शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

आर्णी येथे शेतकर्‍यांचा रास्ता रोको

By admin | Updated: June 5, 2014 00:02 IST

येथील बाजार समितीमध्ये दोन दिवसापासून शेतकरी मुक्कामी आहे. नवीन बाजार समितीच्या यार्डात व्यापार्‍यांचा माल शेडमध्ये असून शेतकरी उघड्यावर माल टाकत आहे. तुरळक पावसाच्या सरीने शेंगा

बाजार समिती विरोधात निदर्शने : व्यापार्‍यांनी भुईमुगाचे भाव पाडलेआर्णी : येथील बाजार समितीमध्ये दोन दिवसापासून शेतकरी मुक्कामी आहे. नवीन बाजार समितीच्या यार्डात व्यापार्‍यांचा माल शेडमध्ये असून शेतकरी उघड्यावर माल टाकत आहे. तुरळक पावसाच्या सरीने शेंगा ओल्या झाल्यानंतर व्यापार्‍यांनी बुधवारी दुपारी हर्रास न करता भुईमूगाचे भाव पाडले. तब्बल दहा किलोची कट्टी घेणार असल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर ठिय्या दिला.निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत शेतकरी यावर्षी कसा तरी उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. खरीप आणि रबी हंगामात शेतकर्‍यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले. याची तीव्रता कमी करण्यासाठी उन्हाळी भुईमूगाची लागवड केली. त्यावरही वातावरणाची अवकृपा झाली होती. आता बाजारपेठेत शेंगा घेऊन आलेल्या शेतकर्‍याला आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न व्यापारी व बाजार समिती व्यवस्थापनाकडून केला जात आहे. तालुक्यातील दाभडी, तेंडूळी, जवळा, दत्तरामपूर, सातारा येथील शेतकरी दोन दिवसापासून शेंगा घेवून मुक्कामी आहे. शेडमध्ये व्यापार्‍याचा माल असल्याने या शेतकर्‍यांना उघड्यावरच शेंगा टाकाव्या लागल्या. वेळेवर हर्रास सुरू झाला नाही. तितक्यातच पावसाच्या सरी कोसळल्या हीच सबब पुढे करत शेंगा ओल्या झाल्या म्हणून क्विंटल मागे दहा किलोची कट्टी द्यावी लागेल, अशी भूमिका व्यापार्‍यांनी घेतली. त्यानंतरही दुपारपर्यंत हर्रास सुरू झालाच नाही. शेवटी शेतकर्‍यांच्या संयमाचा बांध फुटला. पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या मुरडल्या जात असल्याचे लक्षात येताच हतबल शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून आपला आक्रोश व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तुळजापूर मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. या दाभडीतील सरपंच संतोष टाके, अतुल मुनगिनवार, दीपक गायधने, गणेश राठोड, सुनील नागोसे, जयंत पाटील, साखरकर, दिगांबर राठोड, मनोज चव्हाण, रमेश आडे, अतुल चव्हाण यांच्यासह बाजार समितीत असंख्य शेतकरी रस्त्यावर उतरून बाजार समिती प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत होते. आर्णी बाजार समितीत शेतकर्‍यांना लुटण्याचेच काम सुरू आहे. येथे व्यवस्थापनाकडूनही व्यापार्‍यांचीच बडदास्त ठेवल्या जाते. अनेक महिन्यांपासून शेडमध्ये असलेला व्यापार्‍यांचा माल खाली करण्याची तसदी बाजार समिती प्रशासनाने घेतली नाही. त्यांच्या या मनमानीमुळेच शेतकर्‍यांना आपला माल उघड्यावर ठेवावा लागत आहे. परिणामी पाऊस आल्यानंतर तेच व्यापारी शेतकर्‍यांच्या मालाला कवडीमोल दरात खरेदी करण्याची भाषा करत आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना आंदोलनाचा पवित्रा घेण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नाही. मोठय़ा संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत असताना त्यांची समजूत काढण्यासाठी पोलीस कर्मचारी तेथे दाखल झाले. मात्र या संदर्भात चर्चेतून वृत्त लिहेपर्यंत तरी कोणताही तोडगा निघाला नव्हता. शेंगा ओल्या झाल्याचे कारण पुढे करत शेतकर्‍यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न व्यापार्‍यांकडून सुरूच होता. (तालुका प्रतिनिधी)