शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

विद्यार्थ्यांना चार वर्षांपासून शिष्यवृत्तीच मिळाली नाही

By admin | Updated: September 24, 2015 03:06 IST

मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. या सोबतच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही दिली जाते.

किशोर वंजारी नेरमोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. या सोबतच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही दिली जाते. विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीमध्ये ‘आम आदमी शिष्यवृत्ती’चाही समावेश आहे. मात्र गेली चार वर्षांपासून तालुक्यातील एकाही विद्यार्थ्याला या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. यात सावळा गोंधळ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी दस्तावेज तयार करण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. परंतु गेली चार वर्षात विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली नाही. महाराष्ट्र शासनातर्फे भारत सरकार शिष्यवृत्ती, छत्रपती शाहू, सावित्रीबाई फुले, अल्पसंख्यक, सुवर्ण जयंती, आम आदमी, आर्थिक दुर्बल आम आदमी आदी प्रकारची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र यात कमालीची अनियमितता आली आहे. शाळांना मिळालेल्या शिष्यवृत्तीचा धनादेश वठवून निधी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो किंवा मुख्याध्यापक शाळेमार्फत वितरण करतात. मात्र यात गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये बोगस स्वाक्षऱ्या करून विद्यार्थ्यांच्या नावाची शिष्यवृत्ती हडप केली जात आहे. काही शाळा थकीत फी, शाळेच्या कार्यक्रमासाठीचा निधी यासाठीही शिष्यवृत्तीमधून रक्कम कपात करत आहे. शिवाय तीन हजार रुपये शिष्यवृत्ती असेल तर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये देण्याचेही प्रकार घडत आहे. मात्र विद्यार्थी धाकापोटी तीन हजार रुपयांच्यावरच स्वाक्षरी करीत असल्याच्या बाबी पुढे येत आहे. यात काही शिक्षक आणि संस्थाचालकही गुंतले असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना आतापर्यंत वाटप झालेल्या रकमेची चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. चार वर्षांपूर्वी शासनाने पाच एकर शेती आणि भूमिहीन कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आम आदमी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. वर्षाकाठी सहा हजार रुपये विद्यार्थ्यांना मिळतात. यासाठी विद्यार्थी दरवर्षी अर्ज भरतात. परंतु गेली चार वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कमच जमा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी प्रयत्नाची मागणी आहे.