शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

संतप्त नागरिकांकडून महावितरणवर दगडफेक

By admin | Updated: July 1, 2014 23:43 IST

तालुक्यातील घोन्सा येथील ३३ के़व्ही़ वीज उपकेंद्रावर सोमवारी रात्री परिसरातील दहेगाव, सोनेगाव व साखरा येथील संतप्त शेतकरी व नागरिकांनी धडक देऊन दगडफेक केली़ यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण

वणी : तालुक्यातील घोन्सा येथील ३३ के़व्ही़ वीज उपकेंद्रावर सोमवारी रात्री परिसरातील दहेगाव, सोनेगाव व साखरा येथील संतप्त शेतकरी व नागरिकांनी धडक देऊन दगडफेक केली़ यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.गेल्या काही दिवसांपासून घोन्सा परिसरात भारनियमनाने कहर केला आहे. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पीक जगविण्यासाठी ओलित करणे आवश्यक झाले आहे. मात्र वीज राहात नसल्याने पिकांना पाणी देणेही अशक्य झाले आहे. यामुळे शेतकरी चांगलेच संतापलेले अहेत. याबाबत अनेकदा महावितरणला सूचना दिल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही़ परिणामी शेतकऱ्यांच्या संतापाचा आता बांध फुटला आहे.पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंता कार्यालयालासमोरही ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी अनेकदा आपल्या समस्या मांडल्या होत्या़ तरीही महावितरणतर्फे कोणतीही उपाययोजना करण्यात आलीच नाही. घोन्सा येथील वीज उपकेंद्राअंतर्गत ३५ गावे येतात. त्यातील प्रत्येक गावात दररोज रात्री मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू आहे़ रात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे़ त्याचबरोबर गावातील पिठ गिरणी, विजेवर चालणारी उपकरणे शोभेची वस्तू ठरत आहे़कृषी पंपांचाही वीज पुरवठा बंद राहत असल्याने शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी करपली आही. त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ ओढवली आहे़ वरूण राजा शेतकऱ्यांवर रूसला असून आता महावितरणही शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत आहे़ या सर्व प्रकारामुळे शेतकरी व ग्रामस्थ चांगलेच कंटाळले आहे़ सुरूवातीला दहेगाव, सोनेगाव येथील शेतकरी व ग्रामस्थांनी सोमवारी रात्री ८ वाजता महावितरण कार्यालयावर धडक दिली़ त्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून त्यांना शिव्यांची लाखोळी वाहिली़ शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी दगडफेक करायला सुरूवात केली़ त्यात महावितरणच्या सभोवताल लावलेल्या काचा व बल्ब दगडाने फुटले. येथील अभियंतासुध्दा केवळ दर शुक्रवारी येथे येत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या रखडल्या आहे़ त्यांना लहान-मोठ्या तक्रारीसाठी पांढरकवडा व झरीला चकरा माराव्या लागत आहे़ कामचुकार अभियंत्यावर वरिष्ठांनी कारवाई करून कृषी पंपाचा वीज पुरवठा व भारनियमन बंद करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)