शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील उभे डोंगर धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 05:00 IST

महामार्ग निर्माण करताना जुने वळण नष्ट करण्यात आले. त्यासाठी मोठमोठ्ठे पहाड खोदण्यात आले. परंतु हे खोदलेले पहाड आजही उभे आहेत. अगदी रस्त्याच्या बाजूला असल्याने त्यावरील दगड कोणत्याही क्षणी खाली पडण्याची व जीविताला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनदेवपासून पुढे एक किलोमीटर अंतरात हे धोकादायक चित्र पहायला मिळते.  रस्त्याचे काम सुरू असतानासुद्धा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

ठळक मुद्देनागपूर-बोरी-तुळजापूर : धावत्या वाहनांवर दरड कोसळण्याची भीती वाढली

लाेकमत न्यूज नेटवर्कहिवरी : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील उभे असलेले डोंगर धोकादायक वाटत आहे. या डोंगराचे दगड केव्हाही कोसळण्याची आणि जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे. महामार्ग निर्माण करताना जुने वळण नष्ट करण्यात आले. त्यासाठी मोठमोठ्ठे पहाड खोदण्यात आले. परंतु हे खोदलेले पहाड आजही उभे आहेत. अगदी रस्त्याच्या बाजूला असल्याने त्यावरील दगड कोणत्याही क्षणी खाली पडण्याची व जीविताला धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मनदेवपासून पुढे एक किलोमीटर अंतरात हे धोकादायक चित्र पहायला मिळते.  रस्त्याचे काम सुरू असतानासुद्धा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. काही भागात मात्र दरड कोसळणार नाही व कोसळली तरी त्याचा वेग कमी होईल, या दृष्टीने उभ्या डोंगराला ठिकठिकाणी खचके देण्यात आले आहे. तीच सावधगिरी या मार्गाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकाॅन या कंपनीने इतर डोंगरांबाबत का घेतली नाही हा प्रश्नच आहे. नागरिक जीव मुठीत घेऊन तेथून प्रवास करतात. 

महागावपासून संथगती !महागावपासून पुढे तुळजापूरपर्यंत रस्ते बांधकामाचा कंत्राट सद्‌भावना कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे काम अगदीच संथगतीने सुरू आहे. त्यामुळे महागावपासून पुढे प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अथाॅरिटीचा ‘नो-रिस्पाॅन्स’दिलीप बिल्डकाॅनचे सहायक महाव्यवस्थापक रामअवतार त्यागी  यांच्याशी संपर्क केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. महामार्गाच्या प्रकल्प संचालकांनी प्रकरण ऐकून घेतले. मात्र प्रतिक्रिया देणे टाळले.  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गhighwayमहामार्ग