शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मानव विकास मिशनची ‘एसटी’ बस विनावाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:04 IST

मानव विकास मिशनच्या बसेस विनावाहक सोडू नका, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘एसटी’ महामंडळाने केराची टोपली दाखविली आहे.

ठळक मुद्देवणी आगाराची मनमानी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : मानव विकास मिशनच्या बसेस विनावाहक सोडू नका, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला ‘एसटी’ महामंडळाने केराची टोपली दाखविली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ही खबरदारी घेतली जावी, असे सुचविल्यानंतरही प्रामुख्याने वणी आगारातून विनावाहक बसेस सोडल्या जात आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षण घेता यावे यासाठी त्यांच्या गावापासून शाळेपर्यंत मानव विकास मिशनने बसेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. याबसेस विनावाहक सोडल्या जाऊ नये, असे संकेत आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने ही दक्षता घेणे आवश्यक आहे. तरीही झरी आणि मारेगाव तालुक्यातील मानव विकास मिशनच्या बसेस विनावाहक सोडल्या जातात. याविषयी जिल्हाधिकारी तथा मानव विकास समितीच्या अध्यक्षांनी विभाग नियंत्रकांना यासंदर्भात दक्षता घेतली जावी, असे कळविले होते. २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पत्र दिल्यानंतरही मानव विकास मिशनच्या बसेस वाहकांशिवाय धावत आहे.वणी आगारातून ९, १०, १२, १३ मार्च रोजी ७०, ७३, ७७ या क्रमांकाचे शेड्युल वाहकांशिवाय सोडण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या पत्रानुसार विभाग नियंत्रकांनी वणी आगार व्यवस्थापकांना योग्य ते दिशानिर्देश देण्यात आले. तरीही यासंदर्भात संबंधित अधिकारी गंभीर नसल्याचे दिसून येते. विद्याथिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसवर वाहक आवश्यक आहे. त्यामुळे वणी आगारातून सुरु असलेला हा प्रकार नियंत्रणात आणावा असे मत कामगार सेनेचे प्रादेशिक सचिव बंडू गाडगे यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मानव विकासचे टायर घासलेमानव विकास मिशन बसेसच्या देखभाल दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी ‘एसटी’ महामंडळावर आहे. मात्र कुरतडलेल्या टायरवर या बसेस चालविल्या जातात. महत्वाचे म्हणजे समोरचे टायर खराब झालेले आहे. अपघातास कारणीभूत ठरणार हा प्रकार आहे. याबसेसचे नवीन टायर काढून महामंडळाच्या बसेसला लावण्याचा प्रकार नवीन नाही. पण किमान समोरचा टायर तरी सुस्थितीत असणे गरजेचे आहे. प्राणांतिक अपघातही अशा टायरमुळे होऊ शकतो. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यार्थिनींमधून होत आहे.