शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
4
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
5
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
6
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
7
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
8
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले
9
बोल्ड लूक...प्रशस्त केबिन; लॉन्च झाली देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर SUV, किंमत फक्त...
10
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
11
शारीरिक संबंधासाठी नकार देणे ही क्रूरता; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा, पतीच्या घटस्फोटाला मान्यता
12
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
13
Shravan Special Recipe: खमंग, खुटखुटीत, चटकदार कोथिंबीर वडी, वाढवेल शोभा नैवेद्याच्या पानाची; पाहा रेसेपी 
14
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
15
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
16
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
17
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
18
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
19
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
20
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार

दिग्रसमध्ये वसंतवादी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:28 IST

गोर बंजारा साहित्य संघाचे महासचिव मनोहर चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केली. जिल्हा परिषद सदस्य लखन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य ...

गोर बंजारा साहित्य संघाचे महासचिव मनोहर चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केली. जिल्हा परिषद सदस्य लखन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संघाचे पदाधिकारी सीताराम राठोड, नामा बंजारा, दत्तराम पवार, मनोहर चव्हाण, शहराचे नायक, कारभारी, नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर, शिक्षक, कर्मचारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारी तरुण मंडळी या सर्वांची बैठक येथील विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

साहित्य हे सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक चळवळीला खाद्य पुरविण्याचे कार्य करते. सामाजिक मूल्ये बदलतात, त्याप्रमाणे समाज बदलतो. चळवळीला खाद्य मिळाले नाही, तर ती मृतप्राय होते. परिणामी समाज मृतप्राय होतो. महानायक वसंतराव नाईक यांचे कार्य, विचार हे क्रांतिकारक आहेत. परंतु त्यांचे केवळ कृषीविषयक कार्य आपणास काही प्रमाणात अवगत आहे. त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक, जलनीती, आरक्षणविषयक क्रांतिकार्य अजूनही समाजापर्यंत पोहोचले नाही. शासन, प्रशासनाकडून त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जयंतीच्या शासकीय कार्यक्रमाला कात्री लावणे सुरू आहे. त्यामुळे वसंत विचारधारा समाजात रुजावी आणि समाजाने या क्रांतिकारी विचाराने प्रेरित होऊन त्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी वसंतवादी साहित्य संमेलन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नामा बंजारा यांनी केले. बैठकीचे संचालन डॉ. उत्तम राठोड, प्रास्ताविक साहित्य संघाचे प्रवक्ते ताराम राठोड यांनी केले. आभार दत्तराम पवार यांनी मानले. यावेळी कारभारी रमेश पवार, बंजारा सेवा संघाचे बाबूसिंग जाधव, दिवाकर राठोड, विलास राठोड, प्रकाश राठोड, संजय महाराज, डॉ. मनोहर राठोङ, जगदीश राठोड, ज्योतिराम पवार, डॉ. अर्जुन जाधव, अनिल राठोड, नामदेव पवार व समाजबांधव उपस्थित होते.