शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

आदेशाची वाट न पाहता हंगामी वसतिगृहाचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:46 IST

आईवडील मजुरीसाठी परगावात गेले. पण छोट्या-छोट्या लेकरांची शाळा असल्याने ते गावातच थांबले. या मुलांच्या जेवणाचे, राहण्याचे वांदे आहेत. त्यांच्यासाठी शासनाने हंगामी वसतिगृहांसाठी निधी मंजूर केल्यावरही शिक्षण विभागाला जिल्ह्यात अद्याप एकही वसतिगृह सुरू करता आलेले नाही.

ठळक मुद्देशिक्षकांचे धाडस : निधी मंजूर, तरीही प्रशासनाला मात्र प्रस्तावांचीच प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आईवडील मजुरीसाठी परगावात गेले. पण छोट्या-छोट्या लेकरांची शाळा असल्याने ते गावातच थांबले. या मुलांच्या जेवणाचे, राहण्याचे वांदे आहेत. त्यांच्यासाठी शासनाने हंगामी वसतिगृहांसाठी निधी मंजूर केल्यावरही शिक्षण विभागाला जिल्ह्यात अद्याप एकही वसतिगृह सुरू करता आलेले नाही. मात्र, पोरांची आबाळ लक्षात घेऊन काही शिक्षकांनी आदेशाची वाट न पाहता वसतिगृह सुरू करून प्रशासनाच्या लेटलतिफ कारभारला चपराक दिली आहे.पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव तालुक्यातील मजुरांनी दिवाळीपूर्वीच परगावात, पर जिल्ह्यात रोजगारासाठी स्थलांतर केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या रोडावण्याची शक्यता लक्षात घेता, शिक्षकांनी अशा मजुरांची मनधरणी करून त्यांच्या मुलांना गावातच थांबविले. नियमानुसार, एक नोव्हेंबरपासूनच या मुलांसाठी शाळांमध्ये हंगामी वसतिगृह सुरू होण्याची गरज होती. मात्र शिक्षण विभागाच्या उच्च पदस्थांनी मंजुरीलाच महिनाभराचा विलंब लावला. त्यानंतर निधी मंजूर झाला. मात्र जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने आता शाळांकडून वसतिगृह सुरू करण्याचे प्रस्ताव मागविले आहेत. हे प्रस्ताव आल्यावर, त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजुरीची मोहोर उमटवल्यावर वसतिगृह सुरू होणार आहेत.पण तोपर्यंत या मुलांचे काय करायचे, हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. हीच स्थिती भंडारी (ता. पुसद) या दुर्गम गावातील शिक्षकांपुढे निर्माण झाला. शाळेत आल्यावर स्थालांतरित मजुरांच्या पोरांनी वसतिगृहाविषयी विचारणा केली. त्यावेळी शिक्षकांकडे कोणतेही उत्तर नव्हते. अखेर या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक गणेश चव्हाण यांनी सर्वांना विश्वासात घेऊन लगेच आपल्या शाळेत हंगामी वसतिगृह सुरू केले. गेल्या सोमवारपासून आता या मुलांना जेवण दिले जात आहे. प्रशासनाचा आदेश आल्यावर अधिकृत वसतिगृह सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.भंडारीचे भागले, इतरांचे काय?भंडारीच्या जिल्हा परिषद शाळेने प्रशासनाची वाट न पाहता हंगामी वसतिगृह सुरू करून टाकले. त्यामुळे तेथील स्थालांतरित मजुरांच्या मुलांची सोय झाली आहे. परंतु, या शाळेप्रमाणेच पुसद, महागाव, उमरखेड आणि दिग्रस तालुक्यातील साधारण ५० शाळांपुढे ही समस्या कायम आहे. त्यांना शिक्षण विभाग वसतिगृह सुरू करण्याचा आदेश कधी देणार, हा प्रश्न आहे.