शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

देशाला महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे

By admin | Updated: January 27, 2015 23:39 IST

जगात भारताची ओळख तरुणांचा देश म्हणून आहे. आपल्या देशातील तरुणांच्या कौशल्याची संपूर्ण जगात मागणी आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारतातील तरुण अतुलनीय कार्य करीत आहेत.

यवतमाळ : जगात भारताची ओळख तरुणांचा देश म्हणून आहे. आपल्या देशातील तरुणांच्या कौशल्याची संपूर्ण जगात मागणी आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारतातील तरुण अतुलनीय कार्य करीत आहेत. देशाच्या विकासात तरुणांनी योगदान दिले तर आम्ही आणखी वेगाने विकासात पुढे जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी या दिशेने प्रयत्न करून गाव, शहर, राज्य आणि देशाचा विकास करण्यासाठी पुढे येऊन देशाला महासत्ता बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी येथे केले.जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘युफोरिया-१५’ या स्नेहसंमेलनात उद्घाटक म्हणून ना. राठोड बोलत होते. अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळचे आमदार मदन येरावार, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ.जी.आर. बमनोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, कार्यक्रमाचे समन्वयक विभागप्रमुख प्रा. पंकज एम. पंडित उपस्थित होते. ना.संजय राठोड म्हणाले, यवतमाळच्याच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या विकासात जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे विकासातील योगदान कुणालाही विसरणे शक्य नाही. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय तज्ज्ञांची नवी पिढी घडवित असून हे काम अखंडपणे महाविद्यालय करीत आहे. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना अशा स्नेहसंमेलनातून ऊर्जा मिळते. सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी संकटात आहे. यापूर्वीच्या सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. या संकटाच्या वेळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले. पालकमंत्र्यांनी तरुणांना खास करून विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्लाही यावेळी दिला. (नगर प्रतिनिधी)