शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

जलयुक्तच्या नाला सरळीकरणाला सुरूं ग

By admin | Updated: June 9, 2017 01:43 IST

कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेतून केवळ राजकीय ठेकेदारांचे अथवा पक्ष कार्यकर्त्यांचे आर्थिक पुनर्वसन केले ...

सव्वा कोटींचे काम : कंत्राटदार काम सोडून पसारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेतून केवळ राजकीय ठेकेदारांचे अथवा पक्ष कार्यकर्त्यांचे आर्थिक पुनर्वसन केले जात असल्याने कामाला सुरुंग लागला आहे. सेवानिवृत्त अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या एका कंत्राटदाराने नाला सरळीकरणाचे सव्वा कोटींचे काम घेऊन अर्ध्यावर सोडून दिले आहे. दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी येथे जलयुक्त शिवार योनजेतून नागोबा नाला सरळीकरणासह इतरही कामे प्रस्तावित आहे. या कामासाठी एक कोटी २१ लाखांची तरतूद आहे. ई- निविदेचा सोपस्कार पूर्ण करून पुसद येथील एका सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या संस्थेला हे काम देण्यात आले. इस्टीमेटप्रमाणे यामध्ये तीन मीटर खोली आणि २०० मीटर लांबीचे काम आहे. या ठेकेदाराने जेसीबी मशीनद्वारे २५ व २६ मे रोजी दोन दिवस काम करून अर्धवट सोडून दिले. शेत शिवारातून त्याने मशीनही परत नेल्या आहेत. अर्धवट कामामुळे पावसाचे पाणी शेतात शिरण्याची भिती असल्याने शेतकऱ्यांनी कंत्राटदाराला याबाबत विचारणा केली. त्याने सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक असल्याचे सांगितले. आता हे अर्धवट काम सोडून पळालेल्या ठेकेदाराची शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. राजकीय पाठबळ मिळत असल्याने जलयुक्त शिवाराच्या कामाला सुरूंग लावला जात असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. कृषी विभागाची यंत्रणा ही राजकीय पुढाऱ्यांच्याच दावणीला बांधली गेली असून त्यांच्या मर्जीविरूद्ध काम करण्यास तयार नाही. झालेल्या कामाची तांत्रिक दृष्ट्या उपायेगिताही तपासली जात नाही. तुपटाकळी येथील नाला सरळीकरण कामाची अजय ठाकरे या शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. आता पारदर्शक प्रशासनाची हमी देणारे जिल्हाधिकारी या प्रकरणत कोणती भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.माती काम असून त्यावर ब्लास्टींगसाठी आर्थिक तरतूद नाही. या कामात काळा दगड लागल्याने इस्टीमेटप्रमाणे काम करणे शक्य नाही. झालेल्या कामाचेच बील ठेकेदाराला देण्यात येईल. -अर्जुन जाधव, तालुका कृषी अधिकारी, दिग्रस