शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

जमात-ए-इस्लामी हिंदचे राज्यव्यापी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:08 IST

सध्या सरकारच्या काळात देशात सामाजिक तेढ, गुन्हे, उपासमारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. विकासाच्या नावावर सरकारने राजकारण चालविले आहे. गंभीर म्हणजे, सुशिक्षित लोक चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला तयारच नाही, .....

ठळक मुद्देसामाजिक एकोपा : विकासाच्या नावावर राजकारण - मो. इकबाल मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सध्या सरकारच्या काळात देशात सामाजिक तेढ, गुन्हे, उपासमारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. विकासाच्या नावावर सरकारने राजकारण चालविले आहे. गंभीर म्हणजे, सुशिक्षित लोक चुकीच्या गोष्टीला चूक म्हणायला तयारच नाही, अशी खंत जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद इकबाल मुल्ला यांनी व्यक्त केली.यवतमाळात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोहम्मद इकबाल मुल्ला म्हणाले, देशात विकास आणि उद्योजकता वाढण्याऐवजी प्रत्येक क्षेत्रात देश मागे जात आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे जमात-ए-इस्लामी हिंद संघटना आता १२ ते २१ जानेवारी या कालावधीत सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी अभियान राबविणार आहे. ‘इस्लाम शांती, विकास व मुक्तीसाठी’ अशी या अभियानाची संकल्पना आहे. संघटनेचे कार्यकर्ते प्रत्यक्ष जनतेत जाऊन मुस्लीम समाजाबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. असे कार्यक्रम यापूर्वीही घेण्यात आले, तेव्हा चांगला प्रतिसाद मिळाला. विविध जातीसमुहांनी त्या कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळीही राजकीय, सामाजिक, सहिष्णुतावादी संघटना आणि विचारवंतांना जमात-ए-इस्लामी हिंद संघटना सोबत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षण, रोजगार आणि जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण होऊन सर्वांना समान संधी मिळाली तरच देशाचा विकास होईल. परंतु, आज १७ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. महाराष्ट्रात तर २२ टक्के लोक आर्थिक दुर्बल आहेत. मुंबईतील धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असल्याचे अभिमानाने सांगितले जाते. अशा अभिमानाने देशाचा विकास कसा होईल? समाज कल्याण विभागाचे बजेट जेमतेमच आहे. अनेक जिल्हे आजही कुपोषणग्रस्त आहेत. अशा सर्व वंचित घटकांना एकत्र आणण्यासाठी जमात-ए-इस्लामी हिंद अभियान राबविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.पत्रकार परिषदेला जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद इकबाल मुल्ला, प्रसार विभागाचे सचिव इम्तियाज शेख, यवतमाळ शहराध्यक्ष अजमत उल्ला खान, वाजीद उल्ला खान आदी उपस्थित होते.असे राबविणार अभियान‘इस्लाम शांती, विकास व मुक्तीसाठी’ हे अभियान १२ ते २१ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जमात-ए-इस्लामी हिंदच्या कार्यकर्त्यांचे सात गट तयार करण्यात आले. हे कार्यकर्ते ३६ जिल्ह्यांमध्ये फिरून ६०० ठिकाणी कार्यक्रम घेणार आहेत. विविध भागातील लोकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधणार आहेत. अभियानाच्या १४ लाख पत्रिकांचे वितरण केले जात आहे. शिवाय सोशल मीडियाद्वारे एका आठवड्यात ५० लाख लोकांपर्यंत शांतीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.