शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण तणाव

By admin | Updated: March 7, 2017 01:28 IST

मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण तणाव आहे. वाढत्या तणावामुळे मनुष्य रुग्ण होत आहे. मनुष्याचे ८५ टक्के आजार मनाच्या कमजोरीमुळे होतात.

प्रभा मिश्रा : पुसद येथे आध्यात्मिक शिबिराला भाविकांचा प्रतिसादपुसद : मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण तणाव आहे. वाढत्या तणावामुळे मनुष्य रुग्ण होत आहे. मनुष्याचे ८५ टक्के आजार मनाच्या कमजोरीमुळे होतात. आपण सकारात्मक विचार केल्यास आजारी पडणारच नाही. व्यक्ती २४ तासात ३० ते ४० हजारवेळा विचार करतो. जास्त वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु अशा पद्धतीमुळे सकारात्मक विचार कमी होतात व आपल्या जवळचे लोकही सुटून जातात, असे प्रतिपादन डॉ.प्रभा मिश्रा यांनी केले.प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पुसद केंद्राच्यावतीने आयोजित आध्यात्मिक शिबिरात ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर प्रभादिदी बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आपली आजची जीवनशैली अतिशय जलद झाली असून यावर आपले नियंत्रण नसल्यास तणावात वाढ होईल. आपण इतरांशी खूप बोलतो. परंतु स्वत:सोबत संवाद साधत नाही. पर्यटनस्थळावर जाण्याने सुख मिळणार नाही. यासाठी स्वत:मध्ये झाकून पाहावे लागेल. आपल्यातील क्षमता असिम आहे. मनुष्य शक्तिमान आहे. त्या शक्तीला समजून घेऊन त्याचा उपभोग केला पाहिजे. अहम्भाव बाजूला सारता आला पाहिजे. खोटा अहंकार दाखवू नये व खोटा दिखावा करू नये. यामुळेही तणावात वाढ होते, असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती. (तालुका प्रतिनिधी)