घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने उसाला आग लागली.

ऊस खाक : दारव्हा तालुक्यातील वरूड येथील निरंजन कुटे यांच्या शेतात विजेच्या तारांत घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने उसाला आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण करीत शेतातील लाखो रुपयांचा ऊस भस्मसात केला. या शेतकऱ्याला भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.वरूड येथील घटना : लोंबकळणाऱ्या तारांच्या स्पार्किंगमुळे लागली आगयवतमाळ : जिल्ह्यातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. एकीकडे कृषिपंपाला वीज पुरवठा नसल्याने पिके सुकत आहे. तर दुसरीकडे लोंबकळलेल्या वीज तारांमुळे हातातोंडाशी आलेला घासही हिरावल्या जात आहे. दारव्हा तालुक्यातील वरूड येथे कृषिपंपाच्या लोंबकळलेल्या वीज तारांचे स्पार्किंग होऊन उसाला आग लागली. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.वरूड येथील निरंजन काशीनाथ कुटे या शेतकऱ्याने शेतात उसाची लागवड केली. मोठ्या मेहनतीने उसाचे पीक बहरले होते. शुक्रवारी सकाळी अचानक उसाला आग लागल्याचे आढळून आले. पाहता पाहता संपूर्ण ऊसच जळून खाक झाला. लोंबकाळलेली वीज तार तुटून पडल्यामुळे उसाला आग लागली. वीज कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. आधीच वीज कंपनीबाबत असलेला रोष या घटनेनंतर आणखी वाढला आहे. वीज वितरण कंपनीने नुकसान भरून द्यावे, अशी मागणीही या शेतकऱ्याने केली आहे. एकंदरच वीज कंपनीच्या कारभाराबाबत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोष आढळून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)