शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

घाटंजीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:39 IST

घाटंजी : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रपतींना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले. कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित ...

घाटंजी : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रपतींना तहसीलदारांमार्फत निवेदन पाठविण्यात आले.

कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यास कायमस्वरूपी स्थगिती द्यावी, जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत अध्यादेश काढावा, केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करावे, सोयाबीन, कापूस व अन्य पिकांची विम्याची रक्कम त्वरित द्यावी, आणेवारीनुसार दुष्काळाच्या सवलती व कर्जाच्या वसुलीला स्थगिती देऊन कर्ज पुनर्गठन करावे, आदी माग्ण्या करण्यात आल्या.

याशवाय, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ योजनेंतर्गत २००९ ते २०१६ पर्यंतची कर्जमाफी पूर्णतः निकालात काढावी, ही मागणीही करण्यात आली. येथील तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे याच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आले. नंतर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार डी.एम. राठोड यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. यावेळी मोरेश्वर वातीले यांनी सरकारच्या धोरणावर आसुड ओढत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आंदोलनात युवराज आडे, सूरज टेकाम, सोपान पंधरे, अशोक देवतळे, सय्यद सरफराज, महेंद्र कांबळे, अनंत सोनडवले, हरिदास खोब्रागडे, भगवान बन्सोड, मधुकर सातपुडके, विलास तोडसाम, रामेश्वर मडावी, प्रेमानंद उमरे, विनायक नगराळे, सचिन राठोड, दीक्षांत वासनिक, सूरज रामटेके, साहिल रामटेके, गौरव शेंडे, यशवंत भगत, रा.वि. नगराळे, नरेंद्र भगत, नंदकुमार देवतळे आदींसह शेतकरी सहभागी होते.