शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

दहावीच्या निकालात जिल्हा विभागात ढांग

By admin | Updated: June 14, 2017 00:15 IST

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ७८.०३ टक्के लागल.

जिल्हा ७८ टक्के : ‘जायन्ट्स’ची आरोही अमीन जिल्ह्यात अव्वल, यंदाही मुलींची बाजी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ७८.०३ टक्के लागल. उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी ७४.४२ असताना ८२.२३ टक्के मुलींनी उत्तीर्ण होऊन पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध केली. येथील जायन्ट्स स्कूलची विद्यार्थिनी आरोही अनिल अमीन ही १०० टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. निकालात अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा ७८.०३ टक्क्यांसह सर्वात कमी निकाल देणारा जिल्हा ठरला. अमरावती ८५.१५, अकोला ८४.०२, बुलडाणा ८८.४९, वाशीम जिल्ह्याचा निकाल ८७.३७ टक्के लागला. जिल्ह्यातून यंदा दहावीच्या परीक्षेला ४० हजार ६५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३१ हजार ७२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर तब्बल ८ हजार ९३४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ४ हजार ३७० जणांनी विशेष प्राविण्यश्रेणी मिळविली. प्रथम श्रेणीत १० हजार २०१, द्वितीय श्रेणीत १३ हजार १९६, तर तृतीय श्रेणीत ३ हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यवतमाळातील जायन्ट्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या आरोही अनिल अमीन हिने १०० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात इतिहास रचला. तिला बेस्ट फाईव्ह विषयांच्या एकूण ५०० गुणांपैकी ४९०, तर क्रीडाचे १० गुण मिळाल्याने ५०० पैकी ५०० गुण मिळून ती १०० टक्के यशाची मानकरी ठरली. दिग्रसचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांची कन्या व मोहनाबाई कन्याशाळेची विद्यार्थिनी प्रणवती प्रमोद सूर्यवंशी, दिनबाई विद्यालयाचा साहील घोंगडे आणि यवतमाळातील फ्री मेथॉडिस्ट स्कूलची विद्यार्थिनी आदिती ओमप्रकाश पिंपळकर हे तिघे ९९.४० टक्के घेऊन जिल्ह्यात द्वितीय आले. यवतमाळच्या नंदूरकर शाळेतील प्रतीक सतीश काळे आणि दिग्रसच्या दिनबाई शाळेचा वैभव आडे, घाटंजीच्या समर्थ विद्यालयाची हर्षदा नितीन भोरे हे तिघे ९८.८० टक्के गुणांसह जिल्ह्यात तृतीय आले. नंदूरकर शाळेतील श्रावणी मदन देशमुख, राणी लक्ष्मीबाई शाळेची साक्षी विनोद इंगोले (९८.६०), जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची साक्षी सुरेंद्र राठी (९८.४०), लोकनायक अणे विद्यालयाचा राजस हर्षवर्ध राखे (९७.८०) यांनीही उत्तम कामगिरी केली. शिक्षणाधिकारीच अनभिज्ञ दहावीच्या निकालाची टक्केवारी नेमकी कशी काढली जाते, याबाबत येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी हे स्वत:च अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. टक्केवारी काढण्याच्या पद्धतीबाबत आपल्याला माहिती नाही, असे स्पष्ट करताना वंजारी यांनी शिक्षण मंडळाशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. बेस्ट आॅफ फाईव्ह आणि क्रीडा व कला गुण मिळूनच टक्केवारी काढली जाते. यात कोणत्याही स्थितीत कुणालाच शंभर टक्केच्यावर गुण मिळणार नाही, याची दक्षता घेतली जाते. - संजय यादगिरे सचिव, अमरावती विभागीय शिक्षण मंडळ ८२ टक्के मुली उत्तीर्ण दहावीच्या निकालात गेल्या काही वर्षांपासून मुलींचीच सरशी होत आहे. हेच चित्र यंदाही कायम राहिले. जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला २१ हजार ८९२ मुले, तर १८ हजार ७६४ मुली बसल्या होत्या. त्यापैकी १६ हजार २९३ मुले उत्तीर्ण झाली, तर १५ हजार ४२९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ८२.२३ टक्के इतकी मुलींच्या यशाची सरासरी आहे. तसेच अनुत्तीर्ण झालेल्या ८ हजार ९३४ जणांपैकी मुलींचे प्रमाण अत्यल्प आहे. दहावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या १८ जुलैपासून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.