शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

उद्घाटनापूर्वीच जलकुंभाला भगदाड

By admin | Updated: December 31, 2016 01:06 IST

लोहारा परिसरातील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी वाघापूर-लोहारा बायपासवरील वैभवनगरात बांधण्यात आलेल्या

जीवन प्राधिकरण : ‘ट्रायल’लाच धो-धो, चहूबाजूने लागल्या धारा यवतमाळ : लोहारा परिसरातील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी वाघापूर-लोहारा बायपासवरील वैभवनगरात बांधण्यात आलेल्या जलकुंभाचे पितळ चाचणीतच उघडे पडले. पाणी भरताच जलकुंभाला चौफेर धारा लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. संपूर्ण परिसर जलयम झाला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मात्र याविषयी सारवासारव केली जात आहे. पाच वर्षापूर्वी मंजूर झालेल्या लोहारा वाढीव पाणीपुरवठा योजने अंतर्गत दारव्हा रोडवरील सुयोग नगरात एक आणि वैभवनगरात दुसरा जलकुंभ उभारण्यात आला. वैभवनगरातील जलकुंभ चाचणी घेण्यासाठी गुरूवारी भरण्यात आला. लाखो लिटर पाणी त्यामध्ये भरण्यात आले. वास्तविक या जलकुंभाचे बरेच काम शिल्लक आहे. तरीही चाचणीची घाई करण्यात आली. पाणी भरताच जलकुंभाच्या सर्व भागाकडून पाणी धो-धो वाहण्यास सुरूवात झाली. चार ते पाच इंचाच्या पाईपमधून वाहतात ऐवढ्या या पाण्याच्या धारा होत्या. परिसरातील नागरिकांनी हा विषय प्राधिकरणातील अधिकाऱ्यांच्या कानावर घातला. परंतु ही बाब त्यांच्या हाताबाहेर गेली होती. पाण्याचा अपव्यय होताना पाहण्याशिवाय त्यांच्याकडे उपाय नव्हता. वास्तविक नवीन बांधलेल्या जलकुंभाची चाचणी घेण्यासाठी त्यात टप्प्याटप्प्याने पाणी भरणे अपेक्षित आहे. शिवाय, आतील छपाई झाली की नाही, आऊटलेट, इनलेट, बायपास, ओव्हरफ्लो सुस्थितीत बसविला आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र वैभवनगरातील जलकुंभाची चाचणी या सर्व बाबी न तपासता करण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्राधिकरणाने चाचणीसाठी इतकी घाई का केली, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. (शहर वार्ताहर) फिनिशिंगपूर्वीच भरले जलकुंभ वैभवनगरातील जलकुंभातून धो-धो पाणी वाहत असल्याविषयी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता बेले यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी छपाई आणि फिनिशिंग न झाल्याने जलकुंभातून पाणी वाहत असल्याचे सांगितले. खुद्द या विभागाच्या अधिकाऱ्यानेच काम पूर्ण न झाल्याच्या बाबीला दुजोरा दिला. मात्र आता या प्रकाराविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी मजीप्रा ‘सजग’ आहे. मग वैभवनगरातील जलकुंभ भरताना विचार का केला गेला नाही असा प्रश्न उपस्थित केला.