शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

उपविभागीय पालक सचिवांचे दौरे थंडावले

By admin | Updated: December 11, 2015 02:59 IST

मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी टार्गेट केलेल्या यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक महसूल उपविभागाला एक उच्चपदस्थ सनदी अधिकारी पालक सचिव म्हणून देण्यात आले होते.

समस्या जैसे थे : ‘आऊटपूट’ झिरो, शेतकरी आत्महत्या सुरूच यवतमाळ : मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी टार्गेट केलेल्या यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक महसूल उपविभागाला एक उच्चपदस्थ सनदी अधिकारी पालक सचिव म्हणून देण्यात आले होते. मात्र अलिकडे त्यांचे आपल्या उपविभागातील दौरे थंडावले असून तेथील समस्या मात्र ‘जैसे थे’च असल्याची ओरड नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने वैदर्भीय मुख्यमंत्री लाभले. युती सरकार स्थापन होताच फडणवीस यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले. येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अकोलाबाजार परिसरातील पिंपरी बुटी या एका गावात रात्रीचा मुक्कामही ठोकला होता. गावकऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. या समस्या मार्गी लागाव्या म्हणून सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रत्येक महसूल विभागासाठी पालक म्हणून नियुक्तीही केली गेली. त्यात यवतमाळला दिनेशकुमार जैन, वणी मुकेश खुल्लर, दारव्हा व्ही.गिरीराज, पुसद के.एच. गोविंदराज, उमरखेड राजगोपाल देवरा, राळेगाव विकास खारगे तर केळापूर महसूल उपविभागाला पालक सचिव म्हणून पी.के. देशमुख यांची नियुक्ती केली गेली होती. पूर्वी संपूर्ण जिल्ह्याला एक पालक सचिव होते. मात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक उपविभागाला एक पालक सचिव दिला गेला. या सचिवांनी आपल्या उपविभागात एक-दोन दौरे करून आढावा बैठका घेतल्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे सचिव उपविभागात फिरकले नसल्याचे गावकरी सांगतात. मुंबईत वातानुकूलित कक्षात बसणाऱ्या सचिवांना थेट उपविभागात पाठवूनही तेथील समस्या मार्गी लागल्या नसल्याची ओरड ऐकायला मिळते. एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली असेल तर त्यावर लक्ष केंद्रीत करून या आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याची व त्यावर इतरांच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची जबाबदारी या सचिवांवर सोपविली गेली होती. मात्र त्यांच्या ‘उपाययोजना’ फारश्या उपयोगी ठरल्या नाही. आजही या सर्वच महसूल उपविभागात शेतकरी आत्महत्या होताना दिसत आहे. त्या मागील कारण दुसरे-तिसरे काही नसून नापिकी व कर्जबाजारीपणा हेच असल्याचे पुढे आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) गावकरी म्हणतात, ग्रामसेवक-तलाठी भेटले तरी देव पावला प्रत्येक महसूल उपविभागाला थेट प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी दिल्याने ग्रामीण जनता ‘रिलॅक्स’ होईल, शासकीय स्तरावर कामे मार्गी लागण्याबाबतची ग्वाही मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ‘आम्हाला सचिव नको, तर गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आरोग्य सेविका’ ही गाव प्रशासनातील मंडळी दररोज उपलब्ध व्हावी, अशा अपेक्षांचा सूर गावकऱ्यांमधून ऐकायला मिळाला. गाव प्रशासनातील मंडळी वेळेवर उपलब्ध झाली तरी आमची कामे क्षणात मार्गी लागतील, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यवतमाळात अनेक आढावा बैठक झाल्या मात्र त्यात हे पालक सचिव दिसले नाही.