शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

विद्यार्थ्यांचा निर्वाहभत्ता ‘फारवर्ड’मध्ये अडकला

By admin | Updated: December 23, 2015 03:15 IST

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती अर्थात निर्वाहभत्ता ‘फारवर्ड’मध्ये अडकला असून संस्थानिकांकडून झालेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

संस्थानिकांची दिरंगाई : जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रालाही प्रतिसाद नाही यवतमाळ : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती अर्थात निर्वाहभत्ता ‘फारवर्ड’मध्ये अडकला असून संस्थानिकांकडून झालेल्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थांना दिलेल्या पत्रालाही प्रतिसाद मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे.समाजकल्याण विभागाकडून अकरावीनंतरच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यात जात प्रवर्गानुसार शिष्यवृत्तीचे कमी अधिक प्रमाण आहे. यातून विद्यार्थी पुस्तके, वह्या, लेखन साहित्य आदी खर्च भागवितात. परंतु या विभागांतर्गत शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या काही संस्थांनी मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जच आॅनलाईन प्रक्रियेने समाजकल्याण विभागाला पाठविले नाही. जवळपास एक हजार विद्यार्थी या शिष्यवृत्तीला मुकलेले आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जाची तपासणी महाविद्यालयस्तरावर केल्यानंतर प्राचार्यांच्या स्वाक्षरीने समाजकल्याण विभागाला अर्ज सादर करावा लागतो. परंतु काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. यासाठी वारंवार मुदत देण्यात आली. याचाही फायदा संस्थांनी घेतला नाही. विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी समाजकल्याण विभागाने पत्रव्यवहार केला. या संस्था प्रक्रिया पूर्ण करत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले. यालाही प्रतिसाद मिळालेला नाही. आता समाज कल्याण विभागाने टोकाचे पाऊल उचलले आहे.शिष्यवृत्तीचे अर्ज आॅनलाईन सादर न केल्यास महाविद्यालयांना जबाबदार धरले जाणार आहे. आता या संस्थांंना ३१ डिसेंबरपर्यंत संधी देण्यात आली आहे. आता काय निर्णय होतो हे महत्वाचे आहे. (वार्ताहर) तर शिष्यवृत्ती महाविद्यालयांना द्यावी लागेलयवतमाळ जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रकरणे ‘फारवर्ड’ केली नाही. परिणामी विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास संबंधित महाविद्यालयाला जबाबदार धरले जाणार आहे. शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काची रक्कम महाविद्यालयांना द्यावी लागेल असे फर्मान समाजकल्याण विभागाने काढले आहे.