शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

‘एसटी’ कार्यशाळेतील कर्मचारी असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांची बिनकामाची गर्दी वाढली आहे. ३१ मार्चपर्यंत एसटी बसफेऱ्या बंद ठेवल्या जाणार आहे. या काळात बस दुरुस्तीची कामे निघणारी नाही. तरीही कर्मचाºयांची कार्यशाळेत गर्दी वाढविण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याचे संदेश आहे. विभागीय कार्यशाळेत मात्र याचे पालन होत नसल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देकोरोनाच्या संसर्गाची भीती : अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे घेतली धाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांची बिनकामाची गर्दी वाढली आहे. ३१ मार्चपर्यंत एसटी बसफेऱ्या बंद ठेवल्या जाणार आहे. या काळात बस दुरुस्तीची कामे निघणारी नाही. तरीही कर्मचाºयांची कार्यशाळेत गर्दी वाढविण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्याचे संदेश आहे. विभागीय कार्यशाळेत मात्र याचे पालन होत नसल्याचे दिसून येते.या कार्यशाळेतील कर्मचाºयांनी सोमवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी ३१ मार्चपर्यंत कार्यशाळा आणि विभागीय भांडार बंद ठेवावे, अशी मागणी करण्यात आली. या काळात अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.विभागीय कार्यशाळा व भांडारात १०५ कर्मचारी एकत्रित कामे करत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कोणतीही दक्षता याठिकाणी घेतली जात नाही. सुविधाही उपलब्ध होत नाही. शासकीय निर्गमित परिपत्रकांचीही दखल घेतली जात नाही. नागपूर, औरंगाबाद मध्यवर्ती कार्यशाळा एवढेच नव्हे तर वर्धा येथील कार्यशाळा बंद करण्यात आली आहे. याशिवाय कामगारांची गर्दी होणारे खासगी उद्योगही यवतमाळात बंद आहेत.सोमवारी ९० टक्के कर्मचारी कामगिरीवर आहे. कोरोनाची प्रचंड दहशत असताना कर्मचाºयांना कामावर बोलाविण्याचा अट्टहास कशासाठी असा प्रश्न विचारला जात आहे. यावर तोडगा काढावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.विभागीय कार्यशाळा व भांडार विभागातील पी.बी. बोनगीनवार, एस.एन. झोपाटे, व्ही.एम. मिश्रा, आर.व्ही. बिडवे, जे.यू. मिर्झा, एम.एन. शेंडे, ओ.डी. दमकोंडवार, पंजाब ताटेवार, सुनील वानखेडे, सुदाम वनकर, राजेंद्र भांडवलकर आदींनी आपल्या स्वाक्षºयानिशी निवेदन दिले.कार्यशाळेत फुरसतीची कामेविभागीय कार्यशाळेत अपघातामुळे निघालेली बसची कामे, आरटीओ पासिंग, रिकंडिशन वर्क चालते. विभागीय भांडारातून आगाराला साहित्याचा पुरवठा केला जातो. इतर दैनंदिन कामे होत नाही. ही कामे आगार पातळीवर होतात. तरीही कर्मचाºयांना कामावर बोलाविले जात आहे.