शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालात जिल्हा विभागात ढांग

By admin | Updated: June 14, 2017 00:15 IST

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ७८.०३ टक्के लागल.

जिल्हा ७८ टक्के : ‘जायन्ट्स’ची आरोही अमीन जिल्ह्यात अव्वल, यंदाही मुलींची बाजी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याचा निकाल ७८.०३ टक्के लागल. उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची टक्केवारी ७४.४२ असताना ८२.२३ टक्के मुलींनी उत्तीर्ण होऊन पुन्हा एकदा गुणवत्ता सिद्ध केली. येथील जायन्ट्स स्कूलची विद्यार्थिनी आरोही अनिल अमीन ही १०० टक्के गुण घेत जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. निकालात अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा ७८.०३ टक्क्यांसह सर्वात कमी निकाल देणारा जिल्हा ठरला. अमरावती ८५.१५, अकोला ८४.०२, बुलडाणा ८८.४९, वाशीम जिल्ह्याचा निकाल ८७.३७ टक्के लागला. जिल्ह्यातून यंदा दहावीच्या परीक्षेला ४० हजार ६५६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३१ हजार ७२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर तब्बल ८ हजार ९३४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ४ हजार ३७० जणांनी विशेष प्राविण्यश्रेणी मिळविली. प्रथम श्रेणीत १० हजार २०१, द्वितीय श्रेणीत १३ हजार १९६, तर तृतीय श्रेणीत ३ हजार ९५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यवतमाळातील जायन्ट्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या आरोही अनिल अमीन हिने १०० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात इतिहास रचला. तिला बेस्ट फाईव्ह विषयांच्या एकूण ५०० गुणांपैकी ४९०, तर क्रीडाचे १० गुण मिळाल्याने ५०० पैकी ५०० गुण मिळून ती १०० टक्के यशाची मानकरी ठरली. दिग्रसचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांची कन्या व मोहनाबाई कन्याशाळेची विद्यार्थिनी प्रणवती प्रमोद सूर्यवंशी, दिनबाई विद्यालयाचा साहील घोंगडे आणि यवतमाळातील फ्री मेथॉडिस्ट स्कूलची विद्यार्थिनी आदिती ओमप्रकाश पिंपळकर हे तिघे ९९.४० टक्के घेऊन जिल्ह्यात द्वितीय आले. यवतमाळच्या नंदूरकर शाळेतील प्रतीक सतीश काळे आणि दिग्रसच्या दिनबाई शाळेचा वैभव आडे, घाटंजीच्या समर्थ विद्यालयाची हर्षदा नितीन भोरे हे तिघे ९८.८० टक्के गुणांसह जिल्ह्यात तृतीय आले. नंदूरकर शाळेतील श्रावणी मदन देशमुख, राणी लक्ष्मीबाई शाळेची साक्षी विनोद इंगोले (९८.६०), जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलची साक्षी सुरेंद्र राठी (९८.४०), लोकनायक अणे विद्यालयाचा राजस हर्षवर्ध राखे (९७.८०) यांनीही उत्तम कामगिरी केली. शिक्षणाधिकारीच अनभिज्ञ दहावीच्या निकालाची टक्केवारी नेमकी कशी काढली जाते, याबाबत येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी हे स्वत:च अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. टक्केवारी काढण्याच्या पद्धतीबाबत आपल्याला माहिती नाही, असे स्पष्ट करताना वंजारी यांनी शिक्षण मंडळाशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. बेस्ट आॅफ फाईव्ह आणि क्रीडा व कला गुण मिळूनच टक्केवारी काढली जाते. यात कोणत्याही स्थितीत कुणालाच शंभर टक्केच्यावर गुण मिळणार नाही, याची दक्षता घेतली जाते. - संजय यादगिरे सचिव, अमरावती विभागीय शिक्षण मंडळ ८२ टक्के मुली उत्तीर्ण दहावीच्या निकालात गेल्या काही वर्षांपासून मुलींचीच सरशी होत आहे. हेच चित्र यंदाही कायम राहिले. जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला २१ हजार ८९२ मुले, तर १८ हजार ७६४ मुली बसल्या होत्या. त्यापैकी १६ हजार २९३ मुले उत्तीर्ण झाली, तर १५ हजार ४२९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. ८२.२३ टक्के इतकी मुलींच्या यशाची सरासरी आहे. तसेच अनुत्तीर्ण झालेल्या ८ हजार ९३४ जणांपैकी मुलींचे प्रमाण अत्यल्प आहे. दहावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी येत्या १८ जुलैपासून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.