शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

जमात-ए-इस्लामी हिंदचे राज्यव्यापी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:08 IST

सध्या सरकारच्या काळात देशात सामाजिक तेढ, गुन्हे, उपासमारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. विकासाच्या नावावर सरकारने राजकारण चालविले आहे. गंभीर म्हणजे, सुशिक्षित लोक चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला तयारच नाही, .....

ठळक मुद्देसामाजिक एकोपा : विकासाच्या नावावर राजकारण - मो. इकबाल मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सध्या सरकारच्या काळात देशात सामाजिक तेढ, गुन्हे, उपासमारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. विकासाच्या नावावर सरकारने राजकारण चालविले आहे. गंभीर म्हणजे, सुशिक्षित लोक चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला तयारच नाही, अशी खंत जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद इकबाल मुल्ला यांनी व्यक्त केली.यवतमाळात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोहम्मद इकबाल मुल्ला म्हणाले, देशात विकास आणि उद्योजकता वाढण्याऐवजी प्रत्येक क्षेत्रात देश मागे जात आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे जमात-ए-इस्लामी हिंद संघटना आता १२ ते २१ जानेवारी या कालावधीत सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी अभियान राबविणार आहे. ‘इस्लाम शांती, विकास व मुक्तीसाठी’ अशी या अभियानाची संकल्पना आहे. संघटनेचे कार्यकर्ते प्रत्यक्ष जनतेत जाऊन मुस्लीम समाजाबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. असे कार्यक्रम यापूर्वीही घेण्यात आले, तेव्हा चांगला प्रतिसाद मिळाला. विविध जातीसमुहांनी त्या कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळीही राजकीय, सामाजिक, सहिष्णुतावादी संघटना आणि विचारवंतांना जमात-ए-इस्लामी हिंद संघटना सोबत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षण, रोजगार आणि जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण होऊन सर्वांना समान संधी मिळाली तरच देशाचा विकास होईल. परंतु, आज १७ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. महाराष्ट्रात तर २२ टक्के लोक आर्थिक दुर्बल आहेत. मुंबईतील धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असल्याचे अभिमानाने सांगितले जाते. अशा अभिमानाने देशाचा विकास कसा होईल? समाज कल्याण विभागाचे बजेट जेमतेमच आहे. अनेक जिल्हे आजही कुपोषणग्रस्त आहेत. अशा सर्व वंचित घटकांना एकत्र आणण्यासाठी जमात-ए-इस्लामी हिंद अभियान राबविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.पत्रकार परिषदेला जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद इकबाल मुल्ला, प्रसार विभागाचे सचिव इम्तियाज शेख, यवतमाळ शहराध्यक्ष अजमत उल्ला खान, वाजीद उल्ला खान आदी उपस्थित होते.असे राबविणार अभियान‘इस्लाम शांती, विकास व मुक्तीसाठी’ हे अभियान १२ ते २१ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जमात-ए-इस्लामी हिंदच्या कार्यकर्त्यांचे सात गट तयार करण्यात आले. हे कार्यकर्ते ३६ जिल्ह्यांमध्ये फिरून ६०० ठिकाणी कार्यक्रम घेणार आहेत. विविध भागातील लोकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधणार आहेत. अभियानाच्या १४ लाख पत्रिकांचे वितरण केले जात आहे. शिवाय सोशल मीडियाद्वारे एका आठवड्यात ५० लाख लोकांपर्यंत शांतीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.