शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी, चाकरमान्यांचे हाल

By admin | Updated: December 18, 2015 02:57 IST

राज्य परिवहन महांडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने गुरूवारी वणी, पांढरकवडा, मारेगाव व झरी तालुक्यातील प्रवाशांसोबत विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.

एसटीचा संप : प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगारांचा एल्गारवणी : राज्य परिवहन महांडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने गुरूवारी वणी, पांढरकवडा, मारेगाव व झरी तालुक्यातील प्रवाशांसोबत विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक ठप्प पडल्याने प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेसने (इंटक) संपाची हाक दिली होती. त्याला वणी व पांढरकवडा आगारात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिणामी वणी व पांढरकवडा आगारातून सुटणाऱ्या बसफेऱ्या गुरूवारी सकाळपासूनच सुटल्या नाहीत. वणी आगारातून सकाळपासून एकही बस आगाराबाहेर निघाली नाही. सर्व बस आगारातच उभ्या होत्या. एस.टी. कर्मचाऱ्यांनी आगार परिसरातच ठिय्या मांडला होता. वणी आणि पांढरकवडा ही दोनही उपविभागीय ठिकाणे आहेत. या ठिकाणी दररोज चार तालुक्यातील ग्रामस्थ विविध कामांसाठी येतात. विविध कार्यालयातील शासकीय कर्मचारीही दररोज अप-डाउन करतात. मात्र गुरूवारी संप असल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांना परत जाण्यासाठी बसच नव्हती. सोबतच शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गुरूवारी शाळेपासून मुकावे लागले, अन्यथा खासगी प्रवासी वाहुतकीचा आधार घेऊन पोहोचावे लागले. वणी येथून अनेक कर्मचारी मारेगाव व झरीला दररोज जाणे-येणे करतात. वणीत तालुक्यातून महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. या सर्वांना गुरूवारी संपाचा फटका बसला. इतर सामान्य प्रवाशांनाही अवैध वाहतुकीचा आश्रय घ्यावा लागला. अनेक प्रवासी चौकशी कक्षाजवळ उभे राहून बसची विचारणा करीत होती. मात्र तेथेही कुणीच नव्हते. त्यामुळे सर्वच प्रवशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या संपात वणीत १४0 कर्मचारी सहभागी होते. आगाराचे जवळपास तीन लाख रूपयांचे उत्पन्न बुडाले. ४१ बसफेऱ्या बंद होत्या. केवळ मानव विकास मिशनच्या चार बस तेवढ्या आगाराबाहेर पडल्या होत्या. वेतनवाढीची मुख्य मागणी असल्याने या संपाला इंटकशिवाय इतर संघटनांनीही पाठींबा देत संपात सहभाग घेतला होता. परिणामी हा संप १00 टक्के यशस्वी झाल्याचा दावा इंटकने केला आहे. इतर संघटनांचे सदस्यही संपात सहभागी झाल्याने संप यशस्वी ठरला. (कार्यालय प्रतिनिधी)काय आहेत एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्याराज्य वीज वितरण कामगारांप्रमाणे २५ टक्के पगारवाढ मिळण्याकरिता औद्योगीक कलह कायदा १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार रद्द करावा, अशी संपकऱ्यांची प्रमुख मागणी होती. याशिवाय एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ द्यावी, सन २००२ ते २०१२ पर्यंत ज्या कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केली, त्यांना नियमित वेतनश्रेणी देऊन वेतन निश्चिती करावी, चालक व वाहकांचे ड्युटी अलोकेशन संगणीकृत करून टी-९ रोटेशनची अंमलबजावणी करावी, कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१२ नंतर नियमित वेतनश्रेणी देताना कराराचा लाभ द्यावा, चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांकरिता संगणीकृत रजा व्यवस्थापन लागू करावे, करारामुळे झालेल्या वेतन निश्चितीमधील त्रुटी दूर कराव्यात, सर्व यांत्रिक कर्मचाऱ्यांना ग्रेडेशनचा लाभ द्यावा, कर्मचाऱ्यांच्या आपसात विनंती बदल्या कराव्या, आदी मागण्यांसाठी हा संप होता.पांढरकवडा येथेही संप यशस्वीपांढरकवडा : इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांकरिता पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय संपाला येथेही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपात आगारातील कामगार, चालक व वाहक सहभागी झाले होते.गुरूवारी सकाळपासून येथील आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. एकही बस फलाटावर लागली नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी खासगी वाहनाने, तर काही ठिकाणी तेलंगणा परिवहनच्या वाहनांमुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. या बंदमुळे आगाराचे लाखोंचे नुकसान झाले. या संपाचे नेतृत्व इंटकचे तालुकाध्यक्ष मंगेश बावनकुळे यांनी केले. आगारातील ३१० कर्मचारी संपात सहभागी झाले. सकाळपासून बसफेऱ्या बंद होत्या. या संपाला इतरही संघटनांनीही पाठींबा दिला. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झााले. कित्येक प्रवाशी संप त्वरित संपून बस सुटेल, अशी अपेक्षा धरून बसस्थानकाच्या परिसरातच बसून होते. (शहर प्रतिनिधी)