शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांसाठी तीन टक्के राखीव निधी खर्च करा

By admin | Updated: February 22, 2016 02:44 IST

अपंगांच्या कल्याणासाठी शासनाने तीन टक्के निधी राखीव ठेवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा निधी दरवर्षी खर्च करणे आवश्यक आहे.

सचिंद्र प्रताप सिंह : विविध उपक्रमांचा घेतला आढावायवतमाळ : अपंगांच्या कल्याणासाठी शासनाने तीन टक्के निधी राखीव ठेवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा निधी दरवर्षी खर्च करणे आवश्यक आहे. निधी खर्च करत असताना योग्य बाबींवरच खर्च झाला पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.अपंग व्यक्ती अधिनियमांतर्गत गठीत जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला समाजकल्याण अधिकारी जया राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक टी. जी. धोटे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अपंग मंडळाचे अध्यक्ष तथा प्राध्यापक डॉ. बांगळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तथा अशासकीय सदस्य उपस्थित होते.अपंगांसाठी राखीव निधी खर्च करताना त्यांना खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरेल अशाच बाबींवर खर्च केला जावा. विशेषत: या निधीतून रोजगाराची साधने उपलब्ध करून देता येईल काय, याकडे लक्ष दिले जावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. अपंगांची तपासणी करताना लागणारी बेरा मशिनची आवश्यकता असल्याचे बैठकीत डॉ. बांगळे यांनी सांगितले. सदर मशिन तातडीने खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. शासकीय कार्यालयांमध्ये तीन टक्के कर्मचारी अपंगांमधून नियुक्त करावयाचे आहे. ज्या कार्यालयांनी अद्याप अपंगांसाठी राखीव पदे भरलेली नसतील, त्यांनी ती तातडीने भरण्याचे निर्देशही त्यांनी दिले.अपंगांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्र देता यावे म्हणून शिबिर घेण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यासोबत अपंगांसाठी घरकुल, रोजगारासाठी कर्ज प्रकरणे, शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी येताना लागणाऱ्या सुविधा, अपंगांचे बचतगट व त्यांना देण्यात येणारा फिरता निधी आदींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. समाजकल्याण अधिकारी जया राऊत यांनी यावेळी माहिती दिली. (स्थानिक प्रतिनिधी)