शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

ब्रिटिशकालीन पुलावरुन अजूनही वाहतूक सुरू

By admin | Updated: August 5, 2016 02:37 IST

तालुक्यात दोन ब्रिटीश कालीन पूल आहे. परंतु हे पूल धोकादायक असल्याच्या कारणावरुन त्याठिकाणी नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली.

धोका टाळण्यासाठी वाहतूक बंद करणे गरजेचे कळंब : तालुक्यात दोन ब्रिटीश कालीन पूल आहे. परंतु हे पूल धोकादायक असल्याच्या कारणावरुन त्याठिकाणी नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली. परंतु जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली नाही. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करणे गरजेचे झाले आहे. कळंब-नागपूर मार्गावरील शिरपूरजवळ वर्धा नदीवर ब्रिटीश कालावधीत दगडांचा वापर करून मोठा पूल निर्माण करण्यात आला. आत्तापर्यंत याच पुलावरून वाहतूक सुरू होती. मात्र साधारणत: दहा वर्षांपूर्वी तेथे नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे मुख्य वाहतूक आता नवीन पुलावरुन होते. परंतु अजूनही जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णत: थांबली नाही. दुचाकी, बैलगाडी, सायकल एवढेच नव्हे, तर ट्रकचीसुध्दा वाहतूक जुन्या पुलावारुन होत आहे. शिरपूर गावातील बरेचसे लोक याच पुलाचा वापर करीत आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कळंब शहरातून वाहणाऱ्या चक्रावती नदीवरसुद्धा इंग्रज काळात दगडाने बांधलेला पूल आहे. तेथेही नजीकच्या काळापर्यंत याच पुलावरुन वाहतूक सुरु असायची. परंतु मागील पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी नव्याने पुलाची उभारणी करण्यात आली. असे असले तरीही जुन्या पुलावरील वाहतूक अद्याप सुरूच असते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्याची गरज आहे. शिरपूर येथील वर्धा नदी व कळंब येथील चक्रावती नदीवर नवीन पूल निर्माण होण्यापूर्वी मोठा पूर आला की जुन्या पुलावरून पाणी वाहायचे. त्यामुळे वाहतूक ठप्प पडायची. परंतु नवीन पूल निर्माण झाले तेव्हापासून कधीही पुलावरुन पाणी गेलेले नाही. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यू.व्ही.राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ब्रिटीशकालीन पुलाची कुठलीही माहिती आमच्या विभागाकडे नाही. कळंब तालुक्यामधून जाणाऱ्या राज्य मार्गावर कुठलाही पूल धोकादायक असल्याचा अहवाल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.