शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

विद्यार्थ्यांनी बससाठी केले आंदोलन

By admin | Updated: July 30, 2015 02:16 IST

शिरपूर येथील श्री.गुरूदेव विद्यालयातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी बोरगाव व खांदला बसस्थानकावर एस.टी.बस थांबत नसल्याने बसच रोखून धरली.

ठाणेदार-प्राचार्यांची मध्यस्थी : सामाजिक मित्र संघटनेचा पाठिंबावणी : शिरपूर येथील श्री.गुरूदेव विद्यालयातील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी बोरगाव व खांदला बसस्थानकावर एस.टी.बस थांबत नसल्याने बसच रोखून धरली. विद्यार्थी व वाहन चालकामध्ये अखेर बाचाबाची झाल्याने पोलिसांना मध्यस्थी करूनच मार्ग काढावा लागला.तालुक्यातील शिरपूर येथील श्रीगुरूदेव उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी आणि बारावीत परिसरातील ढाकोरी, कुरई, डोर्ली, वेळाबाई, मोहदा, कृष्णानपूर, बोरगाव, खांदला, गोपालपूर येथील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आह. या सर्व विद्यार्थ्यांना गावावरून शिरपूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षणाकरिता येण्यासाठी एस.टी.चे सवलत पास काढले. मात्र या मार्गावर कोरपना-वणी ही एकच बस सकाळी उपलब्ध आहे. या एका बसमध्ये सर्व विद्यार्थी सामावले जात नाही. त्यामुळे वेळाबाई, बोरगाव, खांदला या थांब्यावर कधी-कधी बसही थांबविली जात नाही. परिणामी विद्यार्थी, पालक व प्राचार्यांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन सकाळी वणी-कृष्णानपूर बस सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र वणी आगाराकडून ही बस सुरू करण्यात आली नाही.बुधवारी वणी-कोरपना बसमध्ये जागाच नसल्याने खांदला थांब्यावरील विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यास चालक व वाहकाने असमर्थतला दर्शविली. त्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतापले व विद्यार्थ्यांची चालकाशी बाचाबाची झाली. विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप करून चालकाने बस शिरपूर ठाण्यात आणली. यानंतर विद्यार्थ्यांनी सामाजिक मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर संघटनेचे स्वप्नील धुर्वे, नितेश पानघाटे, अ‍ॅड.शेखर वऱ्हाटे, रवी सोमलवार आदी शिरपूर ठाण्यात पोहोचले. तेथे आगार व्यवस्थापक एन.आर.धारगावे, बसस्थानक प्रमुख लता मुळेवार, लिपीक तानाजी पाऊणकर हेसुद्धा पोहोचले. ठाणेदार मनोज केदारे व प्राचार्य वि.ना.ताजने यांनी मध्यस्थी करून शेवटी यावर तोडगा काढला. त्यात विद्यार्थ्यांसाठी सोमवारपासून दुसऱ्या बसची व्यवस्था केली जाईल, असे आगार प्रमुख धारगावे यांनी सांगितले. मात्र सोमवारपासून बसची व्यवस्था न झाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा विद्यार्थ्यांतर्फे सामाजिक मित्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, पंचायत समिती सदस्य दयालाल अरके यांनी आगार प्रमुखांना विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची सूचना केली. वारंवार निवेदन देऊनही उपाययोजना होत नसल्याने बुधवारी शेवटी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यावर आता तोडगा निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानएस.टी.ने विद्यार्थ्यांना पास तर दिले, मात्र एवढ्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी बस उपलब्ध करून न दिल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागते. तसेच गैरहजेरीचे प्रमाण वाढल्यास पुढील परीक्षेपासून वंचित राहण्याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बस उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.