शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

दिग्रसमध्ये वसंतवादी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:28 IST

गोर बंजारा साहित्य संघाचे महासचिव मनोहर चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केली. जिल्हा परिषद सदस्य लखन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य ...

गोर बंजारा साहित्य संघाचे महासचिव मनोहर चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केली. जिल्हा परिषद सदस्य लखन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संघाचे पदाधिकारी सीताराम राठोड, नामा बंजारा, दत्तराम पवार, मनोहर चव्हाण, शहराचे नायक, कारभारी, नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर, शिक्षक, कर्मचारी, सामाजिक क्षेत्रात काम करणारी तरुण मंडळी या सर्वांची बैठक येथील विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

साहित्य हे सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक चळवळीला खाद्य पुरविण्याचे कार्य करते. सामाजिक मूल्ये बदलतात, त्याप्रमाणे समाज बदलतो. चळवळीला खाद्य मिळाले नाही, तर ती मृतप्राय होते. परिणामी समाज मृतप्राय होतो. महानायक वसंतराव नाईक यांचे कार्य, विचार हे क्रांतिकारक आहेत. परंतु त्यांचे केवळ कृषीविषयक कार्य आपणास काही प्रमाणात अवगत आहे. त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक, जलनीती, आरक्षणविषयक क्रांतिकार्य अजूनही समाजापर्यंत पोहोचले नाही. शासन, प्रशासनाकडून त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जयंतीच्या शासकीय कार्यक्रमाला कात्री लावणे सुरू आहे. त्यामुळे वसंत विचारधारा समाजात रुजावी आणि समाजाने या क्रांतिकारी विचाराने प्रेरित होऊन त्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी वसंतवादी साहित्य संमेलन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नामा बंजारा यांनी केले. बैठकीचे संचालन डॉ. उत्तम राठोड, प्रास्ताविक साहित्य संघाचे प्रवक्ते ताराम राठोड यांनी केले. आभार दत्तराम पवार यांनी मानले. यावेळी कारभारी रमेश पवार, बंजारा सेवा संघाचे बाबूसिंग जाधव, दिवाकर राठोड, विलास राठोड, प्रकाश राठोड, संजय महाराज, डॉ. मनोहर राठोङ, जगदीश राठोड, ज्योतिराम पवार, डॉ. अर्जुन जाधव, अनिल राठोड, नामदेव पवार व समाजबांधव उपस्थित होते.