शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

बेंबळा जलवाहिनीचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:13 IST

यवतमाळकरांना बेंबळा प्रकल्पावरून उन्हाळ्यात पाणी मिळण्याची आस लागलेली असताना अभियंता व फायनान्सरच्या वादात या पाईपलाईनचे कामच दोन आठवड्यांपासून बंद पडले आहे. ते पाहता एप्रिलपूर्वी खरोखरच बेंबळाचे पाणी मिळणार काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे १५ दिवस लोटले : पाण्याचा एप्रिलचा मुहूर्त टळण्याची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळकरांना बेंबळा प्रकल्पावरून उन्हाळ्यात पाणी मिळण्याची आस लागलेली असताना अभियंता व फायनान्सरच्या वादात या पाईपलाईनचे कामच दोन आठवड्यांपासून बंद पडले आहे. ते पाहता एप्रिलपूर्वी खरोखरच बेंबळाचे पाणी मिळणार काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा धरणातून यवतमाळपर्यंत पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी साडेपाचशे कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले. यातून यवतमाळ शहर व परिसरात पाण्याच्या १६ उंच टाकी बांधल्या जाणार आहे. मुख्य जलवाहिनी, उपजलवाहिन्या व शहरात सर्वत्र पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे जाळे नव्याने विणले जाणार आहे. जॅकवेल, फिल्टर प्लँट या कामांचाही त्यात समावेश आहे.फिल्टर प्लँट, टाकी, पाईपलाईन हे मुख्य काम साडेतीनशे कोटींचे आहे. या कामांचे कंत्राट नाशिक येथील शासकीय कंत्राटदार पी.एल. अडके यांना मिळाले आहे. या कामात चौघे भागीदार आहेत. अडके यांना या कामासाठी हरियाणाच्या गौरवकुमार यांनी फायनान्स केले आहे. या कामावरील देखरेखीसाठी कंत्राटदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर (कारंजा) यांची नियुक्ती केली आहे. या संपूर्ण कामाचे ड्रॉर्इंग व सुपरव्हीजन बोरकर यांचे आहे.बेंबळा ते यवतमाळ या जलवाहिनीच्या कामासाठी फायनान्सर स्वत: यवतमाळात तळ ठोकून आहे. सद्यस्थितीत पाण्याच्या १६ टाकींचे २० टक्के बांधकाम झाले आहे. शहरात पाईपलाईन टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. दोन आठवड्यांपूर्वी फायनान्सर गौरवकुमार आणि अभियंता बोरकर यांच्यात वाद झाला. त्यातूनच बोरकर दोन आठवड्यांपूर्वी काम सोडून गावाकडे निघून गेले. तेंव्हापासून पाणीपुरवठ्याचे हे काम बंद आहे.बेंबळाचे पाणी एप्रिलपूर्वी यवतमाळात आणायचेच, यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांची धडपड आहे. एक-एक दिवस महत्वाचा असल्याचे ते अधिकाºयांना सांगतात. तर दुसरीकडे आता १५ दिवसांपासून चक्क प्रमुख कामच बंद असल्याने मार्च-एप्रिलपर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात येणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पालकमंत्र्यांकडून कंत्राटदाराची झाडाझडतीकाम बंद असल्याची कुणकुण लागताच पालकमंत्री मदन येरावार यांनी कंत्राटदार अडके, फायनान्सर गौरव कुमार यांना बोलावून त्यांची झाडाझडती घेतली. वेळप्रसंगी काम काढून घेण्याची तंबीही त्यांना दिली.सहा स्थानिक कंत्राटदारबेंबळावरून पाणी आणण्याच्या मुख्य कामाचे तुकडे पाडून ते स्थानिक शकील, चव्हाण, समदूरकर, शर्मा, मांगूळकर, कुटे यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येते.