शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण तणाव

By admin | Updated: March 7, 2017 01:28 IST

मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण तणाव आहे. वाढत्या तणावामुळे मनुष्य रुग्ण होत आहे. मनुष्याचे ८५ टक्के आजार मनाच्या कमजोरीमुळे होतात.

प्रभा मिश्रा : पुसद येथे आध्यात्मिक शिबिराला भाविकांचा प्रतिसादपुसद : मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण तणाव आहे. वाढत्या तणावामुळे मनुष्य रुग्ण होत आहे. मनुष्याचे ८५ टक्के आजार मनाच्या कमजोरीमुळे होतात. आपण सकारात्मक विचार केल्यास आजारी पडणारच नाही. व्यक्ती २४ तासात ३० ते ४० हजारवेळा विचार करतो. जास्त वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु अशा पद्धतीमुळे सकारात्मक विचार कमी होतात व आपल्या जवळचे लोकही सुटून जातात, असे प्रतिपादन डॉ.प्रभा मिश्रा यांनी केले.प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पुसद केंद्राच्यावतीने आयोजित आध्यात्मिक शिबिरात ‘तणावमुक्त जीवन’ या विषयावर प्रभादिदी बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आपली आजची जीवनशैली अतिशय जलद झाली असून यावर आपले नियंत्रण नसल्यास तणावात वाढ होईल. आपण इतरांशी खूप बोलतो. परंतु स्वत:सोबत संवाद साधत नाही. पर्यटनस्थळावर जाण्याने सुख मिळणार नाही. यासाठी स्वत:मध्ये झाकून पाहावे लागेल. आपल्यातील क्षमता असिम आहे. मनुष्य शक्तिमान आहे. त्या शक्तीला समजून घेऊन त्याचा उपभोग केला पाहिजे. अहम्भाव बाजूला सारता आला पाहिजे. खोटा अहंकार दाखवू नये व खोटा दिखावा करू नये. यामुळेही तणावात वाढ होते, असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली होती. (तालुका प्रतिनिधी)