शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेकडो हेक्टरवरील ऊस शेतातच उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 22:00 IST

वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने उमरखेड तालुक्यातील शेतांमध्ये शेकडो हेक्टर ऊस उभा आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊस नेला नाही तर शेतातच पेटवून देण्याची वेळ शेतकºयांवर येणार आहे.

ठळक मुद्देऊस उत्पादक संकटात : वसंत कारखाना बंद असण्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने उमरखेड तालुक्यातील शेतांमध्ये शेकडो हेक्टर ऊस उभा आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊस नेला नाही तर शेतातच पेटवून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. तर काही ठिकाणी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.उमरखेड तालुक्याची कामधेनू असलेला साखर कारखाना यंदा बंद पडला आहे. संचालक मंडळाने कारखाना सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. परिणामी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. सुरुवातीला वसंत सहकारी साखर कारखाना सुरू होणार या आशेवर परिसरातील शेतकरी निर्धास्त होता. परंतु कारखाना अचानक बंद पडला. शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे. आता जानेवारी उजाडला. परंतु ऊस जाण्याची चिन्हे नाही. गतवर्षीपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीमागे फिरणारे कारखाने आता मात्र फिरकूनही पाहात नाही. आलेले कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. ऊसतोडणीसाठी बसविलेल्या टोळ्या शेतकऱ्यांकडून एकरी पाच हजार रुपयांची मागणी करतात.या परिसरातील ऊस उत्पादकांच्या नोंदी वसंतला होत्या. त्यामुळे त्यांचा ऊस योग्य वेळेवर नेला जायचा. पंरतु आता त्यांचा ऊस तोडण्यासाठी कुणीही तयार नाही. परिणामी शेतकरी भांबावून गेला आहे. ऊस जर तोडला नाही तर शेतकºयांना तो जाळावा लागणार आहे. यासाठी प्रशासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी आहे.कारखाना सुरू होण्याची चिन्हे नाहीवसंत सहकारी साखर कारखाना गत काही वर्षांपासून आर्थिक डबघाईस आला होता. गतवर्षी निच्चांकी गाळप करून कारखान्याचा पट्टा पडला. यावर्षी तर कारखाना सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा कारखाना सत्ताधारी भाजपाने आपल्या ताब्यात घेतला. सहकार क्षेत्रातील दिग्गज कारखान्याच्या अध्यक्षस्थानी बसविले. परंतु मंत्रालयापर्यंत प्रयत्न करूनही हा कारखाना सुरू झाला नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांसोबतच कामगारांचेही हाल होत आहे.