शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

नगरपंचायतींंना ‘क’ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा

By admin | Updated: April 13, 2015 00:58 IST

तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला असून या नगरपंचायतींंना क वर्ग नगरपरिषदेचा

ग्रामसेवकांना परत बोलाविले : हिशेबाचे खाते केले बंद नगरपंचायतीचा प्रमुख राहणार नगराध्यक्षग्रामसेवकांऐवजी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्तीजिल्हा परिषद शाळा होणार नगरपंचायतीकडे स्थानांतरित रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला असून या नगरपंचायतींंना क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा राहणार आहे. नगरपरिषदेच्या प्रमुखाला नगराध्यक्ष आणि सदस्यांना नगरसेवक म्हणून संबोधले जाणार आहे. अधिसूचना जारी झाल्याने जिल्हा परिषदेने आपल्या हिशेबाचे खाते बंद केले असून ग्रामसेवकांनाही परत बोलाविले आहे. लवकरच या ठिकाणी निवडणूकही होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, बाभूळगाव, महागाव, मारेगाव, कळंब आणि झरी येथील ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य शासनाने आदेश काढताच त्या ठिकाणी तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढील काळात ही ग्रामपंचायत नगरपंचायत म्हणून ओळखली जाणार असून त्यांना क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा राहणार आहे. साधारणत: नगरपरिषद स्थापनेसाठी २५ हजार लोकसंख्येची अट आहे. असे असले तरी नगरपरिषदेचा दर्जा देण्यासाठी प्रारंभी नगरविकास विभागाची अधिसूचना आवश्यक आहे. त्यावर आक्षेप मागविले जातात. त्यानंतर नगरपरिषदेचा दर्जा दिला जातो. मात्र तालुका मुख्यालय असलेल्या अनेक ठिकाणी ही अट पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये नगरपंचायत स्थापन्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तेथे तहसीलदारांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अधिसूचना जाहीर होताच जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या ग्रामपंचायती बरखास्त झाल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेने आपले आर्थिक व्यवहार थांबविले असून या गावांची ग्रामसेवकाकडील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. नगरपंचायत म्हणजे काय ?नगरपंचायती म्हणजे नगरपरिषदेचे छोटे स्वरूप राहणार आहे. नगरपंचायतीला क वर्ग नगरपरिषदेचा दर्जा राहणार आहे. या ठिकाणी कारभार सांभाळण्यासाठी ग्रामसेवकांऐवजी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. सध्या प्रशासक म्हणून तहसीलदारांकडे काम सोपविण्यात आले आहे. निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यानंतर बरखास्त ग्रामपंचायतीची नगरपंचायतीसाठी निवडणूक घेतली जाईल. नगरपंचायतीचा प्रमुख नगराध्यक्ष म्हणून ओळखला जाईल. तर सदस्यांना नगरसेवक म्हणून संबोधले जाणार आहे. अनुदानात वाढ होणार नगरपंचायतीला विकासासाठी नगरविकास विभाग निधी देणार आहे. हा निधी ग्रामपंचायतीच्या तुलनेत मोठा राहणार आहे. यामुळे विकास कामात माघारलेल्या तालुका ठिकाणची आर्थिक अडचण दूर होईल. रमाई आवास योजनेसह शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध होईल. यासोबतच घराचा करही वाढणार आहे.कर्मचारी नगरपंचायतीकडेग्रामपंचायतीमध्ये सध्या कार्यरत कर्मचारी नगरपंचायतीकडे हस्तांतरित होतील. त्यांच्या वेतनाची जबाबदारी नगरविकास विभाग पार पाडेल. यासोबतच जिल्हा परिषदेच्या शाळाही नगरपंचायतीकडे स्थानांतरित होतील. या ठिकाणचे शिक्षकही नगरपंचायतीला जोडले जातील. निवडणूक विभागाने सूचना दिल्यानंतर नगरपंचायतीच्या निवडणुका घेतल्या जातील. तोपर्यंत या ठिकाणी प्रशासक काम पाहणार आहे. तहसीलदारांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.- नरेंद्र फुलझेले, निवडणूक निर्णय अधिकारी, यवतमाळ