शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

ब्रिटिशकालीन पुलावरुन अजूनही वाहतूक सुरू

By admin | Updated: August 5, 2016 02:37 IST

तालुक्यात दोन ब्रिटीश कालीन पूल आहे. परंतु हे पूल धोकादायक असल्याच्या कारणावरुन त्याठिकाणी नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली.

धोका टाळण्यासाठी वाहतूक बंद करणे गरजेचे कळंब : तालुक्यात दोन ब्रिटीश कालीन पूल आहे. परंतु हे पूल धोकादायक असल्याच्या कारणावरुन त्याठिकाणी नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली. परंतु जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली नाही. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करणे गरजेचे झाले आहे. कळंब-नागपूर मार्गावरील शिरपूरजवळ वर्धा नदीवर ब्रिटीश कालावधीत दगडांचा वापर करून मोठा पूल निर्माण करण्यात आला. आत्तापर्यंत याच पुलावरून वाहतूक सुरू होती. मात्र साधारणत: दहा वर्षांपूर्वी तेथे नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे मुख्य वाहतूक आता नवीन पुलावरुन होते. परंतु अजूनही जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णत: थांबली नाही. दुचाकी, बैलगाडी, सायकल एवढेच नव्हे, तर ट्रकचीसुध्दा वाहतूक जुन्या पुलावारुन होत आहे. शिरपूर गावातील बरेचसे लोक याच पुलाचा वापर करीत आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कळंब शहरातून वाहणाऱ्या चक्रावती नदीवरसुद्धा इंग्रज काळात दगडाने बांधलेला पूल आहे. तेथेही नजीकच्या काळापर्यंत याच पुलावरुन वाहतूक सुरु असायची. परंतु मागील पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी नव्याने पुलाची उभारणी करण्यात आली. असे असले तरीही जुन्या पुलावरील वाहतूक अद्याप सुरूच असते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्याची गरज आहे. शिरपूर येथील वर्धा नदी व कळंब येथील चक्रावती नदीवर नवीन पूल निर्माण होण्यापूर्वी मोठा पूर आला की जुन्या पुलावरून पाणी वाहायचे. त्यामुळे वाहतूक ठप्प पडायची. परंतु नवीन पूल निर्माण झाले तेव्हापासून कधीही पुलावरुन पाणी गेलेले नाही. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यू.व्ही.राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ब्रिटीशकालीन पुलाची कुठलीही माहिती आमच्या विभागाकडे नाही. कळंब तालुक्यामधून जाणाऱ्या राज्य मार्गावर कुठलाही पूल धोकादायक असल्याचा अहवाल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.