आर्णी : शेतकऱ्यांना सरसकट पीक विम्याचा लाभ द्यावा आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर रस्तारोको करण्यात आला. आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे. यानंतरही तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यातून वगळण्यात आले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक आहे. त्यामुळे शासनावर भादंविच्या ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार ख्वाजा बेग यांनी यावेळी केली. शासनाच्या विरोधात यावेळी प्रचंड नारेबाजी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सुधीर पवार यांना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख रवींद्र नालमवार, सुनील राठोड, हरीष कुडे, मुबारक तंवार, राजन भागवत, संदीप बुटले, गणेश मोरे, भाऊराव गावंडे, राजेंद्र शिवरामवार, दीपक बुटले, गोपाल कोठारी, भिकुसेठ पटेल, कांतीलाल कोठारी, सुनील डोल्हारकर, डॉ. आर.के. चिंतावार, शेखर खंदार, निलंकुश चव्हाण, प्रदीप भगत, मनोज माघाडे, रवी राठोड, भारत काळबांडे, विनोद पंचभाई, रवींद्र बडे, निशांत सोनोने आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
आर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको
By admin | Updated: June 14, 2016 01:57 IST