शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

२५ वर्षानंतरच्या भेटीने भारावले विद्यार्थी अन् शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 21:28 IST

विविध क्षेत्रात, विविध हुद्द्यांवर आणि विविध शहरांमध्ये कार्यरत असतानाही ज्या कॉलेजने आपल्या आयुष्याची दिशा ठरविली त्या कॉलेजचे दिवस विसरणे शक्यच नसते.

ठळक मुद्देस्नेहमिलन सोहळा : देशाच्या कानाकोपºयातून जमले अमोलकचंद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विविध क्षेत्रात, विविध हुद्द्यांवर आणि विविध शहरांमध्ये कार्यरत असतानाही ज्या कॉलेजने आपल्या आयुष्याची दिशा ठरविली त्या कॉलेजचे दिवस विसरणे शक्यच नसते. याचाच प्रत्यय येथील अमोलकचंद महाविद्यालयाच्या १९९१-९२ च्या अकरावी-बारावीच्या (विज्ञान) तुकडीने आयोजित केलेल्या स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांना आला. तब्बल २५ वर्षानंतर एकमेकांना भेटलेले हे वर्गमित्र आणि त्यावेळचे गुरूजन या सोहळ्याने चांगलेच भारावून गेले.अमोलकचंद महाविद्यालयाच्या वसंतराव नाईक सभागृहात रंगलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.ए. मिश्रा होते. प्रमुख म्हणून उपप्राचार्य वानरे, प्रा.गोपीराज पळशीकर, प्रा. ज्ञानेश्वर बोरखडे, प्रा. एस.पी. चौथाईवाले, सी.बी.देशपांडे, प्रा. देशपांडे, प्रा. नागपुरे, प्रा. सिंग, प्रा.फ्लोरा सिंग, प्रा.दुर्गे, प्रा.गुजर, प्रा.व्ही.सी.जाधव, प्रा. कावळे, प्रा.खोडे, प्रा. राजेश कळसकर उपस्थित होते.मुंबई-पुणे-नागपूरपासून तर देशातील विविध शहरांमध्ये कार्यरत असणारे जवळपास ४० माजी विद्यार्थी या सोहळ्यासाठी यवतमाळात दाखल झाले होते. महाविद्यालय सोडल्यानंतरच्या २५ वर्षात आपण कसे घडत गेलो, महाविद्यालयात असताना कोणाचे कसे मार्गदर्शन मिळाले हे या माजी विद्यार्थ्यांनी मुक्तकंठाने आपल्या मनोगतातून मांडले. दहावीपर्यंतच्या बंदिस्त वातावरणातून बाहेर येऊन महाविद्यालयीन जीवनाची सुरूवात करताना केलेल्या गमती-जमती, त्यावेळचे विविध प्रसंग तब्बल २५ वर्षानंतरही ताजेपणाने त्यांनी विषद केले. कॉलेज जीवनातील त्या आठवणींनी माजी विद्यार्थीच नाही तर तत्कालीन प्राध्यापकवृंदही भूतकाळात रममाण झाले होते. असा सोहळा गेल्या कित्येक वर्षात आपण अनुभवला नाही असे त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थित प्राध्यापकवृंदांचा या माजी विद्यार्थ्यानी शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनाही स्मृतिचिन्ह देऊन प्राध्यापकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संचालन प्रा.गाणार यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनिष वाठ, जयेश सावला, राजा तुरक, प्रशांत गोडे आदी माजी विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. या सोहळ्याला माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.