शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना चार वर्षांपासून शिष्यवृत्तीच मिळाली नाही

By admin | Updated: September 24, 2015 03:06 IST

मोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. या सोबतच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही दिली जाते.

किशोर वंजारी नेरमोफत आणि सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. या सोबतच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ही दिली जाते. विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीमध्ये ‘आम आदमी शिष्यवृत्ती’चाही समावेश आहे. मात्र गेली चार वर्षांपासून तालुक्यातील एकाही विद्यार्थ्याला या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. यात सावळा गोंधळ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी दस्तावेज तयार करण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. परंतु गेली चार वर्षात विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळाली नाही. महाराष्ट्र शासनातर्फे भारत सरकार शिष्यवृत्ती, छत्रपती शाहू, सावित्रीबाई फुले, अल्पसंख्यक, सुवर्ण जयंती, आम आदमी, आर्थिक दुर्बल आम आदमी आदी प्रकारची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र यात कमालीची अनियमितता आली आहे. शाळांना मिळालेल्या शिष्यवृत्तीचा धनादेश वठवून निधी शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो किंवा मुख्याध्यापक शाळेमार्फत वितरण करतात. मात्र यात गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांमध्ये बोगस स्वाक्षऱ्या करून विद्यार्थ्यांच्या नावाची शिष्यवृत्ती हडप केली जात आहे. काही शाळा थकीत फी, शाळेच्या कार्यक्रमासाठीचा निधी यासाठीही शिष्यवृत्तीमधून रक्कम कपात करत आहे. शिवाय तीन हजार रुपये शिष्यवृत्ती असेल तर प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये देण्याचेही प्रकार घडत आहे. मात्र विद्यार्थी धाकापोटी तीन हजार रुपयांच्यावरच स्वाक्षरी करीत असल्याच्या बाबी पुढे येत आहे. यात काही शिक्षक आणि संस्थाचालकही गुंतले असल्याची माहिती आहे. विद्यार्थ्यांना आतापर्यंत वाटप झालेल्या रकमेची चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. चार वर्षांपूर्वी शासनाने पाच एकर शेती आणि भूमिहीन कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आम आदमी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. वर्षाकाठी सहा हजार रुपये विद्यार्थ्यांना मिळतात. यासाठी विद्यार्थी दरवर्षी अर्ज भरतात. परंतु गेली चार वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कमच जमा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी प्रयत्नाची मागणी आहे.