शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

अपंगांसाठी तीन टक्के राखीव निधी खर्च करा

By admin | Updated: February 22, 2016 02:44 IST

अपंगांच्या कल्याणासाठी शासनाने तीन टक्के निधी राखीव ठेवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा निधी दरवर्षी खर्च करणे आवश्यक आहे.

सचिंद्र प्रताप सिंह : विविध उपक्रमांचा घेतला आढावायवतमाळ : अपंगांच्या कल्याणासाठी शासनाने तीन टक्के निधी राखीव ठेवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा निधी दरवर्षी खर्च करणे आवश्यक आहे. निधी खर्च करत असताना योग्य बाबींवरच खर्च झाला पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.अपंग व्यक्ती अधिनियमांतर्गत गठीत जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला समाजकल्याण अधिकारी जया राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक टी. जी. धोटे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अपंग मंडळाचे अध्यक्ष तथा प्राध्यापक डॉ. बांगळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तथा अशासकीय सदस्य उपस्थित होते.अपंगांसाठी राखीव निधी खर्च करताना त्यांना खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरेल अशाच बाबींवर खर्च केला जावा. विशेषत: या निधीतून रोजगाराची साधने उपलब्ध करून देता येईल काय, याकडे लक्ष दिले जावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. अपंगांची तपासणी करताना लागणारी बेरा मशिनची आवश्यकता असल्याचे बैठकीत डॉ. बांगळे यांनी सांगितले. सदर मशिन तातडीने खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. शासकीय कार्यालयांमध्ये तीन टक्के कर्मचारी अपंगांमधून नियुक्त करावयाचे आहे. ज्या कार्यालयांनी अद्याप अपंगांसाठी राखीव पदे भरलेली नसतील, त्यांनी ती तातडीने भरण्याचे निर्देशही त्यांनी दिले.अपंगांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्र देता यावे म्हणून शिबिर घेण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यासोबत अपंगांसाठी घरकुल, रोजगारासाठी कर्ज प्रकरणे, शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी येताना लागणाऱ्या सुविधा, अपंगांचे बचतगट व त्यांना देण्यात येणारा फिरता निधी आदींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. समाजकल्याण अधिकारी जया राऊत यांनी यावेळी माहिती दिली. (स्थानिक प्रतिनिधी)