शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा तपासणीसाठी भरारी पथक

By admin | Updated: July 16, 2014 00:27 IST

विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत बंद असलेल्या आदिवासी आश्रमशाळांवर आता प्रकल्प कार्यालयाचे भरारी पथक धडकणार आहेत. या पथकांना तपासणी करून वास्तव अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांनी

पीओंकडून दखल : अहवाल मागितला प्रवीण पिन्नमवार - पांढरकवडाविद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत बंद असलेल्या आदिवासी आश्रमशाळांवर आता प्रकल्प कार्यालयाचे भरारी पथक धडकणार आहेत. या पथकांना तपासणी करून वास्तव अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले आहेत. २६ जूनला शासनाच्या सर्व शाळा उघडल्या. परंतु आदिवासी आश्रमशाळा तीन आठवडे लोटूनही उघडल्या नाही. म्हणून ‘लोकमत’ने सोमवारी प्रकल्प अधिकाऱ्यांचे थेट नियंत्रण असलेल्या तीन प्रातिनिधीक शाळांचे स्टिंग आॅपरेशन केले. त्यात या तीनच नव्हे तर बहुतांश आश्रमशाळा बंदच असल्याचे आढळून आले. ‘लोकमत’च्या या स्टिंग आॅपरेशनची पांढरकवडा येथील आदिवासी विकास विभागाचे नवनियुक्त प्रकल्प संचालक डॉ. प्रशांत रुमाले यांनी दखल घेतली आहे. स्टिंग आॅपरेशन केलेल्या तीनच नव्हे तर आपल्या अखत्यारीतील २८ अनुदानित व २२ शासकीय आश्रमशाळांची तपासणी करण्याचा निर्णय डॉ. रुमाले यांनी घेतला. त्यासाठी अतिरिक्त प्रकल्प अधिकारी शिवानंद खेडेकर यांच्या नेतृत्वात भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात सहायक प्रकल्प अधिकारी, लेखाधिकारी, दोन शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व कार्यालय अधीक्षक अशा सात सदस्यांचा समावेश आहे. या पथकाला पाच दिवसात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. आखाडीमुळे विद्यार्थी नाही, असे आश्रमशाळांकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात नोंदणीच्या अर्धेच विद्यार्थी वास्तवात असल्याचे सांगण्यात येते. मात्र पूर्ण विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखवून शासनाकडून पैसा उकळला जातो. जुलै महिन्यातसुद्धा विद्यार्थ्यांची पूर्ण उपस्थिती दाखवून शासनाकडून अनुदानाची रक्कम उचलण्याचा संस्थानिकांचा मनसुबा होता. परंतु स्टिंग आॅपरेशनने आता तो उधळला गेला आहे. प्रशासकच भरारी पथकात !वांजरी, वाघोली आणि अकोलाबाजार या तीन आश्रमशाळा सुमारे दोन वर्षांपासून एपीओ तथा प्रशासक शिवानंद खेडेकर यांच्या नियंत्रणात आहे. आता भरारी पथकाचे नेतृत्व या खेडेकर यांच्याकडे देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे भरारी पथक खरोखरच प्रामाणिकपणे अहवाल देईल का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. खेडेकर यांच्या नियंत्रणातील तीनही शाळांना स्वत: पीओ डॉ. रुमाले यांनी भेटी देऊन ‘वास्तव’ पुढे आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.