शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

उद्घाटनापूर्वीच जलकुंभाला भगदाड

By admin | Updated: December 31, 2016 01:06 IST

लोहारा परिसरातील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी वाघापूर-लोहारा बायपासवरील वैभवनगरात बांधण्यात आलेल्या

जीवन प्राधिकरण : ‘ट्रायल’लाच धो-धो, चहूबाजूने लागल्या धारा यवतमाळ : लोहारा परिसरातील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी वाघापूर-लोहारा बायपासवरील वैभवनगरात बांधण्यात आलेल्या जलकुंभाचे पितळ चाचणीतच उघडे पडले. पाणी भरताच जलकुंभाला चौफेर धारा लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. संपूर्ण परिसर जलयम झाला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मात्र याविषयी सारवासारव केली जात आहे. पाच वर्षापूर्वी मंजूर झालेल्या लोहारा वाढीव पाणीपुरवठा योजने अंतर्गत दारव्हा रोडवरील सुयोग नगरात एक आणि वैभवनगरात दुसरा जलकुंभ उभारण्यात आला. वैभवनगरातील जलकुंभ चाचणी घेण्यासाठी गुरूवारी भरण्यात आला. लाखो लिटर पाणी त्यामध्ये भरण्यात आले. वास्तविक या जलकुंभाचे बरेच काम शिल्लक आहे. तरीही चाचणीची घाई करण्यात आली. पाणी भरताच जलकुंभाच्या सर्व भागाकडून पाणी धो-धो वाहण्यास सुरूवात झाली. चार ते पाच इंचाच्या पाईपमधून वाहतात ऐवढ्या या पाण्याच्या धारा होत्या. परिसरातील नागरिकांनी हा विषय प्राधिकरणातील अधिकाऱ्यांच्या कानावर घातला. परंतु ही बाब त्यांच्या हाताबाहेर गेली होती. पाण्याचा अपव्यय होताना पाहण्याशिवाय त्यांच्याकडे उपाय नव्हता. वास्तविक नवीन बांधलेल्या जलकुंभाची चाचणी घेण्यासाठी त्यात टप्प्याटप्प्याने पाणी भरणे अपेक्षित आहे. शिवाय, आतील छपाई झाली की नाही, आऊटलेट, इनलेट, बायपास, ओव्हरफ्लो सुस्थितीत बसविला आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र वैभवनगरातील जलकुंभाची चाचणी या सर्व बाबी न तपासता करण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्राधिकरणाने चाचणीसाठी इतकी घाई का केली, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. (शहर वार्ताहर) फिनिशिंगपूर्वीच भरले जलकुंभ वैभवनगरातील जलकुंभातून धो-धो पाणी वाहत असल्याविषयी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता बेले यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी छपाई आणि फिनिशिंग न झाल्याने जलकुंभातून पाणी वाहत असल्याचे सांगितले. खुद्द या विभागाच्या अधिकाऱ्यानेच काम पूर्ण न झाल्याच्या बाबीला दुजोरा दिला. मात्र आता या प्रकाराविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी मजीप्रा ‘सजग’ आहे. मग वैभवनगरातील जलकुंभ भरताना विचार का केला गेला नाही असा प्रश्न उपस्थित केला.