शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
4
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
5
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
6
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
7
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
8
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
9
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
10
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
11
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
12
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
13
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
14
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
15
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
16
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
17
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
18
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
19
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
20
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड

अद्याप जिल्ह्यातील जलाशयात ठणठणाट

By admin | Updated: July 23, 2014 00:12 IST

गतवर्षी जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो झालेल्या तलावात यंदा ठणठणाट आहे. उशिरा दाखल झालेल्या पावसाचा हा परिणाम आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे.

यवतमाळ : गतवर्षी जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो झालेल्या तलावात यंदा ठणठणाट आहे. उशिरा दाखल झालेल्या पावसाचा हा परिणाम आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र जोरदार पाऊस झाला नसल्याने जलसाठ्यात अद्यापही वाढ झाली नाही. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १०.२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. जुलैपर्यंत ३८८ मिली मीटर पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ १६८ मिमी पावसाची नोंद झाली. अनेक तालुक्यांनी शंभरीसुध्दा गाठली नाही. पुसद, उमरखेड, महागव येथे सर्वात कमी पाऊस झाला आहे. मारेगाव, वणी, राळेगाव, यवतमाळ, नेर बाभुळगाव येथे अपेक्षित सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस पडला आहे. तर दिग्रस, दारव्हा, आर्णी, कळंब, केळापूर, घाटंजी, झरी येथे सरासरी १५० ते २०० मिली मिटर पाऊस झाला आहे. तीन दिवसापासून पाण्याची रिपरिप सुरू असली तरी विशेष जोर नाही. रात्रंदिवस पाऊस सुरू असूनही २४ तासात केवळ १० ते १५ मिमी इतकीच नोंद झाली आहे. त्यामुळेच २४६ पाझर तलाव, ६९ सिंचन तलाव, ३ साठवण तलाव आणि ४७ गावतलाव कोरडे आहेत. नदी, नाल्यांना अजुनही पूर गेलेला नाही. अशीच स्थितीत मध्यम आणि लघु प्रकल्पांची आहे. पुस प्रकल्पात केवळ १८.१२ टक्के साठा आहे. अरूणावती १३.६६, बेंबळा २३.२९, सायखेडा ४१.८०, गोकी २१.३५, वाघाडी २७.४२, बोरगाव २७.९९, लोअर पूस ४९.४२, अडाण ८.३१, नवरगाव २५.९९ टक्के इतका पाणीसाठा आहे. अडाण प्रकल्पात तर मृत साठाच शिल्लक राहीला आहे. जुलै मध्यापर्यंत मागील वर्षी याच प्रकल्पांमध्ये सरासरी ६० ते १०० टक्के पाणीसाठा होता. पाऊस पुढे लांबला नाहीतर बहुतांश प्रकल्पात ५० टक्केही पाणीसाठा राहणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मागच्या वर्षी अनेक प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने प्रकल्पामध्ये पातळी दिसत आहे. यंदाच्या पावसाने त्यात कोणतीच भर घातली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)