शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

‘त्या’ शेतकऱ्याचे मन वळविण्यात अखेर यश

By admin | Updated: October 8, 2015 02:08 IST

हाताला काम नाही, वडिलोपार्जित शेतही दुसऱ्याच्या नावावर अशा परिस्थितीत आत्महत्या करण्याची परवानगी मागणाऱ्या तालुक्यातील आरंभी येथील एका शेतकऱ्याचे मन वळविण्यात प्रशासनाला यश आले.

आत्महत्येची मागितली होती परवानगी : दिग्रस तहसीलदारांनी केले समुपदेशनसुनील हिरास दिग्रसहाताला काम नाही, वडिलोपार्जित शेतही दुसऱ्याच्या नावावर अशा परिस्थितीत आत्महत्या करण्याची परवानगी मागणाऱ्या तालुक्यातील आरंभी येथील एका शेतकऱ्याचे मन वळविण्यात प्रशासनाला यश आले. तहसीलदाराने सदर शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याचे समूपदेशन करीत आत्महत्येपासून परावृत्त केले. आरंभी येथील शेतकरी पृथ्वीराज बिभिषण राठोड (३०) या शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. याच शेतीवर तो पत्नी, दोन मुले आणि वृद्ध आई यांचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु या वडिलोपार्जित जमीन आजीच्या नावावर असून काका ती वाहत आहे. हीच जमीन पूर्वी त्याच्या वडिलांच्या नावे होती आणि ते वाहतही होते. आर्थिक व बिकट परिस्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे २००५ मध्ये वडील बिभिषण राठोड यांनी आत्महत्या केली होती. घरगुती व्यवहारामध्ये ही जमीन अडकली आहे. त्यामुळे पृथ्वीराजकडे कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी कोणतेही साधन नाही. हाताला काम नसल्याने मला कुटुंबासह आत्महत्या करू द्यावी, अशी विनंती त्याने जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे एका निवेदनातून केली होती. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेत तहसीलदारांना निर्देश दिले. तत्काळ शेतकऱ्याची भेट घेऊन त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बुधवारी तहसीलदार नितीन देवरे आरंभी येथे पोहोचले. त्यांनी शेतकऱ्याच्या परिस्थितीचे अवलोकन केले. तसेच याही परिस्थितीतून मार्ग निघेल. आत्महत्येतून काही साध्य होणार नाही, असे मार्गदर्शन केले. त्यामुळे पृथ्वीराजचे मतपरिवर्तन होऊन त्याने आता आपण आत्महत्या करणार नाही, अशी कबुली दिली. एवढेच नाही तर भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार मनात आणणार नाही, असे सांगितले. प्रशासनाने वेळीच दखल घेतल्याने आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला जीवदान मिळाले.