शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

बसस्थानकाची केविलवाणी अवस्था

By admin | Updated: May 4, 2015 00:00 IST

शहराच्या मध्यवस्तीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दिग्रस बसस्थानकाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे.

सुविधांचा अभाव : दिग्रस बसस्थानकाकडे प्रवाशांचीच पाठ, पिण्याच्या पाण्यासाठी ठेवले माठ सुनील हिरास दिग्रसशहराच्या मध्यवस्तीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दिग्रस बसस्थानकाची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. प्रवाशांनीच या बसस्थानकाकडे पाठ फिरविली असून लांबपल्ल्याच्या बसेसही बसस्थानकात न जाता सरळ निघून जातात. बसस्थानकात बसायला खुर्च्या नाही, रात्री अंधाराचे साम्राज्य आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून केवळ दोन माठ ठेवलेले आहे. दिग्रस बसस्थानकाकडे वरिष्ठांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. दिग्रस या तालुक्याच्या ठिकाणी १९९० पर्यंत बसस्थानक मध्यवस्तीत होते. ही जागा अपुरी पडत असल्याने सुसज्ज बसस्थानक व्हावे म्हणून व्यापक आंदोलन केले. या आंदोलनाला यश आले. दिग्रस-दारव्हा मार्गावर शहरापासून चार किलोमीटर अंतरावर सहा एकर विस्तीर्ण जागेत बसस्थानक आणि आगार बांधण्यात आले. सुरुवातीला या ठिकाणी सर्व सुविधा होत्या. परंतु गावापासून लांब अंतरावर असलेल्या बसस्थानकाकडील प्रवाशांनी पाठ फिरविली. मानोरा चौक, शिवाजी चौक, शंकर टॉकीज, आर्णी नाका आदी भागातूनच प्रवाशांनी बसमध्ये बसणे पसंत केले. परिणामी दिग्रसच्या बसस्थानकावर केवळ बाहेरगावहून येणाऱ्या प्रवाशांचीच गर्दी दिसत होती. आता तर दिग्रस बसस्थानकाच्या दुरवस्थेने प्रवासीही बसस्थानकात यायला तयार नसतात. बसस्थानकाच्या आतमध्ये आसन व्यवस्था मर्यादित आहे. प्रवाशांना त्या ठिकाणी उभेच रहावे लागते. बसस्थानकाच्या आवारात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी बांधलेले दुकान गाळे बंद आहे. रात्री ८ नंतर तर या बसस्थानकात जाण्याची कुणी हिंमतही करू शकत नाही. हायमास्ट लाईट व इतर प्रकाश योजना बंद आहे. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य असते. मुख्य बसस्थानकाच्या बाजूला झुडूपे वाढले आहे. त्यामुळे प्रवाशात भीतीचे वातावरण असते. प्रसाधनगृहाचीही प्रचंड दुरवस्था झाली असून त्याकडे कोणी लक्ष देत नाही. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष दिग्रस आगार व्यवस्थापक दारव्हा येथून येणे-जाणे करीत आहे. आगार व्यवस्थापकाच्या अप-डाऊनने कर्मचाऱ्यावर दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दिग्रस आगाराची कोणतीही गाडी वेळेवर सुटत नाही. कर्मचाऱ्यांच्या समस्याही कुणी ऐकून घेत नाही. प्रवाशांनाही सुविधा दिल्या जात नाही.