शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ब्रिटिशकालीन पुलावरुन अजूनही वाहतूक सुरू

By admin | Updated: August 5, 2016 02:37 IST

तालुक्यात दोन ब्रिटीश कालीन पूल आहे. परंतु हे पूल धोकादायक असल्याच्या कारणावरुन त्याठिकाणी नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली.

धोका टाळण्यासाठी वाहतूक बंद करणे गरजेचे कळंब : तालुक्यात दोन ब्रिटीश कालीन पूल आहे. परंतु हे पूल धोकादायक असल्याच्या कारणावरुन त्याठिकाणी नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली. परंतु जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली नाही. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करणे गरजेचे झाले आहे. कळंब-नागपूर मार्गावरील शिरपूरजवळ वर्धा नदीवर ब्रिटीश कालावधीत दगडांचा वापर करून मोठा पूल निर्माण करण्यात आला. आत्तापर्यंत याच पुलावरून वाहतूक सुरू होती. मात्र साधारणत: दहा वर्षांपूर्वी तेथे नव्याने पुलाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे मुख्य वाहतूक आता नवीन पुलावरुन होते. परंतु अजूनही जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णत: थांबली नाही. दुचाकी, बैलगाडी, सायकल एवढेच नव्हे, तर ट्रकचीसुध्दा वाहतूक जुन्या पुलावारुन होत आहे. शिरपूर गावातील बरेचसे लोक याच पुलाचा वापर करीत आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कळंब शहरातून वाहणाऱ्या चक्रावती नदीवरसुद्धा इंग्रज काळात दगडाने बांधलेला पूल आहे. तेथेही नजीकच्या काळापर्यंत याच पुलावरुन वाहतूक सुरु असायची. परंतु मागील पाच वर्षांपूर्वी याच ठिकाणी नव्याने पुलाची उभारणी करण्यात आली. असे असले तरीही जुन्या पुलावरील वाहतूक अद्याप सुरूच असते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्याची गरज आहे. शिरपूर येथील वर्धा नदी व कळंब येथील चक्रावती नदीवर नवीन पूल निर्माण होण्यापूर्वी मोठा पूर आला की जुन्या पुलावरून पाणी वाहायचे. त्यामुळे वाहतूक ठप्प पडायची. परंतु नवीन पूल निर्माण झाले तेव्हापासून कधीही पुलावरुन पाणी गेलेले नाही. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यू.व्ही.राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ब्रिटीशकालीन पुलाची कुठलीही माहिती आमच्या विभागाकडे नाही. कळंब तालुक्यामधून जाणाऱ्या राज्य मार्गावर कुठलाही पूल धोकादायक असल्याचा अहवाल नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.