शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

बारावीचा निकाल १० जूनपूर्वी लावण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच बारावीच्या परीक्षा आटोपल्या होत्या. मात्र दहावीचा एक पेपर होऊ शकला नाही. तर लॉकडाऊन काळात शाळा-महाविद्यालये बंद झाल्याने व शिक्षकांनाही संचारास बंदी असल्याने उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर परिणाम झाला होता. त्यामुळे निकालास विलंब होण्याची शक्यता वर्तविली गेली होती.

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’मध्येही नियोजन : उत्तरपत्रिकांसाठी यवतमाळात आली अमरावती बोर्डाची टीम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल वेळेत लागणार की नाही, याबाबत साशंकता असताना बोर्डाने मात्र १० जूनपूर्वी निकाल लावण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे तपासलेल्या उत्तरपत्रिका गोळा करण्यासाठी थेट यवतमाळात टिम पाठविण्यात आली असून तालुकानिहाय वेळापत्रकानुसार पेपर नेले जात आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच बारावीच्या परीक्षा आटोपल्या होत्या. मात्र दहावीचा एक पेपर होऊ शकला नाही. तर लॉकडाऊन काळात शाळा-महाविद्यालये बंद झाल्याने व शिक्षकांनाही संचारास बंदी असल्याने उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर परिणाम झाला होता. त्यामुळे निकालास विलंब होण्याची शक्यता वर्तविली गेली होती. मात्र अमरावती बोर्डाने १० जूनपूर्वीच बारावीचा निकाल घोषित करण्याचे नियोजन जाहीर केले आहे.त्यासाठी उत्तरपत्रिका गोळा करून नेण्यासाठी वाहतूक पास देण्याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनाही सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या लेखी आदेशानुसार आता उत्तरपत्रिकांची ने-आण करणाऱ्यांना वाहतूक पास देण्याचे अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहे.आता अमरावती बोर्डाने एक टिम जिल्ह्यात पाठविली असून ही टिम तालुकानिहाय उत्तरपत्रिका गोळा करीत आहे. त्यासाठी यवतमाळातील अभ्यंकर कन्याशाळा हे केंद्र निश्चित करण्यात आले आहे. तेथे थांबलेल्या बोर्डाच्या टिमकडे तालुका पातळीवरील शिक्षकांमार्फत (नियामक) उत्तरपत्रिका जमा केल्या जात आहे. त्यांना यवतमाळात येण्यासाठी गटशिक्षणाधिकाºयांच्या मार्फत नियामकांना वाहतूक पास दिले जात आहे.सोमवारपर्यंत आटोपणार गोळाबेरीजबोर्डाच्या नियोजनानुसार बुधवारी यवतमाळ आणि आर्णी तालुक्यातील उत्तरपत्रिका गोळा करण्यात आल्या. तर गुरुवारी घाटंजी, पांढरकवडा, वणी, झरीजामणी आणि मारेगावच्या उत्तरपत्रिका स्वीकारण्यात आल्या. आता शुक्रवारी राळेगाव, कळंब, बाभूळगाव, महागाव आणि उमरखेड तर सोमवारी पुसद, दारव्हा आणि दिग्रस तालुक्यातील उत्तरपत्रिका यवतमाळच्या अभ्यंकर कन्याशाळेत गोळा केल्या जाणार आहेत. त्यानंतर निकाल तयार करण्याच्या कामाला अमरावतीमध्ये गती येणार आहे. या गतीवरच निकालाची १० जूनची तारीख पाळणे शक्य होणार आहे.