शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

विद्यार्थ्यांना चार वर्षांपासून शिष्यवृत्तीच मिळाली नाही

By admin | Updated: September 24, 2015 03:06 IST

मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. या सोबतच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही दिली जाते.

किशोर वंजारी नेरमोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. या सोबतच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही दिली जाते. विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीमध्ये ‘आम आदमी शिष्यवृत्ती’चाही समावेश आहे. मात्र गेली चार वर्षांपासून तालुक्यातील एकाही विद्यार्थ्याला या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. यात सावळा गोंधळ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी दस्तावेज तयार करण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. परंतु गेली चार वर्षात विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली नाही. महाराष्ट्र शासनातर्फे भारत सरकार शिष्यवृत्ती, छत्रपती शाहू, सावित्रीबाई फुले, अल्पसंख्यक, सुवर्ण जयंती, आम आदमी, आर्थिक दुर्बल आम आदमी आदी प्रकारची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र यात कमालीची अनियमितता आली आहे. शाळांना मिळालेल्या शिष्यवृत्तीचा धनादेश वठवून निधी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो किंवा मुख्याध्यापक शाळेमार्फत वितरण करतात. मात्र यात गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये बोगस स्वाक्षऱ्या करून विद्यार्थ्यांच्या नावाची शिष्यवृत्ती हडप केली जात आहे. काही शाळा थकीत फी, शाळेच्या कार्यक्रमासाठीचा निधी यासाठीही शिष्यवृत्तीमधून रक्कम कपात करत आहे. शिवाय तीन हजार रुपये शिष्यवृत्ती असेल तर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये देण्याचेही प्रकार घडत आहे. मात्र विद्यार्थी धाकापोटी तीन हजार रुपयांच्यावरच स्वाक्षरी करीत असल्याच्या बाबी पुढे येत आहे. यात काही शिक्षक आणि संस्थाचालकही गुंतले असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना आतापर्यंत वाटप झालेल्या रकमेची चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. चार वर्षांपूर्वी शासनाने पाच एकर शेती आणि भूमिहीन कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आम आदमी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. वर्षाकाठी सहा हजार रुपये विद्यार्थ्यांना मिळतात. यासाठी विद्यार्थी दरवर्षी अर्ज भरतात. परंतु गेली चार वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कमच जमा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी प्रयत्नाची मागणी आहे.