शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

बेंबळा जलवाहिनीचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:13 IST

यवतमाळकरांना बेंबळा प्रकल्पावरून उन्हाळ्यात पाणी मिळण्याची आस लागलेली असताना अभियंता व फायनान्सरच्या वादात या पाईपलाईनचे कामच दोन आठवड्यांपासून बंद पडले आहे. ते पाहता एप्रिलपूर्वी खरोखरच बेंबळाचे पाणी मिळणार काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे १५ दिवस लोटले : पाण्याचा एप्रिलचा मुहूर्त टळण्याची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळकरांना बेंबळा प्रकल्पावरून उन्हाळ्यात पाणी मिळण्याची आस लागलेली असताना अभियंता व फायनान्सरच्या वादात या पाईपलाईनचे कामच दोन आठवड्यांपासून बंद पडले आहे. ते पाहता एप्रिलपूर्वी खरोखरच बेंबळाचे पाणी मिळणार काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा धरणातून यवतमाळपर्यंत पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी साडेपाचशे कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले. यातून यवतमाळ शहर व परिसरात पाण्याच्या १६ उंच टाकी बांधल्या जाणार आहे. मुख्य जलवाहिनी, उपजलवाहिन्या व शहरात सर्वत्र पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे जाळे नव्याने विणले जाणार आहे. जॅकवेल, फिल्टर प्लँट या कामांचाही त्यात समावेश आहे.फिल्टर प्लँट, टाकी, पाईपलाईन हे मुख्य काम साडेतीनशे कोटींचे आहे. या कामांचे कंत्राट नाशिक येथील शासकीय कंत्राटदार पी.एल. अडके यांना मिळाले आहे. या कामात चौघे भागीदार आहेत. अडके यांना या कामासाठी हरियाणाच्या गौरवकुमार यांनी फायनान्स केले आहे. या कामावरील देखरेखीसाठी कंत्राटदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर (कारंजा) यांची नियुक्ती केली आहे. या संपूर्ण कामाचे ड्रॉर्इंग व सुपरव्हीजन बोरकर यांचे आहे.बेंबळा ते यवतमाळ या जलवाहिनीच्या कामासाठी फायनान्सर स्वत: यवतमाळात तळ ठोकून आहे. सद्यस्थितीत पाण्याच्या १६ टाकींचे २० टक्के बांधकाम झाले आहे. शहरात पाईपलाईन टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे. दोन आठवड्यांपूर्वी फायनान्सर गौरवकुमार आणि अभियंता बोरकर यांच्यात वाद झाला. त्यातूनच बोरकर दोन आठवड्यांपूर्वी काम सोडून गावाकडे निघून गेले. तेंव्हापासून पाणीपुरवठ्याचे हे काम बंद आहे.बेंबळाचे पाणी एप्रिलपूर्वी यवतमाळात आणायचेच, यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांची धडपड आहे. एक-एक दिवस महत्वाचा असल्याचे ते अधिकाºयांना सांगतात. तर दुसरीकडे आता १५ दिवसांपासून चक्क प्रमुख कामच बंद असल्याने मार्च-एप्रिलपर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात येणार कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पालकमंत्र्यांकडून कंत्राटदाराची झाडाझडतीकाम बंद असल्याची कुणकुण लागताच पालकमंत्री मदन येरावार यांनी कंत्राटदार अडके, फायनान्सर गौरव कुमार यांना बोलावून त्यांची झाडाझडती घेतली. वेळप्रसंगी काम काढून घेण्याची तंबीही त्यांना दिली.सहा स्थानिक कंत्राटदारबेंबळावरून पाणी आणण्याच्या मुख्य कामाचे तुकडे पाडून ते स्थानिक शकील, चव्हाण, समदूरकर, शर्मा, मांगूळकर, कुटे यांना देण्यात आल्याचे सांगण्यात येते.