शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेकडो हेक्टरवरील ऊस शेतातच उभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 22:00 IST

वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने उमरखेड तालुक्यातील शेतांमध्ये शेकडो हेक्टर ऊस उभा आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊस नेला नाही तर शेतातच पेटवून देण्याची वेळ शेतकºयांवर येणार आहे.

ठळक मुद्देऊस उत्पादक संकटात : वसंत कारखाना बंद असण्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कढाणकी : वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने उमरखेड तालुक्यातील शेतांमध्ये शेकडो हेक्टर ऊस उभा आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊस नेला नाही तर शेतातच पेटवून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. तर काही ठिकाणी साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे.उमरखेड तालुक्याची कामधेनू असलेला साखर कारखाना यंदा बंद पडला आहे. संचालक मंडळाने कारखाना सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले. परिणामी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहे. सुरुवातीला वसंत सहकारी साखर कारखाना सुरू होणार या आशेवर परिसरातील शेतकरी निर्धास्त होता. परंतु कारखाना अचानक बंद पडला. शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे. आता जानेवारी उजाडला. परंतु ऊस जाण्याची चिन्हे नाही. गतवर्षीपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीमागे फिरणारे कारखाने आता मात्र फिरकूनही पाहात नाही. आलेले कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांची पिळवणूक करतात. ऊसतोडणीसाठी बसविलेल्या टोळ्या शेतकऱ्यांकडून एकरी पाच हजार रुपयांची मागणी करतात.या परिसरातील ऊस उत्पादकांच्या नोंदी वसंतला होत्या. त्यामुळे त्यांचा ऊस योग्य वेळेवर नेला जायचा. पंरतु आता त्यांचा ऊस तोडण्यासाठी कुणीही तयार नाही. परिणामी शेतकरी भांबावून गेला आहे. ऊस जर तोडला नाही तर शेतकºयांना तो जाळावा लागणार आहे. यासाठी प्रशासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी आहे.कारखाना सुरू होण्याची चिन्हे नाहीवसंत सहकारी साखर कारखाना गत काही वर्षांपासून आर्थिक डबघाईस आला होता. गतवर्षी निच्चांकी गाळप करून कारखान्याचा पट्टा पडला. यावर्षी तर कारखाना सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ताब्यात असलेला हा कारखाना सत्ताधारी भाजपाने आपल्या ताब्यात घेतला. सहकार क्षेत्रातील दिग्गज कारखान्याच्या अध्यक्षस्थानी बसविले. परंतु मंत्रालयापर्यंत प्रयत्न करूनही हा कारखाना सुरू झाला नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांसोबतच कामगारांचेही हाल होत आहे.