शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

अद्याप जिल्ह्यातील जलाशयात ठणठणाट

By admin | Updated: July 23, 2014 00:12 IST

गतवर्षी जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो झालेल्या तलावात यंदा ठणठणाट आहे. उशिरा दाखल झालेल्या पावसाचा हा परिणाम आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे.

यवतमाळ : गतवर्षी जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो झालेल्या तलावात यंदा ठणठणाट आहे. उशिरा दाखल झालेल्या पावसाचा हा परिणाम आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र जोरदार पाऊस झाला नसल्याने जलसाठ्यात अद्यापही वाढ झाली नाही. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १०.२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. जुलैपर्यंत ३८८ मिली मीटर पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केवळ १६८ मिमी पावसाची नोंद झाली. अनेक तालुक्यांनी शंभरीसुध्दा गाठली नाही. पुसद, उमरखेड, महागव येथे सर्वात कमी पाऊस झाला आहे. मारेगाव, वणी, राळेगाव, यवतमाळ, नेर बाभुळगाव येथे अपेक्षित सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस पडला आहे. तर दिग्रस, दारव्हा, आर्णी, कळंब, केळापूर, घाटंजी, झरी येथे सरासरी १५० ते २०० मिली मिटर पाऊस झाला आहे. तीन दिवसापासून पाण्याची रिपरिप सुरू असली तरी विशेष जोर नाही. रात्रंदिवस पाऊस सुरू असूनही २४ तासात केवळ १० ते १५ मिमी इतकीच नोंद झाली आहे. त्यामुळेच २४६ पाझर तलाव, ६९ सिंचन तलाव, ३ साठवण तलाव आणि ४७ गावतलाव कोरडे आहेत. नदी, नाल्यांना अजुनही पूर गेलेला नाही. अशीच स्थितीत मध्यम आणि लघु प्रकल्पांची आहे. पुस प्रकल्पात केवळ १८.१२ टक्के साठा आहे. अरूणावती १३.६६, बेंबळा २३.२९, सायखेडा ४१.८०, गोकी २१.३५, वाघाडी २७.४२, बोरगाव २७.९९, लोअर पूस ४९.४२, अडाण ८.३१, नवरगाव २५.९९ टक्के इतका पाणीसाठा आहे. अडाण प्रकल्पात तर मृत साठाच शिल्लक राहीला आहे. जुलै मध्यापर्यंत मागील वर्षी याच प्रकल्पांमध्ये सरासरी ६० ते १०० टक्के पाणीसाठा होता. पाऊस पुढे लांबला नाहीतर बहुतांश प्रकल्पात ५० टक्केही पाणीसाठा राहणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मागच्या वर्षी अनेक प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने प्रकल्पामध्ये पातळी दिसत आहे. यंदाच्या पावसाने त्यात कोणतीच भर घातली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)