शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

तूर खरेदीसाठी आर्णी येथे रास्ता रोको

By admin | Updated: March 18, 2017 00:43 IST

ढगाळ वातावरण आणि बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण देत बंद असलेली एफसीआयची तूर खरेदी पूर्ववत सुरू करावी,

काँग्रेस, प्रहारचे आंदोलन : टायर जाळले, नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग एक तास ठप्प आर्णी : ढगाळ वातावरण आणि बारदाना उपलब्ध नसल्याचे कारण देत बंद असलेली एफसीआयची तूर खरेदी पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी आर्णी येथे संतप्त शेतकऱ्यांनी काँग्रेस व प्रहारच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी चक्काजाम केला. रस्त्यावर टायर पेटविल्याने नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात एफसीआयची तूर खरेदी सुरू आहे. परंतु दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि बारदाना संपल्याचे सांगत ही तूर खरेदी बंद करण्यात आली. तसेच गुरुवारी आलेल्या पावसाने उघड्यावरील तुरी ओल्या झाल्या. यामुळे शेतकरी संतप्त होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता बाजार समितीच्या नवीन यार्डासमोर काँग्रेस व प्रहारच्यावतीने टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे अनिल आडे, राजू बुटले, परशराम राठोड, सुनील भारती, खुशाल ठाकरे, प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद कुदळे, आकाश राठोड, प्रवीण देशमुख, सचिन अगलदरे, अतुल मुनगिनवार आदी उपस्थित होते. तब्बल तासभर केलेल्या आंदोलनाने वाहतूक ठप्प झाली होती. तहसीलदार सुधीर पवार, सहायक निबंधक सुरेश अंबिलपुरे, आर्णी बाजार समितीचे सचिव विशाल राठोड, एफसीआयचे विजय भालारकर, आर्णीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वळवी, राजकुमार मडावी, गणेश हिरूळकर आदींनी मध्यस्थी केली. शेवटी एफसीआयने तूर खरेदी सुरू केली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)