शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

विद्यार्थी, चाकरमान्यांचे हाल

By admin | Updated: December 18, 2015 02:57 IST

राज्य परिवहन महांडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने गुरूवारी वणी, पांढरकवडा, मारेगाव व झरी तालुक्यातील प्रवाशांसोबत विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.

एसटीचा संप : प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगारांचा एल्गारवणी : राज्य परिवहन महांडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने गुरूवारी वणी, पांढरकवडा, मारेगाव व झरी तालुक्यातील प्रवाशांसोबत विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक ठप्प पडल्याने प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेसने (इंटक) संपाची हाक दिली होती. त्याला वणी व पांढरकवडा आगारात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिणामी वणी व पांढरकवडा आगारातून सुटणाऱ्या बसफेऱ्या गुरूवारी सकाळपासूनच सुटल्या नाहीत. वणी आगारातून सकाळपासून एकही बस आगाराबाहेर निघाली नाही. सर्व बस आगारातच उभ्या होत्या. एस.टी. कर्मचाऱ्यांनी आगार परिसरातच ठिय्या मांडला होता. वणी आणि पांढरकवडा ही दोनही उपविभागीय ठिकाणे आहेत. या ठिकाणी दररोज चार तालुक्यातील ग्रामस्थ विविध कामांसाठी येतात. विविध कार्यालयातील शासकीय कर्मचारीही दररोज अप-डाउन करतात. मात्र गुरूवारी संप असल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांना परत जाण्यासाठी बसच नव्हती. सोबतच शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गुरूवारी शाळेपासून मुकावे लागले, अन्यथा खासगी प्रवासी वाहुतकीचा आधार घेऊन पोहोचावे लागले. वणी येथून अनेक कर्मचारी मारेगाव व झरीला दररोज जाणे-येणे करतात. वणीत तालुक्यातून महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. या सर्वांना गुरूवारी संपाचा फटका बसला. इतर सामान्य प्रवाशांनाही अवैध वाहतुकीचा आश्रय घ्यावा लागला. अनेक प्रवासी चौकशी कक्षाजवळ उभे राहून बसची विचारणा करीत होती. मात्र तेथेही कुणीच नव्हते. त्यामुळे सर्वच प्रवशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या संपात वणीत १४0 कर्मचारी सहभागी होते. आगाराचे जवळपास तीन लाख रूपयांचे उत्पन्न बुडाले. ४१ बसफेऱ्या बंद होत्या. केवळ मानव विकास मिशनच्या चार बस तेवढ्या आगाराबाहेर पडल्या होत्या. वेतनवाढीची मुख्य मागणी असल्याने या संपाला इंटकशिवाय इतर संघटनांनीही पाठींबा देत संपात सहभाग घेतला होता. परिणामी हा संप १00 टक्के यशस्वी झाल्याचा दावा इंटकने केला आहे. इतर संघटनांचे सदस्यही संपात सहभागी झाल्याने संप यशस्वी ठरला. (कार्यालय प्रतिनिधी)काय आहेत एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्याराज्य वीज वितरण कामगारांप्रमाणे २५ टक्के पगारवाढ मिळण्याकरिता औद्योगीक कलह कायदा १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार रद्द करावा, अशी संपकऱ्यांची प्रमुख मागणी होती. याशिवाय एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ द्यावी, सन २००२ ते २०१२ पर्यंत ज्या कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केली, त्यांना नियमित वेतनश्रेणी देऊन वेतन निश्चिती करावी, चालक व वाहकांचे ड्युटी अलोकेशन संगणीकृत करून टी-९ रोटेशनची अंमलबजावणी करावी, कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१२ नंतर नियमित वेतनश्रेणी देताना कराराचा लाभ द्यावा, चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांकरिता संगणीकृत रजा व्यवस्थापन लागू करावे, करारामुळे झालेल्या वेतन निश्चितीमधील त्रुटी दूर कराव्यात, सर्व यांत्रिक कर्मचाऱ्यांना ग्रेडेशनचा लाभ द्यावा, कर्मचाऱ्यांच्या आपसात विनंती बदल्या कराव्या, आदी मागण्यांसाठी हा संप होता.पांढरकवडा येथेही संप यशस्वीपांढरकवडा : इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांकरिता पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय संपाला येथेही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपात आगारातील कामगार, चालक व वाहक सहभागी झाले होते.गुरूवारी सकाळपासून येथील आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. एकही बस फलाटावर लागली नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी खासगी वाहनाने, तर काही ठिकाणी तेलंगणा परिवहनच्या वाहनांमुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. या बंदमुळे आगाराचे लाखोंचे नुकसान झाले. या संपाचे नेतृत्व इंटकचे तालुकाध्यक्ष मंगेश बावनकुळे यांनी केले. आगारातील ३१० कर्मचारी संपात सहभागी झाले. सकाळपासून बसफेऱ्या बंद होत्या. या संपाला इतरही संघटनांनीही पाठींबा दिला. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झााले. कित्येक प्रवाशी संप त्वरित संपून बस सुटेल, अशी अपेक्षा धरून बसस्थानकाच्या परिसरातच बसून होते. (शहर प्रतिनिधी)