शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

कृषी योजनांचे लिकेज थांबवू

By admin | Updated: June 11, 2015 02:21 IST

कृषी विभागाच्या बहुतांश योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. या योजनांमध्ये लिकेजेस असल्याने शासनाच्या चांगल्या योजनांचा लाभ मिळत नाही.

सचिंद्र प्रताप सिंह : दाभडी येथे शेतकरी बचाव जनजागृती रॅलीआर्णी : कृषी विभागाच्या बहुतांश योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. या योजनांमध्ये लिकेजेस असल्याने शासनाच्या चांगल्या योजनांचा लाभ मिळत नाही. हे लिकेच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शेतकऱ्यांना दिले. दाभडी येथे शेतकरी बचाव जनजागृती रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी बुधवारी सकाळी बोलत होते. जिल्ह्यात येऊन मला फक्त २० दिवस झाले. या दिवसात शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी माझ्या लक्षात आल्या आहे. मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. आपला शेतकरी हुशार आहे. फक्त त्याला काही सुधारणा करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी प्रत्येक गावात दारूबंदी करावी, गावात दारू विक्री होऊ देऊ नये. यामुळे गावातील वातावरण चांगले राहील. शिवाय गावात होणाऱ्या विकास कामाची गुणवत्ता कशी चांगली करून घेता येईल, याकडे काम सुरू असतानाच लक्ष द्यावे. जेणेकरून काम संपल्यानंतर तक्रार करण्याची गरज भासणार नाही, असा संदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दाभडीतील शेतकऱ्यांना दिला.प्रत्येक शेतकऱ्याने पीककर्ज बँकेतूनच घ्यावे, सावकाराकडून कर्ज घेऊ नये. जिल्ह्यातील आठ रुग्णालयामध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार दिला जातो. याचा फायदा घ्यावा. मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची सोय आहे. ते घ्या. त्यासाठी स्वत: व्यक्तिश: प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अन्न सुरक्षा गरजूंनाच मिळाली पाहिजे. यात श्रीमंतांचा समावेश नको. कर्ज काढून लग्न करण्याऐवजी सामूहिक विवाह मेळावे घ्या, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला बगल देऊन भाजीपाला, फुलशेती, बागायत शेती करावी, यासाठी कृषी विभागाची मदत घ्यावी, भाग्य बदलण्याची ताकद फक्त तुमच्या हातात आहे. तुमच्या पैकीही कुणाचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, अशी साद सचिंद्र प्रताप सिंह यांनी घातली. यावेळी शेतकरी बचाव जनजागृती रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. शेतकरी बचाव जनजागृती समितीच्या संयोजिका ज्योती प्रभाकर जीवने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, दाभडीचे सरपंच संतोष टाके, अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, तालुका कृषी अधिकारी एस.जे. पाठक आदी उपस्थित होते. यावेळी दाभडी येथील ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.(शहर प्रतिनिधी)