शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

शिवसेनेच्या नेटवर्कपुढे प्रदेशाध्यक्ष हतबल

By admin | Updated: June 15, 2014 23:47 IST

विधानसभेच्या दिग्रस-दारव्हा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे नेटवर्क आहे. हे नेटवर्क तोडण्यात गेल्या सहा वर्षात खुद्द प्रदेशाध्यक्षांनाही यश न आल्याने काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे.

काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर : राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही बंडाची तयारी, अल्पसंख्यक मतदारांची नाराजी राजेश निस्ताने - यवतमाळ विधानसभेच्या दिग्रस-दारव्हा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेचे नेटवर्क आहे. हे नेटवर्क तोडण्यात गेल्या सहा वर्षात खुद्द प्रदेशाध्यक्षांनाही यश न आल्याने काँग्रेसमध्ये मरगळ आली आहे. शिवसेनेचे संजय राठोड या मतदारसंघाचे आमदार आहे. त्यांनी माजी मंत्री माणिकराव ठाकरे, संजय देशमुख यांचा पराभव केला. हा मतदारसंघ माणिकरावांचा परंपरागत आहे. दिग्रस-दारव्हा-नेर या तीनही तालुक्यात शिवसेनेचे गावागावात नेटवर्क आहे. हे नेटवर्क तोडून संजय राठोड यांना मात देण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न केले गेले. परंतु त्यांना अद्याप यश आलेले नाही. या मतदारसंघात काँग्रेसमध्ये प्रचंड मरगळ आल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. काँग्रेसकडे मुरब्बी कार्यकर्ते असूनही प्रदेशाध्यक्षांना त्यांचा पक्षासाठी लाभ करून घेता आलेला नाही. माणिकरावांचा या मतदारसंघातील संपर्क तुटला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून मतदारसंघाला आणि तेथील सामान्य कार्यकर्त्यांना गेल्या सहा वर्षात काय दिले, असा जाहीर सवाल उपस्थित केला जात आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून शब्दाला किंमत असताना माणिकरावांनी एकही कार्यकर्ता मोठा केला नाही. मंडळ, महामंडळ रिक्त ठेवले पण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही. त्यामुळेच अल्पसंख्यक समाज काँग्रेसवर नाराज आहे. यावेळी काँग्रेसला ‘हात’ दाखविण्याची मानसिक तयारी अल्पसंख्यक मतदार करीत आहे. शिवसेनेच्या नेटवर्कमुळे या मतदारसंघात निवडणूक लढविण्याची हिंमत माणिकराव दाखविणार नाहीत, असा प्रत्येकालाच आत्मविश्वास आहे. स्वत:ऐवजी ते मुलगा राहुल ठाकरे यांना रिंगणात उतरविणार आहे. काँग्रेसचे नेटवर्क कोलमडल्याने मुलासाठी दिग्रस ऐवजी यवतमाळातून चाचपणी केली गेली. मात्र यवतमाळात उमेदवारांची भाऊगर्दी होण्याची चिन्हे पाहून पुन्हा काँग्रेसने दिग्रसकडेच मोर्चा वळविला. गेल्या वेळी काँग्रेस व शिवसेनेच्या उमेदवारामध्ये मताचे अंतर ५० हजारापेक्षा अधिक होते. हे अंतर ठाकरे पिता-पूत्रांना कमी करता आले नाही. संपर्क नसल्याने ते आणखी वाढले. गेल्या वेळी संजय देशमुखांना उमेदवारी दिली गेली असली तरी ठाकरे समर्थकांनी आपले काम केले नाही, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. यावेळी राहुल ठाकरेंसोबतच उमेदवारीसाठी पुन्हा संजय देशमुख, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष शिक्षक नेते राजुदास जाधव यांची नावे चर्चेत आहे. शिवसेनेकडून संजय राठोड यांना सध्या तरी पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर फेरबदलामध्ये दावा सांगितला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला सुटला नाही तरीही एकदा निवडणूक लढवायचीच या निर्धाराने इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहे. लोकसभा निवडणुकीत गेल्या वेळी शिवसेनेला दहा हजार मतांची आघाडी होती. यावेळी ती तब्बल २७ हजारांवर पोहोचली आहे. काँग्रेससाठी मतांची ही पिछाडी धोकादायक संकेत देत आहे. माणिकरावांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा मतदारसंघात कुणालाच लाभ नाही, संपर्क नाही, पक्ष कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, अशी काँग्रेसच्या गोटातीलच ओरड आहे. मतदारसंघात कोण अधिकारी आला, कोण येणार याची ठाकरे पिता-पूत्रांना खबरबात राहत नाही, त्यांच्या नावावर निकटवर्तीयांकडून मात्र अधिकाऱ्यांच्या सोईच्या बदल्यांची दलाली निश्चित केली जाते. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही होते. त्यासाठी सर्रास ‘भाऊंचा आदेश’ असा वापर केला जातो.