शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा ओढा महानगराकडे

By admin | Updated: May 3, 2015 00:00 IST

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे स्थलांतर होण्याची अनेक कारणे असली तरी मोठ्या शहरात व नामांकित शैक्षणिक संस्थेत ...

विद्यार्थ्यांचे स्थलांतरण : नामवंत शिक्षण संस्थेत प्रवेशासाठी धडपड, ग्रामीण भागात विद्यार्थीच मिळेनापुसद : शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे स्थलांतर होण्याची अनेक कारणे असली तरी मोठ्या शहरात व नामांकित शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेण्याची ‘क्रेझ’ हे मुख्य कारण असल्याचे दिसून येते. पुसद परिसरातून दरवर्षी नांदेड, लातूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोटा या व इतर ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्थलांतर होत असते.दहावी, बारावीनंतर पुढे उच्च शिक्षणासाठी कुठे जायचे, याची घरोघर चर्चा होत असते. कोणत्या संस्थेत प्रवेश घ्यावयाचा याचा सर्वच अंगानी विचार केला जातो. यात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी शिक्षण घेण्याची क्रेझ असतेच. शिवाय केंद्रीय प्रवेश पद्धतीमुळे कुठे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे इतर अनेक पर्यायांचा विचार करून ठेवणे भाग पडते. त्याचप्रमाणे काही कोर्सेस आपल्या भागात नसल्यानेही बाहेरगावचे महाविद्यालय निवडले जाते. संस्थेच्या माहितीपत्रकावरून तेथील वातावरण, मिळणाऱ्या सुविधा यांची भुरळही विद्यार्थ्यांना पडते. शिवाय आयआयटी, सीईटी, आय सेट आदी प्रवेश परीक्षांची तयारी करून घेणारे क्लासेसही मोठ्या शहरात असल्याचा परिणामही स्थलांतर होण्यावर होतो.इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थी आर्कुटचा वापर करतात. तेव्हा इतर मित्र त्यांना विविध संस्थांची व तेथील वातावरणाची माहिती देतात. त्यातून तीन-चार व पाच तारांकित शैक्षणिक संस्थांची माहिती त्यांना मिळते. कोणती संस्था योग्य आहे अथवा नाही हे देखील कळते. आपले मित्र, मैत्रिणी तेथे शिकत आहेत. आपणही तेथे जावे, अशी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. घरी आई-वडिलांना ते या बाबत माहिती देतात. संस्थेची निवड करताना त्या ठिकाणी किती व कोणत्या कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी येतात याचीही चौकशी केली जाते. विविध शैक्षणिक संस्था प्रोफेशनल झाल्या आहेत. आपल्या संस्थेची जाहिरात करताना त्या मार्केटींग तंत्राचा वापर करतात. त्याचाही प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत असतो. उच्च शिक्षणासाठी मुले बाहेरगावी जाण्याचे त्यानंतर तिकडेच एखाद्या कंपनीत नोकरीला लागण्याचे प्रमाण वाढत आहे. तालुक्याच्या ठिकाणी स्वत:चे घर झालेले असल्याने आई-वडील आपल्या गावी राहणेच पसंत करतात. घर सोडून राहिल्यामुळे मुलांची निर्णयक्षमता वाढत असली तरी ज्या वयात मुलांना आईवडिलांच्या भावनिक आधाराची गरज असते त्या वयातच ते दूर जातात. आई-वडिलांनाही एकटेपणा जाणवतो. यातच वानप्रस्थाश्रम लवकर स्वीकारावा लागत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. एकंदरीत उच्च शिक्षणासाठी मेट्रो सिटीत जाण्याची क्रेझ तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागली आहे, हे तितकेच खरे. (तालुका प्रतिनिधी)